बुधवार, ८ जुलै, २०२६

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

 

विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः त्रयोदशोऽध्यायः

 

"सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा"

श्रीपराशर उवाच
भजनभजमानदिव्यान्धक देवावृधमहाभोज वृष्णिसंज्ञाःसत्वतस्य पुत्रा बभूवुः ॥ १ ॥

श्रीपराशरजी म्हणाले;- सत्वतला भजन, भजमान, दिव्य, अन्धक, देवावृध महाभोज आणि वृष्णि नामक पुत्र झाले ॥१॥


भजमानस्य निमिकृकणवृष्मयस्तथान्ये द्वैमात्राः शतजित्सहस्रजिद् अयुतजित्संज्ञास्त्रयः ॥ २ ॥

भजमनाला निमि, कृकण, वृष्णि आणि त्यांचे तीन सावत्र भाऊ शतजित सहस्त्रजित् आणि अयुतजित- हे सहा पुत्र झाले ॥२॥


 
देवावृधस्यापि बभ्रुः पुत्रोऽभवत् ॥ ३ ॥

देवावृधला बभ्रु नामक पुत्र झाला ॥३॥


तयोश्चायं श्लोको गीयते ॥ ४ ॥

ह्या दोन्ही पिता पुत्रांविषयी हा श्‍लोक प्रसिद्ध आहे ॥४॥


 यथैव शृणुमो दूरात्सम्पश्यामस्तथान्तिकात् ।
 बभ्रुः श्रोष्ठो मनुष्याणां देवैर्देवावृधःसमः ॥ ५ ॥

'जे आम्ही दुरून ऐकले होते तेच आम्ही जवळ जाऊनही पाहिले; खरेच बभ्रु मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे व देवावृध तर देवतां समान आहे ॥५॥


 पुरुषाः षट् च षष्टिश्च षट् सहस्राणि चाष्ट च ।
 तेऽमृतत्वमनुप्राप्ता बभ्रोर्देवावृधादपि ॥ ६ ॥

बभ्रु आणि देवावृध ह्यांनी उपदेश केलेल्या मार्गाचा अवलम्ब करून क्रमशः सहा हजार चौर्‍याहत्तर माणसांनी अमरपद प्राप्त केले होते' ॥६॥


 महाभोजस्त्वतिधर्मात्मा तस्यान्वये भोजाः मृत्ति कावरपुरनिवासिनो मार्तिकावरा बभूवुः ॥ ७ ॥

महाभोज फार मोठा धर्मात्मा होता, त्याची संततिच भोजवंशी तसेच मृत्तिकावरपुर निवासी मार्त्तिकावर नृपतिगण झाले ॥७॥
वृष्णे सुमित्रो युधाजिच्च पुत्रावभूताम् ॥ ८ ॥
ततश्चानमित्रस्तथानमित्रान्निघ्नः ॥ ९ ॥
निघ्नस्य प्रसेन सत्राजितौ ॥ १० ॥

वृष्णिला दो पुत्र सुमित्र आणि युधाजित झाले, त्यापेकी सुमित्रला अनमित्र, अनमित्रला निघ्न आणि निघ्नपासून प्रसेन आणि सत्राजितचा जन्म झाला ॥८-१०॥


 तस्य च सत्राजितो भगवानादित्यः सखाभवत् ॥ ११ ॥

त्याच सत्राजिताचा भगवान आदित्य मित्र बनला ॥११॥



एकदा त्वम्भोनिधितीरसंश्रयः सूर्यं सत्राजित्तुष्टाव तन्मनस्कतया च भास्वानभिष्टूयमानोऽग्रतस्तस्थौ ॥ १२ ॥

एके दिवशी समुद्रततावर बसलेल्या सत्राजितने सूर्याची स्तुति केली. त्याने तन्मयतेने केलेल्या स्तुतिमुळे भास्कर त्याच्या सम्मुख प्रकट झाला ॥१२॥

 
 ततस्त्वस्पष्टमूर्तिधरं चैनमालोक्य सत्राजित्सूर्यमाह ॥ १३ ॥

त्यावेळी त्याला अस्पष्ट मूर्ति धारण केलेले पाहून सत्राजित सूर्याला म्हणाला ॥१३॥

 


यथैव व्योम्नि वह्निपिण्डोपमं त्वामहमपश्यं तथैवाद्याग्रतो गतमप्यत्र भगवता किञ्चिन्न प्रसादीकृतं विशेषमुपलक्षयामीत्येवमुक्ते भगवता सूर्येण निजकण्ठादुन्मुच्य स्यमन्तकं नाम महामणिवरमवतार्यैकान्ते न्यस्तम् ॥ १४ ॥

"आकाशात अग्निपिण्डा समान तुम्हाला मी जसे पाहिले तसेच तुम्ही सम्मुख आल्यावरही दिसत आहात. ह्यात आपली प्रसादस्वरूप कोणतेही वैशिष्ट्य मला दिसत नाही." सत्राजितने असे म्हटल्यावर सूर्याने आपल्या गळ्यातील स्यमन्तक नामक उत्तम महामणि काढून बाजूला ठेवला ॥१४॥



ततस्तमाताम्रोज्ज्वलं ह्रस्ववपुषमीषदा पिङ्‍गलनयनमादित्यमद्राक्षीत् ॥ १५ ॥

तेव्हा सत्रजित्‌ने सूर्याला पाहिले - त्याचे शरीर किञ्चित ताम्रवर्ण, अति उज्वल आणि लघु होते तसेच त्याचे नेत्र पिंगलवर्णी होते ॥१५॥


 कृतप्रणिपातस्तवादिकं च सत्राजितमाह भगवानादित्यः सहस्रदीधितिः वरमस्मत्तोऽभिमतं वृणीष्वेति ॥ १६ ॥

नन्तर सत्राजिताने प्रणाम तथा स्तुति आदि करून झाल्यावर सहस्त्रांशु भगवान आदित्य त्याला म्हणाला, " तु हवा तो वर माग" ॥१६॥



 स च तदेव मणिरत्‍नमयाचत ॥ १७ ॥

सत्राजितने तो स्यमन्तकमणिच मागितला ॥१७॥


स चापि तस्मै तद्दत्त्वा दीधितिपतिर्वियति स्वधिष्ण्यमारुरोह ॥ १८ ॥

तेव्हा सूर्याने तो मणी त्याला दिला आणि अन्तरिक्षातील आपल्या स्थानी निघून गेला ॥१८॥



 सत्राजिदऽप्यमलमणिरत्‍न सनाथकण्ठतया सूर्य इव तेजोभिः अशेषदिगन्तराण्युद्‍भासयन् द्वारकां विवेश ॥ १९ ॥

मग सत्राजितने त्या निर्मल मणिरत्नाने आपला कण्ठ सुशोभित झाल्याने तेजस्वीरित्या सूर्या समान समस्त दिशा प्रकाशित करत द्वारकेत प्रवेश केला ॥१९॥


 द्वारकावासी जनस्तु तमायान्तमवेक्ष्य भगवन्तमादिपुरुषं पुरुषोत्तममवनिभारावतरणायांशेन मानुषरूपधारिणं प्रणिपत्याह ॥ २० ॥

द्वारकावासी लोकांनी त्याला येत असलेला पाहून, पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी अंशरूपाने अवतीर्ण झालेल्या मनुष्यरूपधारी आदिपुरुष भगवान पुरुषोत्तमाला प्रमाण करून म्हटले ॥२०॥


 भगवन् भवन्तं द्रष्ट्रं नूनमयमादित्य आयातीत्युक्तो भगवानुवाच ॥ २१ ॥

" भगवन! आपल्या दर्शनासाठी नक्कीच हे भगवान् सूर्यदेव येत आहेत' त्यांनी असे म्हटल्यावर भगवंताने त्यांना म्हटले ॥२१॥

 


भगवान्नायमादित्यः सत्राजितोऽयमादित्यदत्तस्यमन्तकाख्यं महामणिरत्‍नं बिभ्रदत्रोपयाति ॥ २२ ॥

" हा भगवान सूर्य नाही, सत्राजित आहे. हा सूर्याकडून प्राप्त झालेला स्यमन्तक नामक महामणि धारण करून इथे येत आहे ॥२२॥


 तदेनं विश्रब्धाः पश्यतेत्युक्तास्ते तथैव ददृशुः ॥ २३ ॥

तुम्ही विश्वस्त होऊन त्याला बघा" भगवंताने असे सांगितल्यावर द्वरकावासी त्याला तशा प्रकारे पाहू लागले ॥२३॥


 स च तं स्यमन्तकमणिमात्मनिवेशने चक्रे ॥ २४ ॥

सत्राजिताने तो स्यमन्तकमणी आपल्या घरात ठेऊन दिला ॥२४॥

 
 प्रतिदिनं तन्मणिरत्‍नमष्टौ कनकभारान् स्त्रवति ॥ २५ ॥

तो मणि प्रतिदिन आठ भार सोने देत असे ॥२५॥


 तत्प्रभावाच्च सकलस्यैव राष्ट्रस्य उपसर्गानावृष्टिव्यालाग्निचोर दुर्भिक्षादिभयं न भवति ॥ २६ ॥

त्याच्या प्रभावाने सम्पूर्ण राष्ट्रात रोग, अनावृष्टि तसेच सर्प, अग्नि, चोर किंवा दुर्भिक्ष आदिचे भय नाहीसे झाले ॥२६॥


अच्युतोऽपि तद्दिव्यं रत्‍नमुग्रसेनस्य भूपतेर्योग्यमेतदिति लिप्सां चक्रे ॥ २७ ॥

भगवान अच्युताला सुद्धा असे वाटले की हे दिव्य रत्न राजा उग्रसेनासाठी योग्य आहे ॥२७॥


गोत्रभेदभयाच्छक्तोऽपि न जहार ॥ २८ ॥

पण जातीय विद्रोहाच्या भयामुळे समर्थ असूनही त्याने तो बळकावला नाही ॥२८॥


 सत्राजिदप्यच्युतो मामेतद्याचयिष्यतीत्यवगम्य रत्‍नलोभाद्‍भ्रात्रे प्रसेनाय तद्रत्‍नमदात् ॥ २९ ॥

सत्राजितला जेव्हा कळले की भगवंत माझ्याकडे रत्न मागणार आहे तेव्हा लोभामुळे त्याने ते आपल्या भावाला प्रसेनला दिले ॥२९॥



तच्च शुचिना ध्रियमाणमशेषमेव सुवर्णस्त्रवादिकं गुणजातमुत्पादयति अन्यथा धारयन्तमेव हन्तीत्यजानन्नसावपि प्रसेनस्तेन कण्ठसक्तेन स्यमन्तकेन अश्वमारुह्याटव्यां मृगयामगच्छत् ॥ ३० ॥

पण पवित्रतेने धारण केले तरच हा मणि सुवर्ण दान आदि अनेक गुण प्रकट करतो आणि अशुद्धावस्थेत धारण केल्यास तो घातक होतो हे न कळल्याने, प्रसेन तो मणी आपल्या गळ्यात बांधून घोड्यावरून मृगयेसाठी वनात निघून गेला ॥३०॥

 
 तत्र च सिंहाद्वधमवाप ॥ ३१ ॥

तिथे त्याला एका सिंहाने मारून टाकले ॥३१॥



 
 साश्वं च तं निहत्य सिंहोऽप्यमलमणिरत्‍नमास्याग्रेणादंय गन्तुमभ्युद्यतः ऋक्षाधिपतिना जाम्बवता दृष्टो घातितश्च ॥ ३२ ॥

जेव्हा तो सिंह घोड्यासकट त्याला मारून तो निर्मळ मणी आपल्या तोंडात घेऊन जाऊ लागला तेव्हा ऋक्षराज जाम्बवंताने त्याला मारून टाकले ॥३२॥


 जाम्बवानप्यमलमणिरत्‍नमादाय स्वबिले प्रविवेश ॥ ३३ ॥

त्यानन्तर ते निर्मळ मणीरत्न घेऊन जांबवंत आपल्या गुहेत गेला ॥३३॥


 सुकुमारसंज्ञाय बालकाय च क्रीडनकमकरोत् ॥ ३४ ॥

आणि आपल्या सुकुमार नामक मुलाला तो मणी खेळायला दिला ॥३४॥



 अनागच्छति तस्मिन्प्रसेने कृष्णो मणिरत्‍नमभिलषितवान्स च प्राप्तवान्‍नूनमेतदस्य कर्मेत्यखिल एव यदुलोकः परस्परं कर्माकर्ण्याकथयत् ॥ ३५ ॥

प्रसेन जेव्हा मृगयेहून परतला नाही तेव्हा सगळे यादव आपसात बोलू लागले की "कृष्णाला हे मणिरत्न हवे होते, अवश्य त्यानेच ते घेतलेले आहे - हे नक्की त्याचेच काम आहे” ॥३५॥


 विदितलोकापवादवृत्तान्तश्च भगवान् सर्वयदुसैन्यपरिवारपरिवृतः प्रसेनाश्वपदवीमनुससार ॥३६॥ ददर्श चाश्वसमवेतं प्रसेनं सिंहेन विनिहतम् ॥ ३७ ॥

हा लोकापवाद कानावर पडताच सम्पूर्ण यादवसेनेसह भगवंतानी प्रसेनच्या घोड्याच्या चरणचिह्नाचे अनुसरण केले आणि पाहिले की प्रसेनला घोड्यासकट सिंहाने मारले आहे ॥३६-३७॥


अखिलजनमध्ये सिंहपददर्शनकृतपरिशुद्धः सिंहपदमनुससार ॥ ३८ ॥
 ऋक्षपतिनिहतं च सिंहमप्यल्पे भूमिभागे दृष्ट्‍वा ततश्च तद्रत्‍नगौरवादृक्षस्यापि पदान्यनुययौ ॥ ३९ ॥

मग सर्व लोकांनी ते सिंहाचे चरणचिह्न पाहिल्यावर ते निर्दोष सिद्ध झाल्यावरही भगवंतांनी त्या चिह्नाचे अनुसरण केले आणि थोडे पुढे गेल्यावर ऋक्षराजद्वारा मारला गेलेला सिंह पाहिला पण त्या रत्नाच्या महत्त्वामुळे त्यांनी जाम्बवंताच्या पदचिन्हांचेही अनुसरण केले ॥३८-३९॥


 गिरितटेच सकलमेव तद्यदुसैन्यमवस्थाप्य तत्पदानुसारी ऋक्षबिलं प्रविवेश ॥ ४० ॥

आणि सम्पुर्ण यादव सेनेला पर्वताच्या तटावर सोडून ऋक्षराजाच्या चरणांचे अनुसरण करत स्वतःच त्याच्या गुहेत घुसले ॥४०॥


 अन्तः प्रविष्टश्च धात्र्याः सुकुमारकमुल्लालयन्त्या वाणीं शुश्राव ॥ ४१ ॥

आत गेल्यावर भगवंतांनी सुकुमारला रमवणारे धात्रीचे हे बोल ऐकले ॥४१॥


 सिंहः प्रसेनमवधीत्सिंहो जाम्बवता हतः ।
 सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ॥ ४२ ॥

सिंहाने प्रसेनला मारले आणि सिंहाला जाम्बवंताने; हे सुकुमारा! तू रडू नकोस हा स्यमन्तकमणी तुझाच आहे ॥४२॥


 इत्याकर्ण्योपलब्धस्यमन्तकोऽतः प्रविष्टः कुमारक्रीडनकीकृतं च धात्र्या हस्ते तेजोभिर्जाज्वल्यमानं स्यमन्तकं ददर्श ॥ ४३ ॥

हे ऐकून स्यमन्तकाचा पत्ता लागल्याने भगवंतांनी आत जाऊन पाहिले की सुकुमारचे खेळणे बनलेला स्यमन्तक मणी धात्रीच्या हातात आपल्या तेजाने देदीप्यमान होत होता ॥४३॥


 तं च स्यमन्तकाभिलषित चक्षुषमपूर्वपुरुषमागतं समवेक्ष्य धात्री त्राहित्राहीति व्याजहार ॥ ४४ ॥

स्यमन्तक मण्याकडे अभिलाषापूर्ण दृष्टिने पाहात असलेल्या एका विलक्षण पुरुषाला तिथे आलेला पाहून धात्री, 'त्राहि - त्राहि' करून ओरडू लागली ॥४४॥


 तदार्तरवश्रवणानन्तरं चामर्षपूर्णहृदयः स जाम्बवानाजगाम ॥ ४५ ॥

तिची आर्त्त वाणी ऐकून जाम्बवंत चिडून तिथे आला  ॥४५॥


 
 तयोश्च परस्परमुद्धतामर्षयोर्युद्धं एकविंशतिदिनान्यभवत् ॥ ४६ ॥

मग परस्परांमध्ये रोष वाढल्याने दोघांमध्ये एकवीस दिवस घोर युद्ध झाले ॥४६॥


 ते च यदुसैनिकास्तत्र सप्ताष्टदिनानि तन्निष्क्रान्तिमुदिक्षमाणास्तस्थुः ॥ ४७ ॥

पर्वताजवळ भगवंताची प्रतीक्षा करणार्‍या यादव सैनिकांनी सात आठ दिवस त्याची गुहेतून बाहेर यायची वाट पाहिली ४७॥



अनिष्क्रमणे च मधुरिपुरसाववश्यमत्र बिलेऽत्यन्तं नाशमवाप्तो भविष्यत्यन्यथा तस्य जीवतः कथमेतावन्ति दिनानि शत्रुजये व्याक्षेपो भविष्यतीति कृताध्यवसाया द्वारकामागम्य हतः कृष्ण इति कथयामासुः ॥ ४८ ॥

पण जेव्हा इतके दिवस होऊनही ते बाहेर आले नाहीत तेव्हा त्यांना वाटले की नक्कीच श्रीमधुसुदन त्या गुहेत मारले गेले असावेत, जीवित असते तर शत्रुला जिंकायला इतके दिवस का लागावेत? ' असा विचार करून ते द्वारकेत परतले आणि तिथे सर्वांना सांगितले की श्रीकृष्ण मारले गेले ॥४८॥

 
 तद्‌बान्धवाश्च तत्कालोचितं अखिलमुत्तरक्रियाकलापं चक्रुः ॥ ४९ ॥

त्याच्या बान्धवांनी हे ऐकल्यावर त्याचे समयोचित सम्पुर्ण और्ध्वदैहिक कर्म केले ॥४९॥


 ततश्चास्य युद्ध्यमानस्याति श्रद्धादत्तविशिष्टोपपात्रयुक्तान्नतोयादिना श्रीकृष्णस्य बलप्राणपुष्टचिरभूत् ॥ ५० ॥

इथे अति श्रद्धापूर्वक दिलेल्या विशिष्ट पात्रांसहीत त्यातील अन्न आणि जलामुळे युद्ध करते वेळी श्रीकृष्णाच्या बल आणि प्राणाची पुष्टी झाली ॥५०॥



 इतरस्य अनुदिनमतिगुरुपुरुषभेद्यमानस्य अतिनिष्ठुर प्रहारपातपीजिताखिलावयवस्य निराहारतया बलहानिरभूत् ॥ ५१ ॥

तसेच अति महान पुरुषाद्वारा मर्दित झाल्याने व त्याच्या अत्यन्त निष्ठुर प्रहाराच्या आघातांनी पीडित शरीर झालेल्या जाम्बवंताचे बल निराहार राहिल्याने क्षीण झाले ॥५१॥


निर्जितश्च भगवता जाम्बवानप्रणिपत्य व्याजहार ॥ ५२ ॥

शेवटी भगवंतांकडून पराजित होऊन जाम्बवंताने त्यांना प्रणाम करून म्हटले ॥५२॥


सुरासुरगन्धर्व यक्षराक्षलसादिभिः अप्यखिलैर्भवान्न जेतुं शक्यः किमुतावनिगोचरैः अल्पवीर्यैर्नरैर्नरावयवभूतैश्च तिर्यग्योन्यनुसृतिभिः किं पुनरस्मद्विधैरवश्यं भवताऽस्मत्स्वामिना रामेणेन नारायणस्य सकलजगत्परायणस्यांशेन भगवता भवितव्यमित्युक्तस्तस्मै भगवानखिलावनिभारावतरणार्थं अवतरणमाचचक्षे ॥ ५३ ॥
 प्रीत्यभिव्यञ्जितकरतलस्पर्शनेन चैनमपगतयुद्धखेदं चकार ॥ ५४ ॥

" भगवन! आपल्याला तर देवता, असुर, गन्धर्व, यक्ष, राक्षस कोणीही जिंकू नाही शकत, फिर पृथ्वीतलावर राहणारे अल्पवीर्य मनुष्य अथवा मनुष्यांचे अवयवभूत असलेल्या आमच्यासारख्या तिर्यक योनिगत जीवांची गोष्टच काय ? अवश्य आपणच आमच्या प्रभु श्रीरामन्द्रा समान सकल लोक - प्रतिपालक भगवान् नारायणाच्याच अंशापासून प्रकट झाला आहात." जांबवंताने असे म्हटल्यावर भगवंताने पृथ्लीचा भार हलका करण्यासाठी घेतलेल्या आपल्या अवताराचा सम्पूर्ण वृतान्त त्याला सांगितला आणि प्रेमाने त्याला आपल्या हाताचा स्पर्श करून युद्धाच्या श्रमातून मुक्त केले ॥५३-५४॥


 स च प्रणिपत्य पुनरप्येनं प्रसाद्य जाम्बवतीं नाम कन्यां गृहागतायार्घ्यभूतां ग्राहयामास ॥ ५५ ॥ स्यमन्तकमणिरत्‍नमपि प्रणिपत्य तस्मै प्रददौ ॥ ५६ ॥

त्यानंतर जाम्बवंताने पुन्हा प्रणाम करून त्याला प्रसन्न केले व घरी आलेल्या भगवंतासाठी अर्घ्यस्वरूप आपली जाम्बवती नावाची कन्या अर्पण केली तसेच त्याला प्रणाम करून मणिरत्न स्यमन्तक सुद्धा दिला ॥५५-५६॥


अच्युतोऽप्यतिप्रणतात् तस्मादग्राह्यमपि तन्मणिरत्‍नमात्मसंशोधनाय जग्राह ॥ ५७ ॥
सह जाम्बवत्या स द्वारकामाजगाम ॥ ५८ ॥

भगवान अच्युताने सुद्धा त्या अति विनीताकडून घेण्यास योग्य नसतानाही आपल्या कलंग शोधासाठी ते मणिरत्न घेतले आणि जाम्बवतीसह तो द्वारकेत आला ॥५७-५८॥


 भगवदागमनोद्‍भूत हर्षोत्कर्षस्य द्वारकावासिजनस्य कृष्णवलोकनात् तत्क्षणमेवातिपरिणतवयसोऽपि नवयौवनमिवाभवत् ॥ ५९ ॥

त्यावेळी भगवान कृष्णाच्या आगमनाने ज्यांचा हर्ष वेग अतिशय वाढला त्या द्वारकावासीपैकी ज्यांची अवस्था वृद्धत्वाकडे झुकलेली होती त्यांच्यातही त्याच्या दर्शनाच्या प्रभावाने तात्काळ नवयौवनाचा संचार झाला ॥५९॥

 
दिष्ट्यादिष्ट्येति सकलयादवाः स्त्रियश्च सभाजयामासुः ॥ ६० ॥

तसेच सर्व यादवगण व त्यांच्या स्त्रिया 'अहोभाग्य! अहोभाग्य!' असे म्हणत त्याचे अभिवादन करू लागल्या ॥६०॥


 भगवानपि यथानुभूतमशेषं यादवसमाजे यथावदाच्चक्षे ॥ ६१ ॥
 स्यमन्तकं च सत्राजिताय दत्त्वा मिथ्याभिशस्तिपरिशुद्धिमवाप ॥ ६२ ॥
 जाम्बवतीं चान्तःपुरं निवेशयामास ॥ ६३ ॥

भगवंतांनी सुद्धा जे जे जसे झाले ते तसेच्या तसे यादवांना सांगितले आणि सत्राजिताला स्यमन्तकमणी देऊन आपल्यावर आलेला खोटा आळ दूर केला. मग जाम्बवतीला आपल्या अन्तः पुरात पोहोचवले ॥६१-६३॥


 सत्राजितोपि मयास्याभूतमलिनमारोपितमिति जातसन्त्रासात्स्वसुतां सत्यभामां भगवते भार्यार्थं ददौ ॥ ६४ ॥

सत्राजितने सुद्धा आपल्यामुळेच कृष्णाला खोटा कलंक लागला म्हणून घाबरत घाबरत त्याला पत्नीरूपात आपली कन्या सत्यभामा हिच्यासोबत विवाह लावून दिला ॥६४॥


 तां चाक्रूरकृतवर्म शतधन्वप्रमुखा यादवाः प्राग्वरयाम्बभूवुः ॥ ६५ ॥

त्या कन्येला अक्रुर, कृतवर्मा आणि शतधन्वा आदि यादवांनी आधी वरले होते ॥६५॥


 ततस्तत्प्रदानादवज्ञातमेवात्मानं मन्यमानाः सत्राजिते वैरानुबन्धं चक्रुः ॥ ६६ ॥

म्हणून श्रीकृष्णाशी तिचा विवाह लावून दिल्याने त्यांनी हा आपला अपमान समजून सत्राजिताशी वैर केले ॥६६॥



अक्रूरकृतवर्मप्रमुखाश्च शतधन्वानमूचुः ॥ ६७ ॥

नन्तर अक्रूर आणि कृतवर्माने शतधन्वाला म्हटले ॥६७॥



 
अयमतीव दुरात्मा सत्राजिद् योऽस्माभिर्भवता च प्रार्थितोऽप्यात्मजामस्मान् भवन्तं चाविगणय्य कृष्णाय दत्तवान् ॥ ६८ ॥

"हा सत्राजित मोठा दुष्ट आहे, बघा आपण सर्वांनी मागणी घालूनही आपल्याकडे दुर्लक्ष करून त्याने आपली कन्या कृष्णाला दिली ॥६८॥




 तदलमनेन जीवता घातयित्वैनं तन्महारत्‍नं स्यमन्तकाख्यं त्वया किं न गृह्यते वयमभ्युपपत्स्यामो यद्यच्युतस्तवोपरि वैरानुबन्धं करिष्यतीत्येवं उक्तस्तथेत्यसावप्याह ॥ ६९ ॥

म्हणून आता त्याच्या आयुष्याचे प्रयोजनच काय राहिले; त्याला मारून आपण स्यमन्तक महामणि का घेत नाही? नंतर जर अच्युताने काही विरोध केलाच तर आम्ही तुम्हाला साथ देऊ.” त्यांनी असे म्हटल्यावर शतधन्वा म्हणाला - " ठीक आहे, असेच करुया" ॥६९॥


 जतुगृहदग्धानां पाण्डुतनयानां विदितपरमार्थोऽपि भगवान् दुर्योधनप्रयत्‍न शौथिल्यकरणार्थं पार्थानुकूल्यकरणाय वारणावतं गतः ॥ ७० ॥

त्याचवेळी पाण्डव लाक्षागृहात जळाल्याचे कळल्यावरही कृष्ण दुर्योधनाचे प्रयत्न शिथिल करण्याच्या उद्देशाने कुलोचित कर्म करण्यासाठी वारणावत नगराला गेले ॥७०॥

 

 गते च तस्मिन् सुप्तमेव सत्राजितं शतधन्वा जघान मणिरत्‍नं चाददात् ॥ ७१ ॥

कृष्ण गेल्यावर शतधन्वाने झोपलेल्या सत्राजितला मारून ते मणिरत्न घेतले ॥७१॥

 


 पितृवधामर्षपूर्णा च सत्यभामा शीघ्रं स्यन्दनमारूढा वारणावतं गत्वा भगवतेऽहं प्रतिपादितेत्यक्षान्तिमता शतधन्वनास्मत्पिता व्यापादितस्तच्च स्यंमन्तकमणिरत्‍नमपहृतं यस्यावभासनेनापहृततिमिरं त्रैलोक्यं भविष्यति ॥ ७२ ॥

पित्याच्या वधामुळे क्रोधित झालेली सत्यभामा त्वरित रथारूढ होऊन वारणावत नगरात गेली आणि कृष्णाला म्हणाली, " भगवंत! माझ्या पित्याने मला आपल्या हाती सोपवले - हे सहन न झाल्याने शतधन्वाने माझ्या वडिलांना मारून स्यमन्तक नामक मणिरत्न घेतले ज्याच्या प्रकाशाने सम्पूर्ण त्रेलोक्य अन्धकारशुन्य होईल ॥७२॥



तदीयं त्वदीयापहासना तदालोच्य यदत्र युक्तं तत्क्रियतामिति कृष्णमाह ॥ ७३ ॥

ह्यात आपलेच हसे होईल, म्हणून नीट विचार करून जे योग्य वाटते ते आपण करावे " ॥७३॥


 तया चैवमुक्ताः परीतुष्टान्तः करणोऽपि कृष्णः सत्यभामाममर्षताम्रनयनः प्राह ॥ ७४ ॥

सत्यभामाने असे म्हटल्यावर श्रीकृष्ण मनातून प्रसन्न असूनही क्रोधाने डोळे लाल करून म्हणाले ॥७४॥


 सत्ये ममैवैषापहासना नाहमेतां तस्य दुरात्मनःसहिष्ये ॥ ७५ ॥
 न ह्यनुल्लङ्‍घ्य परपादपं तत्कृतनीडाश्रयिणो विहङ्‍गमा वध्यन्ते तदलममुनास्मत्पुरतः शोकप्रोरितवाक्य परिकरेणेत्युक्त्वा द्वारकामभ्येत्येकान्ते बलदेवं वासुदेवः प्राह ॥ ७६ ॥

"सत्ये! अवश्य ह्यात माझेच हसे होईल, त्या दुरात्म्याचे हे कुकर्म मी सहन नाही करू शकत, कारण जर ऊंच वृक्षाचे उल्लघंन करणे अशक्य असले तर त्यावर घरटे बनवून राहणार्‍या पक्ष्यांना मारत नाहीत. म्हणून तू अशी शोक प्रेरित वाक्य बोलण्याची काहीही आवश्यकता नाही. मी ह्याचा योग्य प्रकारे बदला घेईनच. " सत्यभामाला असे म्हणून वासुदेवाने द्वारकेला येऊन बलदेवाला एकान्तात म्हटले ॥७५-७६॥


मृगयागतं प्रसेनमटव्यां मृगपतिर्जघान ॥ ७७ ॥

'वनात मृगयेसाठी गेलेल्या प्रसेनला सिंहाने मारले होते ॥७७॥

 
 सत्राजितोऽप्यधुना शतधन्वना निधनं प्रापितः ॥ ७८ ॥

आता शतधन्वाने सत्राजितला सुद्धा मारले आहे ॥७८॥

 
 तदुभयविनाशात्तन्मणिरत्‍नमावाभ्यां सामान्यं भविष्यति ॥ ७९ ॥

अशा प्रकारे ती दोघही जणं मारली गेल्यावर त्या मणीरत्न स्यमन्तकावर आपला दोघांचा समान अधिकार असायला हवा? ॥७९॥


 तदुत्तिष्ठारुह्यतां रथः शतधन्वनिधनायोद्यमं कुर्वित्यभिहितस्तथेति समन्विप्सितवान् ॥ ८० ॥

म्हणून उठ आणि रथारूढ होऊन शतधन्वाला मारण्याचा प्रयन्त कर ' कृष्ण असे म्हणाल्यावर बलदेवने 'बरे' म्हणून त्याचा स्वीकार केला ॥८०॥



कृतोद्यमौ च तावुभावुपलभ्य शतधन्वा कृतवर्माणमुपेत्य पार्ष्णिपूरमकर्मनिमित्तमचोदयत ॥ ८१ ॥

कृष्ण आणि बलदेव आपल्या वधासाठी प्रयत्न करत आहेत हे कळल्यावर शतधन्वाने कृतवर्मा जवळ जाऊन मदतीसाठी प्रार्थना केली ॥८१॥



 आह चैनं कृतवर्मा ॥ ८२ ॥ नाहं बलदेववासुदेवाभ्यां सह विरोधायालमित्युक्तश्चाक्रूरमचोदयत् ॥ ८३ ॥ असावप्याह ॥ ८४ ॥

तेव्हा कृतवर्मा त्याला म्हणाला, 'मी बलदेव आणि वासुदेवाचा विरोध करण्यास समर्थं नाही. ' त्याने असे म्हटल्यावर शतधन्वाने अक्रूराकडे सहाय्य मागितले, तेव्हा अक्रुर म्हणाला ॥८-८४॥


 न हि कश्चिद्‍भगवता पादप्रहार परिकम्पितजगत्त्रयेण सुररिषुवनिता वैधव्यकारिणा प्रबलरिपुचक्राप्रतिहतचक्रेण चक्रिणा मदमुदित नयनावलोकनाखिलनिशातनेन अतिगुरुवैरिवारणापकर्षणा विकृतमहिमोरुसीरेण सीरिणा च सह सकलजगद् वन्द्यानाममरवराणामपि योद्धुं समर्थः किमुताहं ॥ ८५ ॥

' जो आपल्या पाद प्रहाराने त्रैलोक्य कम्पायमान करतो, देवशत्रु असुरगणांच्या स्त्रियांना वैधव्यदान देतो तसेच अति प्रबल शत्रु सेनेकडूनही ज्याचे चक्र अप्रतिहत राहते त्या चक्रधारी भगवान वासुदेवाशी आणि जो आपल्या मदोन्मत्त नयन कटाक्षांनी सर्वांचे दमन करतो आणि भयकंर शत्रुसमुहरूपी हत्तींना खेचण्यासाठी अखण्ड महिमाशाली प्रचण्ड हल धारण करतो त्या हलधराशी युद्ध करायला निखिल लोकात वन्दनीय असलेल्या देवगणातही कोणीच समर्थ नाही. तर मग माझा प्रश्नच कुठे येतो? ॥८५॥


 तदन्यः शरणमभिलष्यतामित्युक्तः शतधनुराह ॥ ८६ ॥

म्हणून तु दुसर्‍या कोणाला शरण जा' अक्रुराने असे म्हटल्यावर शतधन्वा म्हणाला ॥८६॥

 
 यद्यस्मत्परित्राणासमर्थं भवानात्मनमधिगच्छति तदयमस्मत्तस्तावन्मणिः सङ्‍गृह्य रक्ष्यतामिति ॥ ८७ ॥

' अच्छा, जर माझी रक्षा करण्यास आपण स्वतःला सर्वथा असमर्थ समजता तर मग मी तुम्हाला हा मणी देतो, हा ठेवा आणि ह्याची रक्षा करा ॥८७॥

 
 एकमुक्तः सोऽप्याह ॥ ८८ ॥ यद्यन्त्ययामप्यवस्थायां न कस्मैचिद्‍भवान् कथयिष्यति तदहमेतं ग्रहीष्यामीति ॥ ८९ ॥

ह्यावर अक्रुर म्हणाला 'जर अन्तकाळ उपस्थित झाला तरी तू ही गोष्ट कोणालाही सांगणार नाहीस असा शब्द दिलास तरच मी हा मणी घेतो ॥ ८८-८९॥



 तथेत्युक्ते चाक्रूरस्तन्मणिरत्‍नं जग्राह ॥ ९० ॥

शतधन्वा म्हणाला, ' असेच होईल' ह्यावर अक्रुराने ते मणिरत्न स्वतःजवळ ठेवून घेतले ॥९०॥


 शतधनुरप्यतुलवेगां शतयोजनवाहिनीं वडवामारुह्यपक्रान्तः ॥ ९१ ॥

त्यानंतर शतधन्वा शंभर योजने जाणार्‍या एका अत्यन्त वेगवान घोड़ीवर चढून पळून गेला ॥९१॥


 शैव्यसुग्रीवमेघपुष्प बलाहकाश्वचतुष्टययुक्त रथस्थितौ बलदेववासुदेवौ तमनुप्रयातौ ॥ ९२ ॥

शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प तथा बलाहक नामक चार घोड्यांच्या रथपर चढून बलदेव आणि वासुदेवानेही त्याचा पाठलाग केला ॥९२॥


 सा च बडवा शतयोजनप्रमाणमार्गमतीता पुनरपि वाह्यमाना मिथिलावनोद्देशे प्राणानुत्ससर्ज ॥ ९३ ॥

शंभर योजने पार करून आणखी पुढे गेल्यावर त्या घोड़ीने मिथिला देशाच्या वनात प्राण त्यागले ॥९३॥


 शतधनुरपि तां परित्यज्य पदातिरेवाद्रवत् ॥ ९४ ॥

तेव्हा शतधन्वा तिला सोडून पायीच धावू लागला ॥९४॥


 कृष्णोपि बलभद्रमाह ॥ ९५ ॥

तेव्हा श्रीकृष्णाने बलभद्राला म्हटले ॥९५॥


 तावदत्र स्यन्दने भवता स्थेयमहमेनमधमाचारं पदातिरेव पदातिमनुगम्य यावद्‌घातयामि अत्र हि भूभागे दृष्टदोषाःसभया अतो नैतेऽश्वा भवतेमं भूमिभागमुल्लङ्‍घनीयाः ॥ ९६ ॥

तू आता रथातच राहा, मी ह्या पायी पळणार्‍या दुराचार्‍याला पायीच जाऊन मारून टाकतो. इथे घोड़ीला मृत पाहून त्या दोषामुळे घोड़े भयभीत झाले आहेत, म्हणून तु त्यांना आणखी पुढे नेऊ नकोस ॥९६॥


 तथेत्युक्त्वा बलदेवो रथ एव तस्थौ ॥ ९७ ॥

तेव्हा बलदेवाने 'बरे' म्हणून तो रथातच बसला ॥९७॥



 कृष्णोपि द्विक्रोशमात्रं भूमिभागमनुसृत्य दूरस्थितस्यैव चक्रं क्षिप्त्वा शतधनुषः शिरश्चिच्छेद ॥ ९८ ॥

श्रीकृष्णाने केवळ दोन कोस पाठलाग करून आपले चक्र फेंकले आणि दूर असूनही शतधन्वाचे मस्तक छाटून टाकले ॥९८॥




 तच्छरीराम्बरादिषु च बहुप्रकारमन्विच्छन्नपि स्यमन्तकमणिं नावाप यदा तदोपगम्य बलभद्रमाह ॥ ९९ ॥

पण खूप शोधूनही त्याच्या शरीरावर आणि वस्त्रांमध्ये सयमन्तकमणी सापडला नाही तेव्हा बलभद्रा जवळ येऊन तो म्हणाला ॥९९॥



 वृथैवास्माभिः शतधनुर्घातितः न प्राप्तमशिलजगत्सारभूतं तन्महारत्‍नं स्यमन्तकाख्यं इत्याकर्ण्योद्‍भूतकोपो बलदेवो वासुदेवमाह ॥ १०० ॥

‘आपण शतधन्वाला उगाच मारले, कारण सम्पूर्ण जगताचा सारभूत असा स्यमन्तकमणी त्याच्याकडे सापडलाच नाही. हे एकून बलदेवाला वाटले की श्रीकृष्ण तो मणी स्वतःकडे ठेवण्यासाठी बहाणे बनवत आहे म्हणून चिडून तो वासुदेवाला म्हणाला ॥१००॥


 धिक्त्वां यस्त्वमेवमर्थलिप्सुरेतच्च ते भ्रातृत्वान्मया क्षान्तं तदयं पन्थाःस्वेच्छया गम्यतां न मे द्वारकया न त्वया न चाशेषबन्धुभिः कार्यमलमलमेभिः ममाग्रतोऽलीकशपथैरित्याक्षिप्य तत्कथां कथञ्चित्प्रसाद्यमानोपि न तस्थौ ॥ १०१ ॥
 स विदेहपुरीं प्रविवेश ॥ १०२ ॥

'तुझा धिक्कार आहे, तु खूपच स्वार्थी आहेस, भाऊ असल्याने मी तुला क्षमा करतो. तुझा मार्ग खुला आहे, तु हवं तिथे जाऊ शकतोस. मला आता द्वारकेशी, तुझ्याशी किंवा इतर नातेवाईकांशी काहीही कर्तव्य नाही. मला तुझ्या खोट्या शपथांशी देणघेणं नाही. ह्यावर त्याला अनेकप्रकारे समजावल्यावरही तो तिथे न थांबता विदेहनगरात निघून गेला ॥१०१-१०२॥


 जनकराजश्चार्घ्यपूर्वकमेनं गृहं प्रवेशयामास ॥ १०३ ॥ स तत्रैव च तस्थौ ॥ १०४ ॥

विदेहनगरात गेल्यावर राजा जनकाने त्याला अर्घ्य देऊन आपल्या घरी नेले आणि तो तिथेच राहू लागला ॥१०३-१०४॥



 वासुदेवोऽपि द्वारकामाजगाम ॥ १०५ ॥

इथे, वासुदेव द्वारकेत गेले ॥१०५॥

 


 यावच्च जनकराजगृहे बलभद्रोऽवतस्थे तावद्धार्तराष्ट्रो दुर्योधनः तत्सकाशाद्‍गदाशिक्षामशिक्षयत् ॥ १०६ ॥

जितके दिवस बलदेव राजा जनकाकडे राहिला तितके दिवस धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन त्याच्याकडे गदायुद्ध शिकत राहिला ॥१०६॥


वर्षत्रयान्ते च बभ्रूग्रसेनप्रभृतिभिः यादवैः न तद्रत्‍नं कृष्णेनापहृतमिति कृतावगतिर्विदेहनगरीं गत्वा बलदेवःसम्प्रत्याय्य द्वारकामानीतः ॥ १०७ ॥

नन्तर, बभ्रु आणि उग्रसेन आदि यादव ज्यांना खात्री होती की कृष्णाने स्यमन्तकमणि घेतलेला नाही' त्यांनी विदेहनगरात जाऊन शपथपूर्वक विश्वास दिल्यावर बलदेव तीन वर्षांनी द्वारकेत परतले ॥१०७॥



 अक्रूरोप्युत्तममणिसमुद्‍भूतसुवर्णेन भगवद्ध्यानपरोऽनवरतं यज्ञानियाज ॥ १०८ ॥

अक्रुर देखील भगवद ध्यान परायण राहून त्या मणिरत्नापासून प्राप्त झालेल्या सुवर्णा द्वारा निरन्तर यज्ञानुष्ठान करू लागला ॥१०८॥


 सवनगतौ हि क्षत्रियवैश्यौ निघ्नन्ब्रह्महा भवतीत्येवम्प्रकारं दीक्षाकवचं प्रविष्ट एव तस्थौ ॥ १०९ ॥

यज्ञदीक्षित क्षत्रिय आणि वैश्यांना मारल्याने ब्रह्महत्या होते, म्हणून अक्रूर सदा यज्ञदीक्षारूप कवच धारण करत होता ॥१०९॥


 द्विषष्टिवर्षाण्येव तन्मणिप्रभावात् तत्रोपसर्ग दुर्भिक्षमारिकामरणादिकं नाभूत् ॥ ११० ॥

त्या मणीच्या प्रभावाने बासष्ठ वर्ष द्वारकेत रोग, दुर्भिक्ष, महामारी किंवा मृत्यु नाही झाला ॥११०॥


अथाक्रूरपक्षीयैः भोजैः शत्रुघ्ने सात्वतस्य प्रपौत्रे व्यापादिते भोजैः सहाक्रूरो द्वारकामपहायापक्रान्तः ॥ १११ ॥

मग आपल्याच पक्षाच्या भोजवंशींद्वारा सात्वतचा प्रपौत्र शत्रुघ्न मारला गेल्यावर भोजांसोबत अक्रूर सुद्धा द्वारका सोडून निघून गेला ॥१११॥



 तदपक्रान्तिदिनादारभ्य तत्रोपसर्ग दुर्भिक्षव्यालानावृष्टिमारिकाद्युपद्रवा बभूवुः ॥ ११२ ॥

त्या दिवसापासूनच द्वारकेत रोग, दुर्भिक्ष, सर्प, अनावृष्टि आणि मरी आदि उपद्रव होऊ लागले ॥११२॥


अथ यादव बलभद्रोग्रसेनसमवेतो मन्त्रममन्त्रयद् भगवानुरगारिकेतनः ॥ ११३ ॥

तेव्हा गरुडध्वज भगवान कृष्ण, बलभद्र आणि उग्रसेन आदि यदुंवशिंसोबत एकत्र सल्लामसलत करू लागले ॥११३॥

 किमिदमेकदैव प्रचुरोपद्रवागमनं एतदालोच्यतां इत्युक्तेन्धकनामा यदुवृद्धः प्राह ॥ ११४ ॥

‘अचानक इतके सगळे उपद्रव का सुरू झाले ह्याचा विचार करायला हवा.' ह्यावर अन्धक नामक एक वृद्ध यादव म्हणाला ॥११४॥



 अस्याक्रूरस्य पिता श्वफल्को यत्र यत्राभूत्तत्रतत्र दुर्भिक्षमारिकानावृष्ट्यादिकं नाभूत् ॥ ११५ ॥

' अक्रुरचे पिता श्वफल्क जिथेजिथे राहायचे तिथे दुर्भिक्ष, महामारी आणि अनावृष्टि आदि उपद्रव कधीच होत नसत ॥११५॥

 

काशीराजस्य विषये त्वनावृष्ट्या च श्वफल्को नीतः ततश्च तत्क्षणाद्देवो ववर्ष ॥ ११६ ॥

एकदा काशिराजाच्या देशात अनावृष्टि झाली होती. तेव्हा श्वफल्काला तिकडे घेऊन जाताच वर्षा होऊ लागली ॥११६॥

 


 काशीराजपत्‍न्याश्च गर्भे कन्यारत्‍नं पूर्वमासीत् ॥ ११७ ॥

त्यावेळी काशिराजच्या राणीच्या गर्भात एक कन्यारत्न होते ॥११७॥



 सा च कन्या पूर्णेऽपि प्रसूतिकाले नैव निश्चक्राम ॥ ११८ ॥
 एवं च तस्य गर्भस्य द्वादशवर्शण्यनिष्क्रामतो ययुः ॥ ११९ ॥
 काशीराजश्च तामात्मजां गर्भस्थामाह ॥ १२० ॥

ती कन्या प्रसुतिकाळ समाप्त झाल्यावरही गर्भातून बाहेर आली नाही. अशाप्रकारे बारा वर्ष झाली तरी तो गर्भ प्रसवला नाही. तेव्हा काशिराजाने आपल्या त्या गर्भस्थिता कन्येला म्हटले ॥११८-१२०॥



 पुत्रि कस्मान्न जायसे निष्क्रम्यतामास्यं ते द्रष्टुमिच्छामि एतां च मातरं किमिति चिरं क्लेशयिष्यसीत्युक्ता गर्भस्थैव व्याजहार ॥ १२१ ॥

' बाळा! तु उत्पन्न का होत नाहीस? बाहेर ये, मला तुझा चेहरा पाहायचा आहे ॥१२१॥

 

 तात यद्येकैकां गां दिने दिने ब्राह्मणाय प्रयच्छसि तदहमन्यैस्त्रिभिः वर्षैः अस्माद्‍गर्भात्ततोऽवश्यं निष्क्रमिष्यामि इत्येद्वचनमाकर्ण्य राजा दिने दिने ब्राह्मणाय गां प्रादात् ॥ १२२ ॥

आपल्या मातेला तु इतके दिवस कष्ट का देत आहेस? ' राजाने असे म्हटल्यावर तिने गर्भातूनच म्हटले - पिताजी! जर तुम्ही प्रतिदिन एक गाय ब्राह्मणाला दान दिली तर आणखी तीन वर्षांनी अवश्य गर्भातून बाहेर येईन.' हे ऐकून राजा प्रतिदिन ब्राह्मणाला एक गाय देऊ लागला ॥१२२॥



सापि तावता कालेन जाता ॥ १२३ ॥

त्यानंतर तीन वर्ष झाल्यावर ती बाहेर आली ॥ १२३॥



 ततस्तस्याः पिता गान्दिनीति नाम चकार ॥ १२४ ॥

पित्याने तिचे नाव गान्दिनी ठेवले ॥१२४॥


 तां च गान्दिनीं कन्यां श्वफलकायोपकारिणे गृहमागतायार्घ्य भूतांप्रादात् ॥ १२५ ॥

आणि उपकाराच्या बदल्यात श्वफल्काला तो घरी आला असला आपली कन्या अर्घ्यरूपात दिली ॥१२५॥

 
तस्यामयमक्रूरः श्वफलकाज्जज्ञे ॥ १२६ ॥

तिच्यापासूनच श्वफल्क द्वारा अक्रूराचा जन्म झाला ॥१२६॥


 तस्यैवङ्‍गुणमिथुनादुत्पत्तिः ॥ १२७ ॥

 तत्कथमस्मिन्नपक्रान्तेऽत्र दुर्भिक्षमारिकाद्युपद्रवा न भविष्यन्ति ॥ १२८ ॥

अशा गुणवान् माता - पित्यापासून ज्याची उप्तत्ति आहे तो निघून गेल्याने इथे दुर्भिक्ष आणि महामारी आदि उपद्रव का नाही होणार? ॥१२७-१२८॥



 
 तदयमात्रानीयतामलमतिगुणवत्यपराधान्वेषणेनेति यदुवृद्धस्य अन्धकस्यैतद्वचनमाकर्म्य केशवोग्रसेनबलभद्रपुरोगमैः यदुभिः कृतापराधतितिक्षुभिरभयं दत्त्वा श्वफलकपुत्रः स्वपुरमानीतः ॥ १२९ ॥

म्हणून त्याला परत इथे आणायला हवे, अति गुणवानाच्या अपराधांची अधिक चिकित्सा करणे योग्य नाही. यादववृद्ध अन्धकने असे म्हटल्यावर कृष्ण, उग्रसेन आणि बलभद्र आदि यादव श्वफल्कपुत्र अक्रूरचा अपराध विसरून त्याला अभयदान देऊन आपल्या नगरात घेऊन आले ॥१२९॥

 

 तत्र चागतमात्र एव तस्य स्यमन्तकमणेः प्रभावाद् अनावृष्टिमारिकादुर्भिक्ष व्यालाद्युपद्रवोपशमा बभूवुः ॥ १३० ॥

तो परत येताच स्यमन्तकमण्याच्या प्रभावाने अनावृष्टि, महामारी, दुर्भिक्ष आणि सर्पभय आदि सर्व उपद्रव्य शान्त झाले ॥१३०॥


 कृष्णश्चिन्तयामास ॥ १३१ ॥

तेव्हा श्रीकृष्णाने विचार केला ॥१३१॥

 
 स्वल्पमेतत्कारणं यदयं गान्दिन्यां श्वफलकेनाक्रूरो जनितः ॥ १३२ ॥

अक्रुरचा जन्म गान्दिनीपासून श्वफल्क द्वारा झाला हे फारच सामान्य कारण आहे ॥१३२॥

 

 सुमहांश्चायं अनावृष्टिदुर्भिक्ष मारिकाद्युपद्रवाप्रतिषेधकारी प्रभावः ॥ १३३ ॥

पण अनावृष्टि, दुर्भिक्ष, महामारी आदि उपद्रव शान्त करणारा त्याचा प्रभाव अतिशय महान आहे ॥१३३॥


 तन्नृनमस्य सकाशे स महामणिः स्यमन्तकाख्यस्तिष्ठति ॥ १३४ ॥

अवश्य त्याच्या जवळ स्यमन्तक नामक महामणि आहे ॥१३४॥



 तस्य ह्योवंविधाः प्रभावाः श्रूयन्ते ॥ १३५ ॥

त्याचा प्रभाव असा असल्याचे ऐकले आहे ॥१३५॥

 

अयमपि च यज्ञादनन्तरमन्यत्क्रत्वन्तरं तस्यानन्तरमन्यद्यज्ञान्तरं चाजस्त्रमविच्छिन्नं यजतीति ॥ १३६ ॥

असे दिसते की तो एका यज्ञानंतर दूसरा, त्यानंतर तीसरा असे निरन्तर अखण्ड यज्ञनुष्ठान करत राहतो ॥१३६॥

 
अनल्पोपादानं चास्यासंशयमत्रासौ मणिवरस्तिष्ठितीति कृताध्यवसायो अन्यत्प्रयोजनमुद्दिश्य सकलयादवसमाजमात्मगृह एवाचीकरत् ॥ १३७ ॥

शिवाय त्याच्या जवळ धन आदि यज्ञसाधनही खूप कमी आहे; त्यामुळे त्याच्याकडे स्यमन्तकमणी आहे ह्यात शंकाच नाही. असा निश्चय करून मनात एक खास उद्देश ठेऊन त्याने सम्पूर्ण यादवांना आपल्या महालात एकत्रित केले ॥१३७॥


 तत्र चोपविष्टोष्वखिलेषु यदुषु पूर्वं प्रयोजनमुपन्यस्य पर्यवसिते च तस्मिन् प्रसङ्‍गान्तरपरिहासकथामक्रूरेण कृत्वा जनार्दनस्तमक्रूरमाह ॥ १३८ ॥

समस्त यदुवंशी तिथे आल्यावर आधी प्रयोजन सांगून मग अक्रुरला हसतहसत कृष्ण म्हणाला ॥१३८॥

 

 दानपते जानीम एव वय यथा शतधन्वना तदिदमखिलजगत् सारभूतं स्यमन्तकं रत्‍नं भवतः तदशेषराष्ट्रोपकरकं भवत्सकाशे तिष्ठति तिष्ठतु सर्व एव वयं तत्प्रभावफलभुजः किं त्वेष बलभद्रोऽस्मान् आशङ्‍‍कितवांस्तदस्मत्प्रीतये दर्शयस्वेत्यभिधाय जोषं स्थिते भगवति वासुदेवे सरत्‍नःसोचिन्तयत् ॥ १३९ ॥

"हे दानपते! शतधन्वाने तुला ज्याप्रकारे सम्पूर्ण विश्वाचा सारभुत हा स्यमन्तक नामक महामणी दिला ते सर्व मला माहीत आहे. सम्पूर्ण राष्ट्राचे उपकार करणारा हा मणी तुझ्याजवळच असूदेत, त्याच्या प्रभावाचे फळ आपण सगळे भोगत आहोत, पण हा बलभद्र माझ्यावर उगाच शंका घेत होता, म्हणून केवळ समाधानासाठी फक्त एकदा तो मणी दाखव." वासुदेवाने असे म्हटल्यावर रत्न स्वतःजवळच असल्याने अक्रुर विचारात पडला ॥१३९॥



 किमत्रानुष्ठेयमन्यथा चेद्‍ब्रवीम्यहं तत्केवलाम्बर तिरोधानमन्विष्यन्तो रत्‍नमेते द्रक्ष्यन्ति अतिविरोधो न क्षम इति सञ्चिन्त्य तमखिलजगत्कारणभूतं नारायणमाहाक्रूरः ॥ १४० ॥

"आता मी काय करू? जर काही वेगळे उत्तर दिले तर माझे वस्त्र चाचपडले तरी त्यांना ते रत्न सहज दिसेल आणि त्यांचा विरोध करण्याचे कौशल्य माझ्यात नाही" असा विचार करून निखिल विश्वाचे कारणस्वरूप असलेल्या श्रीनारायणाला अक्रूर म्हणाला ॥१४०॥



 भगवन्ममैतत्स्यमन्तकरत्‍नं शतधनुषा समर्पितमपगते च तस्मिन्नद्य श्वः परश्वो वा भगवान् याचयिष्यतीति कृतमतिः तिकृच्छ्रेणैतावन्तं कालमधारयम् ॥ १४१ ॥

" भगवंत! शतधन्वाने मला तो मणी दिला होता. त्याच्या मृत्युनंतर तुम्ही तो आज उद्या माझ्याकडे नक्की मागाल म्हणून खूप मी तो खूप सांभाळून माझ्याजवळ ठेवला ॥१४१॥


 तस्य च धारणशेक्लेनाहं अशेषोपभोगेष्वसङ्‍गिमानसो न वेद्मि स्वसुखकलामपि ॥ १४२ ॥
त्याची रक्षा करण्याच्या जोखीमेमुळे होत असलेल्या क्लेशांनी सम्पूर्ण भोगात अनासक्तचित्त असल्याने मला सुखाचा लवलेशही मिळत नाही ॥१४२॥


 एतावन्मात्रमप्यशेषराष्ट्रोपकारी धारयितुं न शक्नोति भवान्मन्यत इत्यात्मना न चोदितवान् ॥ १४३ ॥

भगवंत आपण विचार केला असता की “हा सम्पूर्ण राष्ट्रासाठी उपकारक असणारा इतकासा भारही सहन करू शकत नाही” म्हणून मी स्वतः हे तुम्हाला सांगितले नाही ॥१४३॥



तदीदं स्यमन्तकरत्‍नं गृह्यतामिच्छया यस्याभिमतं तस्य समर्प्यताम् ॥ १४४ ॥

आता, हा घ्या तुमचा स्यमन्तकमणी, तुमची इच्छा असेल त्याला द्या " ॥१४४॥



 ततः स्वोदरवस्त्रनिगोपितमति लघुकनकसमुद्‍गकगतं प्रकटीकृतवान् ॥ १४५ ॥
 ततश्च निष्क्राम्य स्यमन्तकमणिं तस्मिन्यदुकुलसमाजे मुमोच ॥ १४६ ॥

तेव्हा अक्रुरने आपल्या कटिवस्त्रात लपवलेली एक छोटी सुवर्ण पेटी ज्यात स्यमन्तकमणि ठेवला होता ती बाहेर काढली आणि यादवसमाजा समोर ठेवली॥१४५-१४६॥


 मुक्तमात्रे च तस्मिन्नतिकान्त्या तदखिलमास्थानमुद्योतितम् ॥ १४७ ॥

तो तिथे ठेवताच ते सम्पूर्ण स्थान त्याच्या तीव्र कान्तिने देदीप्यमान होऊ लागले ॥१४७॥

 

 अथाहाक्रुरः स एष मणिः शतधन्वनास्माकं समर्पितः यस्यायं स एनं गृह्णातु इति ॥ १४८ ॥

तेव्हा अक्रुर म्हणाला, "मला हा मणी शतधन्वाने दिला होता, हा ज्याचा आहे त्याने घ्यावा” ॥१४८॥



तमालोक्य सर्वयादवानां साधुसाध्विति विस्मितमनसां वाचोऽश्रूयन्त ॥ १४९ ॥

तो मणी पाहून सर्व यादव विस्मयपूर्वक 'साधु, साधु' म्हणू लागले ॥१४९॥

 
 तमालोक्यातीव बलभद्रो ममायमच्युतेनैव सामान्यःसमन्विप्सित इति कृतस्पृहोऽभूत् ॥ १५० ॥

त्याला पाहून बलभद्राने 'अच्युतासारखाच माझाही ह्यावर समान अधिकार आहे' असे म्हणून आपली इच्छा व्यक्त केली ॥१५०॥


 ममैवायं पितृधनमित्यतीव च सत्यभामापि स्पृहयाञ्चकार ॥ १५१ ॥

तसेच 'ही माझीच पैतृक सम्पत्ति आहे' असे म्हणून सत्यभामाने सुद्धा त्या मण्याविषयी असलेली आपली उत्कट अभिलाषा प्रकट केली ॥१५१॥



 बलसत्यावलोकनात् कृष्णोप्यात्मानं गोचक्रान्तरावस्थितमिव मेने ॥ १५२ ॥

बलभद्र आणि सत्यभामेला पाहून कृष्णाला तो बैल आणि चक्राच्या मध्ये पडलेल्या जीवासमान दोन्ही बाजूंनी संकटात सापडल्याचे कळले ॥१५२॥

 

सकलयादवसमक्षं चाक्रूरमाह ॥ १५३ ॥

आणि सर्व यादवांसमोर अक्रुरला म्हणाले ॥१५३॥

 


 एतद्धि मणिरत्‍नमात्मसंसोधनाय एतेषां यदूनां मया दर्शितम् एतच्च मम बलभद्रस्य च सामान्यं पितृधनं चैतत्सत्यभामाया नान्यस्यैतत् ॥ १५४ ॥

"हे मणिरत्न माझ्यावरील संशय दूर करण्यासाठीच मी ह्या यादवांना दाखवले. ह्या मण्यावर माझा आणि बलभद्राचा समान अधिकार आहे आणि सत्यभामेची ही पैतृक सम्पत्ति आहे; इतर कोणाचाही ह्यावर कोणताही अधिकार नाही ॥१५४॥



 एतच्च सर्वकालं शुचिना ब्रह्मचर्यादिगुणवता ध्रियमाममशेषराष्ट्रस्य उपकारकमशुचिना ध्रयमाणमाधारमेव हन्ति ॥ १५५ ॥

हा मणी सदैव शुद्ध आणि ब्रह्मचर्य आदि गुणयुक्त राहून धारण केल्याने सम्पूर्ण राष्ट्राचे हित करतो पण अशुद्धावस्थेत धारण केल्यास आपल्या आश्रयदात्याला सुद्धा मारून टाकतो ॥१५५॥

 
अतोऽहमस्य षोडशस्त्रीसहस्र परिग्रहादसमर्थो धारणे कथमेतत्सत्यभामा स्वीकरोति ॥ १५६ ॥

माझ्या सोळा हजार स्त्रिया आहेत, म्हणून मी हा धारण करण्यास समर्थ नाही, म्हणूनच सत्यभामा सुद्धा हा धारण करण्यास समर्थ नसल्याने, ती हा कसा धारण करू शकेल? ॥१५६॥


 आर्यबलभद्रेणापि मदिरापानादि अशेषोपभोगपरित्यागः कार्यः ॥ १५७ ॥

आर्य बलभद्राला सुद्धा ह्या मण्यासाठी मदिरापान आदि सम्पुर्ण भोगांचा त्याग करावा लागेल ॥१५७॥


 तदलं यदुलोकोऽयं बलभद्रः अहं च सत्या च त्वां दानपते प्रार्थयामः ॥ १५८ ॥
 तद्‍भवानेव धारयितुं समर्थः ॥ १५९ ॥

म्हणून हे दानपते! हे यादवगण, बलभद्र, मी आणि सत्यभामा सर्व मिळून आपल्याला प्रार्थना करतो की हा धारण करण्यास आपणच समर्थ आहात ॥१५८-१५९॥


 त्वद्धृतं चास्य राष्ट्रस्योपकारकं तद्‍भवानशेषराष्ट्रनिमित्तं एतत्पूर्ववद्धारयत्वन्यन्न वक्तव्यमित्युक्तो दानपतिस्तथेत्याह जग्राह च तन्महारत्‍नम् ॥ १६० ॥
 ततः प्रभृत्यक्रूरः प्रकटेनैव तेनातिजाज्ज्वल्यम्नेन आत्मकण्ठावसक्तेनादित्य इवांशुमाली चचार ॥ १६१ ॥

आपण धारण केल्याने हा मणी सम्पुर्ण राष्ट्राचे हित करेल, म्हणून सम्पूर्ण राष्ट्राच्या मंगलासाठी आपणच ह्याला पूर्ववत धारण करावे; ह्या विषयी आपण आणखी काहीच बोलू नका. "भगवंताने असे म्हटल्यावर दानपति अक्रुरने जशी आज्ञा असे म्हणून ते महारत्न घेतले. तेव्हापासून अक्रुर सर्वांसमोर तो अति देदीप्यमान मणी आपल्या गळ्यात धारण करून सूर्या समान किरणजालांनी युक्त होऊन विचरण करू लागला ॥१६०-१६१॥



इत्येतद्‍भगवतो मिथ्याभिशस्तिक्षालनं यः स्मरति न तस्य कदाचिदल्पापि मिथ्याभिशस्तिर्भवति अव्याहत अखिलेन्द्रियश्च अखिलपापमोक्षमवाप्नोति ॥ १६२ ॥

भगवंताच्या ह्या मिथ्या कलंक प्रसंगाचे जो कोणी स्मरण करेल त्याला कधीही थोड़ा सुद्धा मिथ्या कलंक लागणार नाही, त्याची समस्त इंद्रिये समर्थ राहतील तसेच तो समस्त पापातून मुक्त होईल ॥१६२॥

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थांशे त्रयोदशोऽध्यायः (१३)

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...