शुक्रवार, ८ मे, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥


 

आभ्युदयिक श्राद्ध, प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार

और्व उवाच
सचैलस्य पितुः स्नानं जाते पुत्रे विधीयते ।
जातकर्म तदा कुर्याच्छ्राद्धमभ्युदये च यत् ॥ १ ॥

और्व म्हणाले : पुत्र जन्मानंतर पित्याने सचैल वस्त्र घातलेल्या अवस्थेत स्नान करून मगच जातकर्म संस्कार व आभ्युदायिक श्राद्ध करावे. ॥ १ ॥

 


 युग्मान्देवांश्च पित्र्यांश्च सम्यक्सव्यक्रमाद्‌द्विजान् ।
 पूजायेद्‍भोजयेच्चैव तन्मना नान्यमानसः ॥ २ ॥

मग एकाग्रतेने आणि अनन्यचित्ताने देवता आणि पितृगणांसाठी डाव्या व उजव्या बाजूला दोन दोन ब्राह्मणांना बसवून त्यांची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. ॥ २ ॥

 


 दध्यक्षतैः सबदरैः प्राङ्‍मुखोदङ्‍मुखोऽपि वा ।
 देवतीर्थेन वै पिण्डान्दद्यात्कायेन वा नृप ॥ ३ ॥

नंतर पूर्वेकडे व पश्चिमेकडे तोंड करून आपल्या दही, अक्षता आणि बदरीफलांनी बनवलेली पिंडे देवतीर्थ किंवा प्रजापतीतीर्थांना दान करावी. ॥ ३ ॥

 

 नान्दीमुखः पितृगणस्तेन श्राद्धेन पार्थिव ।
 प्रीयते तत्तु कर्तव्यं पुरुषैः सर्ववृद्धिषु ॥ ४ ॥

हे पृथ्वीनाथ, ह्या आभ्युदायिक श्राद्धाने नंदीमुख नावाचे पितृगण प्रसन्न होतात म्हणून सर्व आनंद प्रसंगी मनुष्याने ह्याचे अनुष्ठान केले पाहिजे .


 कन्यापुत्रविवाहेषु प्रवेशेषु च वेश्मनः ।
 नामकर्मणि बालानां चूडाकर्मादिके तथा ॥ ५ ॥
 सीमन्तोन्नयने चैव पुत्रादिमुखदर्शने ।
 नान्दीमुखं पितृगणं पूजयेत्प्रयतो गृही ॥ ६ ॥

मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहप्रसंगी, गृहप्रवेशाच्यावेळी, मुलाचे नाव ठेवताना, मुंज व इतर शुद्धीकरण प्रसंगी, गर्भार मातेचे केस बांधताना, प्रथम मुलाचा चेहरा पाहताना किंवा यासारख्या इतर प्रसंगी गृहस्थाने एकाग्रचित्ताने नान्दीमुख नामक पितृगणांची पूजा करावी . ५-६



 पितृपूजाक्रमः प्रोक्तो वृद्धावेष सनातनः ।
 श्रूयतामवनीपाल प्रेतकर्मक्रियाविधिः ॥ ७ ॥

अशा प्रसंगी करण्याच्या आभ्युदायिक श्राद्धात पितृपुजेचा क्रम तुला सांगितला. आता प्रेतक्रियेचे विधि करण्याचे नियम ऐक.

 


 प्रेतदेहं शभैः स्नानैः स्नापितं स्रग्विभूषितम् ।
 दग्ध्वा ग्रामाद्‍बहिः स्नात्वा सचैलःसलिलाशये ॥ ८ ॥
 यत्र तत्र स्थितायैतदमुकायेति वादिनः ।
 दक्षिणाभिमुखा दद्युर्बान्धवाःसलिलाञ्जलीन् ॥ ९ ॥

“मृतव्यक्तिच्या बंधु बांधवांनी पवित्र जलाने प्रेताला स्नान घालून, पुष्पमालांनी सजवून, गावाबाहेर त्या शवाचे दहन करावे. नंतर सचैल (वस्त्रासहित) स्नान करून, दक्षिणेकडे तोंड करून उभे राहावे, आणि मृत व्यक्तीचे नाव घेऊन हात जोडून, ​​'तू जिथे कुठे असशील .' असे उद्देशून जलांजलि द्यावी. ८-९

 


 प्रविष्टाश्च समं गोभिर्ग्रामं नक्षत्रदर्शने ।
 कटकर्म ततः कुर्युर्भूमौ प्रस्तरशायिनः ॥ १० ॥

मग गोधुलीच्या वेळी आकाशात तारामंडळ दिसू लागल्यावर गावात परतावे आणि अशौचकर्म आटपून जमिनीवर तृणाच्या शय्येवर झोपून विश्रांती घ्यावी. १०

 


 दातव्योनदिनं पिडः प्रेताय भुवि पार्थिव ।
 दिवा च भक्तं भोक्तव्यममांसं मनुजर्षभ ॥ ११ ॥

मृत व्यक्तीसाठी दररोज सूतक असेपर्यंत जमिनीवर पिंडदान करावे आणि दररोज फक्त दिवसा मांसरहित भात खावा. ११

 


 दिनानि तानि चेच्छातः कर्तव्यं विप्रभोजनम् ।
 प्रेता यान्ति तथा तृप्तिं बन्धुवर्गेण भुञ्जता ॥ १२ ॥

शोक करणाऱ्याने सुतकाच्या दिवसात ब्राह्मणांच्या इच्छेनुसार त्यांना भोजन द्यावे. असे केल्याने मृताच्या आत्म्याला समाधान मिळते . १२

 


 प्रथमेह्नि तृतीये च सप्तमे नवमे तथा ।
 वस्त्रत्यागबहिःस्नाने कृत्वा दद्यात्तिलोदकम् ॥ १३ ॥

सुतकाच्या पहिल्या, तिसऱ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशी नातेवाईकांनी वस्त्रांचा  त्याग करून दाराबाहेर स्नान करून तिलोदक (तिळाच्या दाण्यांनी जलार्पण) करावे.१३

 


 चतुर्थेह्नि च कर्तव्यं तस्यास्थिचयनं नृप ।
 तदूर्ध्वमङ्‍गसंस्पर्शःसपिण्डानामपीष्यते ॥ १४ ॥

चौथ्या दिवशी मृतव्यक्तिची राख व अस्थी गोळा कराव्यात. त्यानंतरच सपिंड बांधवाना अंगस्पर्श करता येतो. १४

 


 योग्याःसर्वक्रियाणां तु समनसलिलास्तथा ।
 अनुलेपनपुष्पादिभोगाद् अन्यत्र पार्थिव ॥ १५ ॥

ह्यांनतर समानोदक पुरूष चंदन आणि पुष्पधारण ह्या क्रिया सोडून इतर सर्व कर्म करू शकतो. १५

 


 शय्यासनोपभोगश्च सपिण्डानामपीष्यते ।
 भस्मास्थिचयनादूर्ध्वं संयोगो न तु योषिताम् ॥ १६ ॥

राख व अस्थी गोळा केल्यानंतर सपिंड पुरूष शय्या व आसनाचा वापर करू शकतात पण स्त्रीसंग नाही करू शकत.१६

 


 बाले देशान्तरस्थे च पतिते च मुनौ मृते ।
 सद्यः शौचं तथेच्छातो जलाग्न्युद्‍बन्धनादिषु ॥ १७ ॥

बालक, परदेशात राहणारी, पतित, किंवा तपस्वीच्या मृत्यु झालि असेल किंवा अग्नि, जल किंवा फाशी देण्याने मृत्यु झाला असल्यास लगेच सुतक संपते. १७

 


 मृतबन्धोर्दशाहानि कुलस्यान्नं न भुज्यते ।
 दानं प्रतिग्रहो होमः स्वाध्यायश्च निवर्तते ॥ १८ ॥

मृत व्यक्तिच्या कुटुंबातील अन्न दहा दिवस खाऊ नये तसेच सुतकाच्या काळात दान, परिग्रह, होम, स्वाध्याय आदि करू नयेत.१८

 


 विप्रस्यैतद्‌द्वादशाहं राजन्यस्याप्यशौचकम् ।
 अर्धमासं तु वैश्यस्य मासं शूद्रस्य शुद्धये ॥ १९ ॥

ब्राह्मणासाठी दहा दिवस, क्षत्रियासाठी बारा, वैश्यासाठी पंधरा आणि शूद्रासाठी एक महिना सुतकशुद्धी पाळावी .

 


 अयुजो भोजयेत्कामं द्विजानन्ते ततो दिने ।
 दद्याद्‌दर्भषु पिण्डं च प्रेतायोच्छिष्टसन्निधौ ॥ २० ॥

सुतक संपल्यावर इच्छेनुसार तीन, पाच, सात किंवा नऊ ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि त्यांच्या भोजनानंतर उरलेल्या उष्ट्या अन्ना जवळ कुश गवतावर मृत व्यक्तीसाठी पिंडदान करावे.२०

 


 वार्यायुधप्रतोदास्तु दण्डश्च द्विजभोजनात् ।
 स्प्रष्टव्योनन्तरं वर्णैः शुद्धेरन्ते ततः क्रमात् ॥ २१ ॥

ब्राह्मणांच्या भोजनानंतर, ब्राह्मण आदि चारही वर्णाच्या लोकांनी आपल्या जातीनुसार, पाण्याला, शस्त्राला, प्रतोद(कोडा) आणि लाठीला स्पर्श करावा. अशा संपर्काने तो शुद्ध झाला असे मानावे. २१

 


 ततःसर्वणधर्मा ये विप्रादिनामुदाहृताः ।
 तान्कुर्वीत पुमाञ्जीवेन्निजधर्मार्जनैस्तथा ॥ २२ ॥

त्यानंतर तो आपल्या जातीधर्माचे अनुसरण करून विहित कर्तव्याचे आचरण पुन्हा सुरू करू शकतो.२२

 


 मृताहनि च कर्तव्यमेकोद्दिष्टमतः परम् ।
 आह्वानादिक्रियादैवनियोगरहितं हि यत् ॥ २३ ॥
 एकोऽर्घ्यस्तत्र दातव्यस्तथैवैकपवित्रकम् ।
 प्रेताय पिण्डो दातव्यो भुक्तवत्सु द्विजातिषु ॥ २४ ॥

त्यानंतर एका वर्षासाठी प्रत्येक महिन्यातील मृत्युतिथीच्या दिवशी एकोद्दिष्ट श्राद्ध करावे ज्यात आवाहनादि क्रिया विश्वदेवसंबंधित ब्राह्मणांना आमंत्रण आदि नसावे. ह्यावेळी एक अर्घ्य आणि एक पवित्रक द्यावे आणि अनेक  ब्राह्मणांना भोजन देऊन मृत व्यक्तीसाठी एकच पिंडदान करावे. २३-२४

 


 प्रश्नश्च तत्राभिरतिर्यजमानद्विजन्मनाम् ।
 अक्षय्यममुकस्येति वक्तव्यं विरतौ तथा ॥ २५ ॥

यजमानाने ब्राह्मण संतुष्ट झाल्याची खात्री झाल्यावर त्यांच्या संमतीने, “ह्यामुळे मृतव्यक्ती सदैव संतुष्ट होवो” अशी प्रार्थना करावी.२५

 


 एकोद्दिष्टमयो धर्म इत्थमावत्सरात्स्मृतः ।
 सपिण्डीकरणं तस्मिन्काले राजेन्द्र चत्छृणु ॥ २६ ॥

हे एकोद्दिष्ट नावाचे श्राद्ध, व्यक्तीच्या मृत्यूपासून बारा महिने होईपर्यंत दर महिन्याला केले जाते; आणि बारा महिने झाले की सपिंडदान नावाचा संस्कारविधी करावा. २६

 


 एकोद्दिष्टविधानेन कार्यं तदपि पार्थिव ।
 संवत्सरेथ षष्ठे वा मासे वा द्वादशेह्नि तत् ॥ २७ ॥

सपिंडदान कार्य एक वर्ष, सहा महिने किंवा बारा दिवसानंतर एकोद्दिष्ट श्राद्धविधि प्रमाणेच करावे. २७

 


 तिलगन्धोदकैर्युक्तं तत्र पात्रचतुष्टयम् ॥ २८ ॥
 पात्रं प्रेतस्य तत्रैकं पैत्रं पात्रत्रयं तथा ।
 सेचयेत्पितृपात्रेषु प्रेतपात्रं ततस्त्रिषु ॥ २९ ॥

ह्यात पाणी, गंध आणि तीळ ह्यांची चार पात्र करावीत. पहिले पात्र मृतव्यक्तीसाठी आणि इतर तीन पितृगणासाठी असतात. नंतर मृताच्या पात्रातील जलादिंनी पितृगणांच्या पात्रांचे सिंचन करावे. २८-२९

 


 ततः पितृत्वमापन्ने तस्मिन्प्रेते महीपते ।
 श्राद्धधर्मैरशेषैस्तु तत्पूर्वानर्चयेत्पितॄन् ॥ ३० ॥

असे केल्याने मृत व्यक्ती पितृवर्गात समाविष्ट होते व त्याला पितृत्व प्राप्त होते. त्यानंतर मृतापासूनच सुरूवात करून पितृगणांचे पूजन करावे. ३०

 


 पुत्रः पौत्रः प्रपौत्रो वा भ्राता वा भ्रातृसन्ततिः ।
 सपिण्ड सन्ततिर्वापि क्रियार्हो नृप जायते ॥ ३१ ॥

पुत्र, नातू, पणतु, भाऊ, पुतण्या किंवा सपिंड संततित उत्पन्न झालेल्या पुरूषालाच श्राद्ध संस्कार करण्याचा अधिकार आहे. ३१

 


 तेषामभावे सर्वेषां समानोदकसन्ततिः ।
 मातृपक्षमपिण्डेन सम्बन्धा ये जलेन वा ॥ ३२ ॥

वरीलपैकी कोणीही नसेल तर अशावेळी समानोदक संतति किंवा मातृपक्षाचे सपिंड किंवा समानोदकाला हे कार्य करण्याचा अधिकार असतो. ३२

 


 कुलद्वयेपि चोच्छिन्ने स्त्रीभिः कार्याः क्रिया नृप ।
 पितृमातृसपिण्डैस्तु समानसलिलैस्तथा ॥ ३३ ॥

 सङ्‍घातान्तर्गतैर्वापि कार्याः प्रेतस्य च क्रियाः ।
 उत्सन्नबन्धुरिक्थाद्वा कारयेदवनीपतिः ॥ ३४ ॥

मातृ व पितृ दोन्ही बाजुच्या कुटुंबातील पुरूष वंश नामशेष झालेला असल्यास हे श्राद्धकार्य त्या कुटुंबातील स्त्री, एखाद्या धार्मिक अथवा सामाजिक संस्थेमार्फत मृत व्यक्तीशी संबंधित सहकाऱ्यांद्वारे किंवा मृतव्यक्तिची मालमत्ता मिळालेली व्यक्ती हे कार्य करू शकते. ३३-३४

 


 पूर्वाः क्रिया मध्यमाश्च तथा चैवोत्तराः क्रियाः ।
 त्रिःप्रकाराः क्रियाःसर्वास्तासां भेदं शृणुष्व मे ॥ ३५ ॥

प्रेतकर्म तीन प्रकारची आहेत, पुर्वकर्म, मध्यमकर्म आणि उत्तरकर्म. त्यांची लक्षणे ऐक. ३५

 


 आदाहवार्यायुधादिस्पर्शाद्यन्तास्तु याः क्रियाः ।
 ताः पूर्वा मध्यमा मासि मास्येकोद्दिष्टसंज्ञिताः ॥ ३६ ॥

पहिला प्रकार म्हणजे प्रेत जाळल्यानंतर जल आणि शस्त्रांचा स्पर्श होईपर्यंत जी कर्म पाळली जातात त्यांना पुर्वकर्म म्हणतात . दर महिन्याला जे एकोद्दिष्ट नावाचे श्राद्ध केले जाते ते मध्यमकर्म. ३६

 


 प्रेते पितृत्वमापन्ने सपिण्डिकरणादनु ।
 क्रियन्ते याः क्रियाः पित्र्याः प्रोच्यन्ते ता नृपोत्तराः ॥ ३७ ॥

आणि सपिंडिकरण ज्यामुळे मृत व्यक्तीला पितृत्व प्राप्त होते त्यानंतर केली जाणारी सर्व पितृकर्म म्हणजे उत्तरकर्म.३७

 


 पितृमातृसपिण्डैस्तु समानसलिलैस्तथा ।
 सङ्‍घातान्तर्गतैर्वापि राज्ञा तद्धनहारिणा ॥ ३८ ॥
 पूर्वाः क्रियाश्च कर्तव्याः पुत्राद्यैरेव चोत्तराः ।
 दौहित्रैर्वा नृपश्रेष्ठ कार्यास्तत्तनयैस्तथा ॥ ३९ ॥

पुर्वकर्म मृताचे वडिल, आई, सपिंड, समानोदक, नातेवाईक, सहकारी, त्याच्या मालमत्तेचा वारसदिर किंवा राजा करू शकतो. पण उत्तरकर्म पुत्र, दौहित्र किंवा त्यांच्या संततिनेच कले पाहिजे. ३८-३९

 


 मृताहनि च कर्तव्याः स्त्रीणामप्युत्तराः क्रिया ।
 प्रतिसंवत्सरं राजन्नेकोद्दिष्टविधानतः ॥ ४० ॥
 तस्मादुत्तरसंज्ञायाः क्रियास्ताः शृणु पार्थिव ।
 यथा यथा च कर्तव्या विधिना येन चानघ ॥ ४१ ॥

स्त्रियांचे उत्तरकर्म सुद्धा एकोद्दिष्ट श्राद्धविधिने दरवर्षी त्यांच्या मृत्यु तिथिला केले पाहिजे. ह्या उत्तरक्रिया कोणीकोणी व कशा प्रकारे कराव्या हे मी आता तुला सांगतो.” ४०-४१

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीये अं
शे त्रयोदशोध्यायः (१३)



 

 

मंगळवार, ५ मे, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, द्वादश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 12

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ तृतीयः अंशः ॥ द्वादशोऽध्यायः ॥

 

"ग्रहस्थ सम्बन्धी सदाचार वर्णन"

और्व उवाच
 देवगोब्राह्मणान्त्सिद्धान्वृद्धाचार्यांस्तथार्चयेत् ।
 द्विकालं च नमेत्सन्ध्यामग्नीनुपचरेत्तथा ॥ १ ॥

और्व म्हणाले ;– गृहस्थ पुरुषाने नित्य देवता, गौ, ब्राह्मण, सिद्धगण, वयोवृद्ध तथा आचार्यांची पूजा करावी आणि दोन वेळा संध्यावन्दन व अग्निहोत्रादि कर्म करावे || ||

 


सदाऽनुपहते वस्त्रे प्रशस्ताश्च महोषधीः ।
गारुडानि च रत्‍नानि बिभृयात्प्रयतो नरः ॥ २ ॥

गृहस्थाने सदा संयमी राहून कुठूनही न फाटलेली दोन वस्त्रे, उत्तम औषधि व गारुड (मरकत आदि विष नष्ट करणारे) रत्न धारण करावे || ||

 


 प्रस्निग्धामलकेशश्च सुगन्धश्चारुवेषधृक् ।
 सिताः सुमनसो हृद्या विभृयाच्च नरः सदा ॥ ३ ॥

केस स्वच्छ व तैलयुक्त असावेत तसेच सर्वदा सुगंधयुक्त सुंदर वेष आणि मनोहर श्वेतपुष्प धारण करावे || ||

 


किञ्चित्परस्वं न हरेन्नल्पमप्यप्रियं वदेत् ।
प्रियं च नानृतं ब्रूयान्नान्यदोषानुदीरयेत् ॥ ४ ॥

कोणाचेही थोडेसेसुद्धा धन हरण करू नये व जरा सुद्धा प्रिय भाषण करू नये . खोटे असलेले प्रिय वचनही बोलू नये व दुसर्‍याचे दोष सुद्धा सांगू नयेत || ||

 


 नान्यस्त्रियं तथा वैरं रोचयेत्पुरुषर्षभ ।
 न दुष्टं यानमारोहेत्कूलच्छायां न संश्रयेत् ॥ ५ ॥

हे पुरुषश्रेष्ठा ! दूसर्‍याच्या स्त्रीविषयी किंवा दुसर्‍यासोबत वैर वैर करण्यात कधीही रूचि ठेऊ नये, निन्दित वाहनात कधी चढू नये आणि नदीतीराच्या छायेचा आश्रय घेऊ नये || ||

 


 विद्विष्टपतितोन्मत्तबहुवैरादिकीटकैः ।
 बंधकी बन्धकीभर्तुः क्षुद्रानृतकथैः सह ॥ ६ ॥
 तथातिव्ययशीलैश्च परिवादरतैः शठैः ।
 बुधो मैत्रीं न कुर्वात नैकः पन्थानमाश्रयेत् ॥ ७ ॥

बुद्धिमान पुरुषाने लोकविदिष्ट, पतित, उन्मत्त व ज्याचे भरपूर शत्रु आहेत अशा परपीडक पुरुषांसोबत तसेच कुलटा, कुलटेचा स्वामी, क्षुद्र, मिथ्यावादी अति व्ययशील, निंदापरायण आणि दुष्ट पुरुषांसोबत कधी मैत्री करू नये व मार्गात कधी एकट्यानेही चालू नये || ६ – ७ ||

 


 नावगाहेज्जलोघस्य वेगमग्रे नपेश्वर ।
 प्रदीप्तं वेश्म न विशेन्नारोहेच्छिखरं तरोः ॥ ८ ॥

हे नरेश्वरा ! जलप्रवाहाच्या वेगात समोर पडून स्नान करू नये, जळत्या घरात प्रवेश करू नये व वृक्षाच्या टोकावर चढू नये || ||

 


 न कुर्याद्दन्तसङ्‍घर्षं कुष्णियाच्च न नासिकाम् ।
 नासंवृतमुखो जृम्भेच्छ्वासकासो विसर्जयेत् ॥ ९ ॥
 नोच्चैर्हसेत्सशब्दं च न मुञ्चेत्पवनं बुधः ।
 नखान्न खादयेच्छिन्द्यान्न तृणं न महीं लिखेत् ॥ १० ॥

दात एकमेकांवर घासू नयेत, नाकात बोटे घालू नयेत, तोंड बंद ठेऊन जांभई देऊ नये किंवा खोकू नये किंवा श्वास घेताना अधोवायु सोडू नये; तसेच नखं चावू नयेत , काटकी तोडू नये व पृथ्वीवर लिहू नये || ९-१० ||



 न श्मश्रु भक्षयेल्लोष्टं न मृद्‌नीयाद्विचक्षणः ।
 ज्योतींष्यमेध्यशस्तानि नाभिवीक्षेत च प्रभो ॥ ११ ॥

हे प्रभो ! विचक्षण पुरुषाने दाढी मिशींचे केस चावू नयेत किंवा परस्परांना रगडू नयेत आणि अपवित्र व निन्दित नक्षत्रं पाहू नयेत || ११ ||

 

 

 नग्नां परस्त्रियं चैव सूर्यं चास्तमयोदये ।
 न हुङ्‍कुर्याच्छवं गन्धं शवगन्धोहि सोमज ॥ १२ ॥

नग्न परस्त्री तसेच उदय किंवा अस्त होणारा सूर्य पाहू नये तसेच शव आणि शव गंधाची घृणा करू नये, कारण शव गंध सोमाचा अंश आहे || १२ ||

 


 चतुष्पथं चैत्यतरुं श्मशानोपवनानि च ।
 दुष्टस्त्रीसन्निकर्षं च वर्जयेन्निशि सर्वदा ॥ १३ ॥

चाररस्ता, चैत्यवृक्ष, स्मशान, उपवन आणि दुष्ट स्त्रीशी सलगी ह्या सर्वांचा  रात्रीच्या वेळी सर्वदा त्याग करावा || १३ ||

 

 

 पूज्यदेवद्विजज्योतिश्छायां नातिक्रमेद् बुधः ।
 नैकः शून्याटवीं गच्छेत्तथा शून्यगृहे वसेत् ॥ १४ ॥

बुद्धिमान पुरुषाने आपली पूजनीय देवता, ब्राह्मण व तेजोमय पदार्थांची सावली कधीच ओलांडू नये तसेच शून्य वनखंडी व शून्य घरात कधीच एकटे राहू नये || १४ ||

 


 केशास्थिकण्टकामेध्यबलिभस्मतुषांस्तथा ।
 स्नानार्द्रधरणीं चैव दूरतः परिवर्जयेत् ॥ १५ ॥

प्राज्ञ पुरुषाने अनार्य व्यक्तिचा संग करू नये , कुटिल पुरुषात आसक्त होऊ नये, सापाजवळ जाऊ नये व जाग आल्यावर खूपवेळ लोळत राहू नये || ||

 


 नानार्यानाश्रयेत्कांश्चिन्न जिह्मं रोचयेद्‍बुधः ।
 उपसर्पेन्न वै व्यालं चिरं तिष्ठेन्न वोत्थितः ॥ १६ ॥
 अतीव जागरस्वप्ने तद्वत्स्थानासने बुधः ।
 न सेवेत तथा शय्यां व्यायामं च नरेश्वर ॥ १७ ॥

हे नरेश्वरा ! बुद्धिमान पुरुषाने नुसतं जागं राहण्यात, झोपण्यात, स्नान करण्यात, बसण्यात, शय्यासेवन करण्यात व व्यायाम करण्यात अधिक समय घालवू नये || १६-१७ ||

 


 दंष्ट्रिणः शृङ्‌‍गिणश्चैव प्राज्ञो दूरेण वर्जयेत् ।
 अवश्यायं च राजेन्द्र पुरोवातातपौ तथा ॥ १८ ॥

हे राजेन्द्रा ! प्राज्ञ पुरुषाने दात व शींग असलेल्या पशुंचा, ओस(हिंदी) तसेच सामनेकी वायु व धूप(हिंदी) सर्वदा परित्याग करावा ||१८ ||

 

 

 न स्नायान्न स्वपेन्नग्नो न चैवोपस्पृशेद्‍ बुधः ।
 मुक्तकेशश्च नाचामेद्देवाद्यर्चां च वर्जयेत् ॥ १९ ॥

नग्न होऊन स्नान, शयन व आचमन करू नये व केस मोकळे सोडून आचमन आणि देव-पूजा करू नये || १९ ||

 

 

 होमदेवार्चनाद्यासु क्रियास्वाचमने तथा ।
 नैकवस्त्रः प्रवर्तेत द्विजवाचनिके जपे ॥ २० ॥

होम तसेच देवार्चन, आचमन , पुण्याहवाचन आणि जप करताना एक वस्त्र धारण करून प्रवृत्त होऊ नये || २० ||



 नासमञ्जसशीलैस्तु सहासीत कथञ्चन ।
 सद्‍बुत्तसन्निकर्षो हि क्षणार्धमपि शस्यते ॥ २१ ॥

संशयशील व्यक्तिंसोबत कधीच राहू नये . सदाचारी पुरुषांचा तर अर्ध्या क्षणाचा संग सुद्धा अति प्रशंसनीय असतो || २१ ||

 


 विरोधं नोत्तमैर्गच्छेन्नाधमैश्च सदा बुधः ।
 विवाहश्च विवादश्च तुल्यशीलैर्नृपेष्यते ॥ २२ ॥

बुद्धिमान पुरुषाने उत्तम किंवा अधम व्यक्तिंचा विरोध करू नये . हे राजन ! विवाह व विवाद सदैव समान व्यक्तिं सोबतच असावा || २२ ||

 


 नारभेत कलं प्राज्ञः शुष्कवैरं च वर्जयेत् ।
 अप्यल्पहानिःसोढव्या वैरेणार्थागमं त्यजेत् ॥ २३ ॥

प्राज्ञ पुरुषाने कलह वाढवू नये तसेच व्यर्थ वैराचाही त्याग करावा . थोडे नुकसान सहन करावे, परंतु वैरामुळे फायदा होत असेल तर तेही सोडावे || २३ ||

 


स्नातो नाङ्‍गानि संमार्जेत्स्नानशाट्या न पाणिना ।
न च निर्धूतयेत्केशान्नाचामेच्चैव चोत्थितः ॥ २४ ॥

स्नान केल्यानन्तर स्नानाने भिजलेल्या धोतराने किंवा हाताने शरीर पुसू नये तसेच उभ्याउभ्या केस झाडू नयेत व आचमन करू नये || २४ ||

 


 पादेन नाक्रमेत्पादं न पूज्याविमुखं नयेत् ।
 नोच्चासनं गुरोरग्रे भजेताविनयान्वितः ॥ २५ ॥

पायावर पाय ठेऊ नये, गुरुजनां समोर पाय पसरवू नयेत आणि धृष्टतापूर्वक त्यांच्या समोर कधीही उच्चासनावर बसू नये || २५ ||



 अपसव्यं न गच्छेच्च देवागारचतुष्पथान् ।
 माङ्‍गल्यपूज्यांश्च तथा विपरीतान्न दक्षिणम् ॥ २६ ॥

देवालय, चाररस्ते, मांगलिक द्रव्य आणि पूज्य व्यक्ति – ह्या सर्वांना डाव्या बाजूला ठेऊन जाऊ नये तसेच ह्यांच्या उलट असलेल्या गोष्टी उजवीकडे ठेऊन जाऊ नये || २६ ||

 


 सोमार्काग्न्यम्बुवायूनां पूज्यानां च न संमुखम् ।
 कुर्यान्निष्ठीवविण्मुत्रसमुत्सर्गं च पण्डितः ॥ २७ ॥

चन्द्र, सूर्य, अग्नि, जल, वायु व पूज्य व्यक्तिं समोर पंडित पुरुषाने मलमूत्र त्याग करू नये व थुंकू नये || २७ ||

 


 तिष्ठन्न मूत्रयेत्तद्वत्पथिष्वपि न मूत्रयेत् ।
 श्लेष्मविण्मूत्ररक्तानि सर्वदैव न लङ्‍घयेत् ॥ २८ ॥

उभ्याउभ्या किंवा रस्त्यात मूत्र-त्याग करू नये तसेच थूक, विष्ठा, मूत्र आणि रक्त कधीही ओलांडून जाऊ नये || २८ ||

 


 श्लेष्मशिङ्‍घाणिकोत्सर्गो नान्नकाले प्रशस्यते ।
 बलिमङ्‍गलजप्यादौ न होमे न महाजने ॥ २९ ॥

भोजन, देव-पूजा, मांगलिक कार्य आणि जप-होमादिच्या वेळी तसेच महापुरुषांसमोर थूकणे व शिंकणे उचित नाही || २९ ||

 


 योषितो नावमन्येत न चासां विश्वसेद्‍बुधः ।
 न चैवेर्ष्या भवेत्तासु न धिक्कुर्यात्कदाचन ॥ ३० ॥

बुद्धिमान पुरुषांनी स्त्रियांचा अपमान करू नये, त्यांच्यावर विश्वासही ठेऊ नये, इर्ष्या व तिरस्कारही करू नये || ३० ||

 


मङ्‍गल्यपूर्वरत्‍नाज्यपूज्याननभिवाद्य च ।
न निष्क्रमेद्‍ गृहात्प्राज्ञःसदाचारपरो नरः ॥ ३१ ॥

सदाचार परायण प्राज्ञ व्यक्तिंना अभिवादन केल्याशिवाय घरून बाहेर पडू नये || ३१ ||

 


 चतुष्पथान्नमस्कुर्यात्काले होमपरो भवेत् ।
 दीनानभ्युद्धरेत्साधूनुपासीत बहुश्रुतान् ॥ ३२ ॥

चाररस्त्याला प्रणाम करावे, यथासमय अग्निहोत्र करावे, दीन-दु:खि लोकांचा उद्धार करावा आणि बहुश्रुत साधू पुरुषांचा सत्संग करावा || ३२ ||



 देवर्षिपूजकःसम्यक्‌पितृपिण्डोदकप्रदः ।
 सत्कर्ता चातिथीनां यः स लोकानुत्तमान्व्रजेत् ॥ ३३ ॥

जो पुरुष देवता व ऋषिंची पूजा करतो, पितृगणांना पिंडोदक देतो व अतिथिचा सत्कार करतो तो पुण्यलोकी जातो || ३३ ||

 


 हितं मितं प्रियं काले वश्यात्मा योऽभिभाषते ।
 स याति लोकानाह्लादहेतुभूतान् नृपाक्षयान् ॥ ३४ ॥

जो व्यक्ति जितेन्द्रिय होऊन समयानुसार हित, मित व प्रिय भाषण करतो, हे राजन ! त्याला आनंद हेतुभूत अक्षय लोक प्राप्त होतो || ३४ ||

 

 

 धीमान्ह्रीमान्क्षमायुक्तो ह्यास्तिको विनयान्वितः ।
 विद्याभिजनवृद्धानां याति लोकाननुत्तमान् ॥ ३५ ॥

बुद्धिमान, लज्जावान, क्षमाशील, आस्तिक व विनयी पुरुष विद्वान व कुलीन पुरुषांना योग्य अशा उत्तम लोकी जातो || ३५ ||

 


 अकालगार्जितादौ च पर्वस्वाशौचकादिषु ।
 अनध्यायं बुधः कुर्यादुपरागादिके तथा ॥ ३६ ॥

अकाल मेघगर्जनेच्या वेळी, पर्व-दिनी, अशौच काळी तसेच चन्द्र व सूर्यग्रहणाचे वेळी बुद्धिमान पुरुषाने अध्ययन करू नये || ३६ ||

 


 समं नयति यः क्रुद्वान्सर्वबन्धुरमत्सरी ।
 भीताश्वासनकृत्साधुःस्वर्गस्तस्याल्पकं फलम् ॥ ३७ ॥

जो व्यक्ति क्रोधित माणसाला शांत करतो, सर्वांचा बन्धु असतो, मत्सरशून्य असतो, भयभीत झालेल्याला सांत्वना देतो व साधू स्वभावाचा असतो त्याच्यासाठी स्वर्ग हे फार मोठे फळ आहे || ३७ ||

 


 वर्षातपादिषु च्छत्री दण्डी रात्र्यटवीषु च ।
 शरीरत्राणकामो वै सोपानत्कःसदा व्रजेत् ॥ ३८ ॥

ज्याला शरीर-रक्षणाची इच्छा असेल त्या पुरुषाने पिवसात व उन्हात छत्री घेऊन जावे, रात्रीच्या वेळी व वनात जाताना  काठी घेऊन जावे तसेच कुठेही जाताना पादत्राण घालूनच जावे || ३८ ||

 


 नोर्ध्वं न तिर्यग्दूरं वा न पश्यन्पर्यटेद्‍ बुधः ।
 युगमात्रं महीपृष्ठं नरो गच्छेद्विलोकयन् ॥ ३९ ॥

बुद्धिमान पुरुषाने कंबरेजवळ ,इथेतिथे किंवा दूरच्या गोष्टी बघत चालू नये, फक्त चार हाथ लांबवर पृथ्वीवर बघूनच चालावे || ३९ ||



 दोषहेतूनशेषांश्च वश्यात्मा यो निरस्यति ।
 तस्य धर्मार्थकामानां हानिर्नाल्पापि जायते ॥ ४० ॥

जो जितेन्द्रिय सर्व दूषित विषयांचा त्याग करतो त्याच्या धर्म, अर्थ आणि कामाची थोडीसुद्धा हानि होत नाही || ४० ||

 


 सदाचाररतः प्राज्ञो विद्याविनयशिक्षितः ।
 पापेऽप्यपापः परुषे ह्यभिधत्ते प्रियाणि यः ।
 मैत्रीद्रवान्तः करणस्तस्य मुक्तिः करे स्थिता ॥ ४१ ॥

जो विद्या-विनय-सम्पन्न, सदाचारी प्राज्ञ पुरुष पापी माणसाकडे पापमय व्यवहार करत नाही, कुटिल पुरुषाकडेही प्रिय भाषण करतो तसेच ज्याचे अंत:करण मैत्रीने द्रवीभूत असते, त्याच्या मुठीत मुक्ति असते || ४१ ||

 


 ये कामक्रोधलोभानां वीतरागा न गोचरे ।
 सदाचारस्थितास्तेषामनुभावैर्धृता मही ॥ ४२ ॥

जो वीतरागमहापुरुष कधीही काम, क्रोध व लोभादिना वशीभूत होत नाही तसेच सर्वदा सदाचारी राहतो त्याच्या प्रभावा मुळेच ही पृथ्वी टिकून आहे || ४२ ||

 


 तस्मात्सत्यं वदेत्प्राज्ञो यत्परप्रीतिकारणम् ।
 सत्यं यत्परदुःखाय तदा मौनपरो भवेत् ॥ ४३ ॥

म्हणूनच प्राज्ञ पुरुषाने असेच सत्य भाषण करावे ज्यामुळे दूसरे प्रसन्न राहतील . जर एखाद्या सत्य वाक्यामुळे दुसर्‍याला दुःख होणार असेल तर मौन रहावे || ४३ ||

 


 प्रियमुक्तं हितं नैतदिति मत्वा न तद्वदेत् ।
 श्रेयस्तत्र हितं वाच्यं यद्यप्यत्यन्तमप्रियम् ॥ ४४ ॥

प्रिय वाक्य अहितकरी असले तर ते बोलू नये; अशावेळी हितकरच बोलावे, मग ते अत्यंत अप्रिय असले तरी हरकत नाही || ४४ ||

 


 प्राणीनामुपकाराय यथैवेह परत्र च ।
 कर्मणा मनसा वाचा तदेव मतीमान्वदेत् ॥ ४५ ॥

जे कार्य इहलोक आणि परलोकात प्राण्यांच्या हिताचे साधक असेल, मतिमान पुरुषाने मन, वचन व कर्माने त्याचेच आचरण करावे || ४५ ||


 
 इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीये अंशे द्वादशोऽध्यायः (१२)


 

 

 

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...