॥ विष्णुपुराणम्
॥
॥
पञ्चमः अंशः ॥ चतुर्थोऽध्यायः
॥
"वसुदेव देवकीची
कारागृहातून सुटका"
श्रीपराशर उवाच
कंसस्ततोद्विग्नमनाः
प्राह सर्वान्महासुरान् ।
प्रलम्बकेशिप्रमुखानाहूयासुरपुङ्गवान्
॥ १ ॥
श्रीपराशर
म्हणाले ;- तेव्हा कंसाने खिन्न चित्ताने प्रलम्ब आणि केशी आदि समस्त मुख्य-मुख्य असुरांना
बोलावून सांगितले ॥१॥
कंस
उवाच
हे प्रलम्ब
महाबाहो केशिन् धेनुक पूतने ।
अरिष्टाद्यास्तथैवान्ये
श्रूयतां वचनं मम ॥ २ ॥
कंस म्हणाला ;- हे प्रलम्बा
! हे महाबाहो केशिन ! हे धेनुका ! हे पूतने ! तथा हे अरिष्ट आदि अन्य असुरगण ! माझे
बोलणे ऐका ॥२॥
मां
हन्तुममरैर्यत्नः कृतः किल दुरात्मभिः ।
मद्वीर्यतापितान्वीरो
न त्वेतान्गणयाम्यहम् ॥ ३ ॥
ही गोष्ट प्रसिद्ध झाली
आहे की दुरात्मा देवतांनी मला मारण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला आहे ; पण माझ्यासारखा
वीर पुरुष माझ्या वीरतेमुळे त्रासलेल्या ह्या लोकांची पर्वा करत नाही॥३ ॥
किमिन्द्रेणाल्पवीर्येण
किं हरेणैकचारिणा ।
हरिणा
वापि किं साध्यं छिद्रेष्वसुरघातिना ॥ ४ ॥
अल्पवीर्य इन्द्र, एकटाच
भटकणारा महादेव किंवा असावधान असलेल्या दैत्यांना शोधून त्यांचा वध करणारा विष्णु कोणते
कार्य सिद्ध करू शकतात? ॥ ४ ॥
किमादित्यैः
किं वसुभिरल्पवीर्यैः किमग्निभिः ।
किंवान्यैरमरैः
सर्वैर्मद्बाहुबलनिर्जितैः ॥ ५ ॥
माझे बाहुबळच इतके आहे
की दलित आदित्य, अल्पवीर्य वसुगण, अग्नी अथवा अन्य समस्त देवतांमुळे माझे काय अनिष्ट
होऊ शकणार आहे ? ॥५॥
किं
न दृष्टोमरपतिर्मया संयुगमेत्य सः ।
पृष्ठेनैव
वहन्बाणानपगच्छन्न वक्षसा ॥ ६ ॥
तुम्ही सर्वांनी पाहिले
ना की माझ्या बरोबर युद्ध भूमिवर येऊन देवराज इन्द्र, छातीवर नाही तर पाठीवर बाणांचा
वर्षाव सहन करत पळून गेला होता ॥६॥
मद्राष्ट्रे वारिता वृष्टिर्यदा
शक्रेण किं तदा ।
मद्बाणभिन्नैर्जलदैर्नापो मुक्ता यथेप्सिताः ॥ ७ ॥
जेव्हा इन्द्राने माझ्या
राज्यात पाऊस पाडणे बंद केले होते तेव्हा मेघांनी माझ्या बाणांच्या वर्षावामुळे यथेष्ट
जलवर्षाव केलेला ना? ॥ ७॥
किमुर्व्यामवनीपाला
मद्बाहुबलभीरवः ।
ते सर्वे
सन्नतिं याता जरासन्धमृते गुरम् ॥ ८ ॥
माझे गुरु म्हणजेच सासरे
जरासंध ह्यांना सोडून पृथ्वीवरील इतर सर्व राजे माझ्या बळामुळे भयभीत होऊन माझ्यासमोर
मस्तक झुकवत नाहीत का? ॥८॥
अमरेषु
ममावज्ञा जायते दैत्यपुङ्गवाः ।
हास्यं
मे जायते वीरास्तेषु यत्नपरेष्वपि ॥ ९ ॥
हे दैत्य श्रेष्ठगणांनो
! देवतां कडून माझी अवहेलना होत आहे आणि हे वीरगणांनो! त्यांना माझ्या वधाचा प्रयत्न
करताना पाहून तर मला हसू येत आहे ॥९॥
तथापि
खलु दुष्टानां तेषामप्यधिकं मया ।
अपकाराय
दैत्येन्द्रा यतनीयं दुरात्मनाम् ॥ १० ॥
तथापि हे दैत्येन्द्रा!
त्या दुष्ट आणि दुरात्मांसाठी मला आणखी अधिक प्रयत्न करायला हवा ।। १०॥
तद्ये यशस्विनः केचित्पृथिव्यां
ये च याजकाः ।
कार्यो देवापकाराय तेषां सर्वात्मना वधः ॥ ११ ॥
म्हणून देवतांचे अपकार
करण्यासाठी पृथ्वीवर जे कोणी यशस्वी आणि यज्ञकर्ता असतील त्या सर्वांचा वध करायला हवा
चाहिये ॥११॥
उत्पन्नश्चापि
मे मृत्युर्भूतपूर्वः स वै किल ।
इत्येतद्दारिका
प्राह देवकीगर्भसम्भवा ॥ १२ ॥
देवकीच्या गर्भातून उत्पन्न
झालेल्या बालिकेने असेही म्हटले आहे की, माझा तो भूतपूर्व (पुर्वजन्मीचा) काळ निश्चितच
उत्पन्न झालेला आहे ॥ १२ ॥
तस्माद्बालेषु
च परो यत्नः कार्यो महीतले ।
यत्रोद्रिक्तं
बलं बाले स हन्तव्यः प्रयत्नतः ॥ १३ ॥
म्हणून ह्यावेळी पृथ्वीवर
उत्पन्न झालेल्या बालकांविषयी विशेष सावधानी बाळगायला हवी आणि ज्या बालकात विशेष बळाचा
उद्रेक असेल त्याला प्रयत्नपूर्वक मारून टाकले पाहिजे ॥ १३ ॥
इत्याज्ञाप्यासुरान्कंसः
प्रविश्याशु गृहं ततः ।
मुमोच
वसुदेवं च देवकीं च निरोधतः ॥ १४ ॥
असुरांना अशी आज्ञा देऊन
कंसाने कारागृहात जाऊन लगेच वसुदेव आणि देवकीला बन्धनातून मुक्त केले ॥ १४ ॥
कंस उवाच
युवयोर्घातिता गर्भा वृथैवैते मयाधुना ।
कोप्यन्य एव नाशाय बालो मम समुद्गतः ॥ १५ ॥
कंस म्हणाला;- मी आतापर्यंत
तुम्हा दोघांच्या बालकांची उगाचच हत्या केली, माझा नाश करण्यासाठी तर कोणी दुसराच बालक
उत्पन्न झाला आहे ॥ १५ ॥
तदलं
परितापेन नुनं तद्भाविनो हि ते ।
अर्भका
युवयोर्देषाच्चायुषो यद्वियोजिताः ॥ १६ ॥
पण तुम्ही ह्याचे दुःखी
होऊ नका कारण त्या बालकांचे नशीबच तसे
होते. तुमच्या प्रारब्ध-दोषामुळेच त्या बालकांना
आपले आयुष्य गमवावे लागले ॥ १६॥
श्रीपराशर
उवाच
इत्याश्वास्य
विमुक्त्वा च कंसस्तौ परिशङ्कितः ।
अन्तर्गृहं
द्विजश्रेष्ठ प्रविवेश ततः स्वकम् ॥ १७ ॥
श्रीपराशर म्हणाले;- हे
द्विजश्रेठा! अशा प्रकारे त्यांना धीर देऊन आणि बन्धनातून मुक्त करून कंसाने शंकित
मनाने अन्तःपुरात प्रवेश केला ॥ १७ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे चतुर्थोऽध्यायः (४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा