सोमवार, २७ एप्रिल, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, नवम अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 9

 

विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः ॥ नवमोऽध्यायः ॥


 

"ब्रह्मचर्य आदि आश्रमों का वर्णन"

 

और्व उवाच
बालः कृतोपनयनो वेदाहरणतत्परः ।
गुरुगेहे वसेद्‍भूप ब्रह्मचारी समाहितः ॥ १ ॥

और्व म्हणाले ;– हे भूपते ! बालकाने उपनयन संस्कारानंतर वेदाध्ययनात तत्पर राहून ब्रह्मचर्याचे अवलम्बन करावे व सावधानतापूर्वक गुरुगृही निवास करावा || ||

 


 शौचाचारव्रतं तत्र कार्यं शुश्रूषणं गुरोः ।
 व्रतानि चरता ग्राह्यो वेदश्च कृतबुद्धिना ॥ २ ॥

तिथे राहून शौच व आचार-व्रताचे पालन करत गुरुची सेवा-शुश्रूषा करावी आणि व्रतादिंचे आचरण करत स्थिर-बुद्धिने वेदाध्यायन करावे || ||

 


 उभे सन्ध्ये रविं भूप तथैवाग्निं समाहितः ।
 उपतिष्ठेत्तदा कुर्याद्‍गुरोरप्यभिवादनम् ॥ ३ ॥

हे राजन ! दोन्ही संध्यासमयी एकाग्र होऊन सूर्य व अग्निची उपासना करावी आणि गुरुला अभिवादन करावे || ||

 


 स्थिते तिष्ठेद्‌व्रजेद्याते नीचैरासीत चासति ।
 शिष्यो गुरोर्नृपश्रेष्ठ प्रतिकूलं न सञ्चरेत् ॥ ४ ॥

गुरु उभे राहिल्यावर उभे राहावे, ते चालत असता त्यांच्या मागे मागे चालावे व ते बसल्यावरच स्वतः खाली बसावे. हे नृपश्रेष्ठा ! अशा प्रकारे कधीही गुरुच्या विरुद्ध कोणतेही आचरण करू नये || ||

 


 तेनै वोक्तं पठेद्वेदं नान्यचित्तः पुरःस्थितः ।
 अनुज्ञातश्च भिक्षान्नमश्नीयाद्‍गुरुणा ततः ॥ ५ ॥

गुरूंनी सांगितल्यावर त्यांच्या समोर बसून एकाग्रचित्ताने वेदाध्ययन करावे आणि त्यांची आज्ञा असेल तरच भिक्षान्न भोजन करावे || ||



 अवगाहेदपः पूर्वमाचार्येणावगाहितः ।
 समिज्जलादिकं चास्य कल्यं कल्यमुपानयेत् ॥ ६ ॥

जलात आधी आचार्यांचे स्नान झाल्यावरच मग स्वतः स्नान करावे तसेच दररोज प्रात:काळी गुरूसाठी समिधा, जल, कुश आणि पुष्पादि गोळा करून आणून ठेवावीत || ||




 गृहीतग्राह्यवेदश्च ततोऽनुज्ञामवाप्य च ।
 गार्हस्थ्यमाविशेत्प्राज्ञो निष्पन्नगुरुणिष्कृतिः ॥ ७ ॥

अशाप्रकारे आपला अभिमत वेदपाठ समाप्त झाल्यावर बुद्धिमान शिष्याने गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांना गुरुदक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा || ||

 


 विधिनावाप्तदारस्तु धनं प्राप्य स्वकर्मणा ।
 गृहस्थकार्यमखिलं कुर्याद्‍भूपाल शक्तितः ॥ ८ ॥

हे राजन ! मग विधिपूर्वक पाणिग्रहण करून आपल्या वर्णानुकूल वृत्तिने द्रव्योपार्जन करत आपल्या सामर्थ्यानुसार समस्त गृहकार्य करत रहावे || ||

 


 निवापेन पितॄर्चन्यज्ञैर्देवांस्तथातिथीन् ।
 अन्नैर्मुनींश्च स्वाध्यायैरपत्येन प्रजापतिम् ॥ ९ ॥
 भूतानि बलिभिश्चैव वात्सल्येनाखिलं जगत् ।
 प्राप्नोति लोकान्पुरुषो निजकर्मसमार्जितान् ॥ १० ॥

पिण्ड-दानाने पितृगणांची, यज्ञांनी देवतांची, अन्नदानाने अतिथिंची, स्वाध्यायाने ऋषिंची, पुत्रोत्पत्तिने प्रजापतिची, बलि (अन्नभाग) देऊन भूतगणांची तसेच वात्सल्यभावाने सम्पूर्ण जगताची पूजा करून पुरुष आपल्या कर्मांद्वारा उत्तमोत्तम लोक प्राप्त करतो || ९ – १० ||




 भिक्षाभुजश्च ये केचित्परिव्राड्ब्रह्मचारिणः ।
 तेप्यत्रैव प्रतिष्ठन्ते गार्हस्थ्यं तेन वै परम् ॥ ११ ॥

जे केवळ भिक्षावृत्तिने राहणारे परिव्राजक व ब्रह्मचारी आदि आहेत त्यांचा आश्रय देखील गृहस्थाश्रमच आहे, म्हणूनच गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आहे || ११ ||

 


 वेदाहरणकार्याय तीर्थस्नानाय च प्रभो ।
 अटन्ति वसुधां विप्राः पृथिवीदर्शनाय च ॥ १२ ॥

हे राजन ! विप्रगण वेदाध्ययन, तीर्थस्नान आणि देश दर्शनासाठी पृथ्वी-पर्यटन करतात || १२ ||

 


 अनिकेता ह्यनाहारा यत्र सायङ्‍गृहाश्च ये ।
 तेषां गृहस्थः सर्वेषां प्रतिष्ठा योनिरेव च ॥ १३ ॥

त्यांपैकी ज्यांचे घर नसते किंवा जर कोणाच्या भोजनाची व्यवस्था झाली नसेल, किंवा जे संध्याकाळ झाल्यावर त्याच ठिकाणी राहतात, अशा सर्वांचा आधार आणि मूळ गृहस्थाश्रमच आहे || १३ ||

 


 तेषां स्वागतदानादि वक्तव्यं मधुरं नृप ।
 गृहागतानां दद्याच्च शयनासनभोजनम् ॥ १४ ॥

हे राजन ! असे लोक घरी आले तर कुशल-प्रश्न आणि मधुर वचनांनी त्यांचे स्वागत करावे तसेच शय्या, आसन आणि भोजना द्वारा त्यांचा यथाशक्ति सत्कार करावा || १४ ||

 


 अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात्प्रतिनिवर्तते ।
 स दत्त्वा दुष्कृतं तस्मै पुण्यमादाय गच्छति ॥ १५ ॥

ज्याच्या घरून अतिथि निराश होऊन परततो तेव्हा तो तिथे आपले समस्त दुष्कर्म देतो व तेथील पुण्यकर्म स्वतः घेऊन जातो || १५ ||

 


 अवज्ञानमहङ्‍कारो दम्भश्चैव गृह सतः ।
 परितापोपघातौ च पारुष्यं च न शस्यते ॥ १६ ॥

ग्रहस्थाने अतिथिचा अपमान करणे, अंहकार व दम्भाचे आचरण करणे, त्याला दिलेल्याचा पश्चाताप करणे, त्याला मारणे किंवा त्याच्याशी कटुभाषण करणे योग्य नाही || १६ ||

 


 यस्तु सम्यक्‌करोत्येवं गृहस्थः परमं विधिम् ।
 सर्वबन्धविनिर्मुक्तो लोकानाप्नोत्यनुत्तमान् ॥ १७ ॥

अशाप्रकारे जो गृहस्थ आपल्या परम धर्माचे पूर्णतया पालन करतो तो समस्त बन्धनांतून मुक्त होऊन अत्युत्तम लोक प्राप्त करतो || १७ ||




 वयःपरीणतो राजन्कृतकृत्यो गृहाश्रमी ।
 पुत्रेषु भार्यां निक्षिप्य वनं गच्छेत्सहैव वा ॥ १८ ॥

हे राजन ! अशाप्रकारे गृह्स्थोचित कार्य करत-करत ज्याची अवस्था वार्धक्याकडे झुकलेली असेल त्या गृहस्थाने आपल्या पत्नीला आपल्या पुत्रांवर सोपवून किंवा तिला सोबत घेऊन वनात जावे || १८ ||

 


 पर्णमूलफलाहारः केशश्मश्रुजटाधरः ।
 भूमिशायी भवेत्तत्र मुनिःसर्वातिथिर्नृप ॥ १९ ॥

तिथे पाने, मूळे, फळे आदिचा आहार करत, लोभ सोडून श्मश्रु (दाढी मिश्या) आणि जटा धारण करून पृथ्वीवर शयन करावे आणि मुनिवृत्ति स्वीकारून सर्व प्रकारे अतिथिंची सेवा करावी || १९ ||

 


 चर्मकाशकुशैः कुर्यात्परिधानोत्तरीयके ।
 तद्वत्त्रिषवणं स्नानं शस्तमस्य नरेश्वरः ॥ २० ॥

त्याने चर्म, काश आणि कुश गवतापासून आपला बिछाना तसेच व वस्त्र बनवावे . हे नरेश्वरा ! त्या मुनिने त्रिकाल-स्नान करावे असे विधान आहे || २० ||

 


 देवताभ्यर्चनं होमःसर्वाभ्यागतपूजनम् ।
 भिक्षाबलिप्रदानं च शस्तमस्य नरेश्वर ॥ २१ ॥

अशाप्रकारे देवपूजन, होम, सर्व अतिथिंचा सत्कार, भिक्षा आणि बलिवैश्वदेव, ही त्याची विहित कर्म आहेत || २१ ||

 

 

 वन्यस्त्नेहेन गात्राणामभ्यङ्‍गश्चास्य शस्यते ।
 तपश्च तस्य राजेन्द्र शीतोष्णादिसहिष्णुता ॥ २२ ॥

हे राजेन्द्रा ! वन्यतेलाने शरीराला मालीश करून शीतोष्ण सहन करत तपस्या करणे हे त्याचे प्रशस्त कर्म है || २२ ||

 

 

 यस्त्वेतां नियतश्चर्यां वानप्रस्थश्चरेन्मुनिः ।
 स दहत्यग्निवद्दोषाञ्जयेल्लोकांश्च शाश्वतान् ॥ २३ ॥

जो वानप्रस्थ मुनि ह्या नियत कर्मांचे आचरण करतो तो आपले समस्त दोष अग्नि समान भस्म करतो आणि नित्य-लोकांची प्राप्त करून घेतो || २३ ||




 चतुर्थश्चाश्रमो भिक्षोः प्रोज्यते यो मनीषिभिः ।
 तस्य स्वरूपं गदतो मम श्रोतुं नृपार्हसि ॥ २४ ॥

हे नृपा ! पंडितगण ज्या चतुर्थ आश्रमाला भिक्षु आश्रम म्हणतात मी आता त्याचे स्वरूप वर्णन करतो, नीट लक्ष देऊन ऐक || २४ ||

 


 पुत्रद्रव्यकलत्रेषु त्यक्तस्त्रेहो नराधिप ।
 चतुर्थमाश्रमस्थानं गच्छेन्निर्धूतमत्सरः ॥ २५ ॥

हे नरेन्द्रा ! तृतीय आश्रमानंतर पुत्र, द्रव्य आणि स्त्री आदिंचा स्नेह ह्यांचा पूर्ण त्याग करून तसेच मात्सर्य सोडून चतुर्थ आश्रमात प्रवेश करावा || २५ ||

 


 त्रैवर्गिकांस्त्यजेत्सर्वानारम्भानवनीपते ।
 मित्रादिषु समो मैत्रःसमस्तेष्वेव जन्तुषु ॥ २६ ॥

हे पृथ्वीपते ! अर्थ, धर्म आणि कामरूप त्रिवर्गसम्बन्धी समस्त कर्मांचा त्याग करून, शत्रु व मित्रांमध्ये समान भाव ठेवणे व सर्व जीवांचा सुह्रद असणे हे भिक्षुसाठी उचित आहे || २६ ||

 


 जरायुजाण्डजादीनां वाड्मनःकायकर्मभिः ।
 युक्तः कुर्वीत न द्रोहं सर्वसङ्‍गांश्च वर्जयेत् ॥ २७ ॥

सदैव समाहित राहून जरायुज, अंडज आणि स्वेदज आदि समस्त जीवांचा मन, वाणी किंवा कर्मद्वारा कधीच द्रोह न करणे व सर्व प्रकारच्या आसक्तिंचा त्याग करणे || २७ ||

 


 एकारात्रस्थितिर्ग्रामे पञ्चरात्रस्थितिः पुरे ।
 तथा तिष्ठेद्यथाप्रीतिर्द्वेषो वा नास्य जायते ॥ २८ ॥

गावात एक रात्र आणि पुरीत पाच रात्रि पर्यंतच राहावे व तेही असे की कोणाहीविषयी मनात प्रेम अथवा द्वेष असू नये || २८ ||

 


 प्राणयात्रानिमित्तं च व्यङ्‍गारे भुक्तवज्जने ।
 काले प्रशस्तवर्णानां भिक्षार्थं पर्यटेद्‍ गृहान् ॥ २९ ॥

ज्यावेळी घरातील अग्नि शांत होतो आणि लोकांचे भोजन झालेले असते त्यावेळी प्राणरक्षेसाठी उत्तम वर्णियांच्या घरी भिक्षा मागायला जावे || २९ ||

 


 कामः क्रोधस्तथा दर्पमोहलोभादयश्च ये ।
 तांस्तु सर्वान्परित्यज्य परिव्राड् निर्ममो भवेत् ॥ ३० ॥

परिव्राजकाने काम, क्रोध, दर्प, लोभ आणि मोह आदि समस्त दुर्गुणांचा त्याग करून ममताशून्य होऊन राहावे || ३० ||



 अभयं सर्वभूतेभ्यो दत्त्वा यश्चरते मुनिः ।
 तस्यापि सर्वभूतेभ्यो न भयं विद्यते क्वचित् ॥ ३१ ॥

जो मुनि समस्त प्राण्यांना अभयदान देऊन विचरण करतो त्यालासुद्धा कधीच कोणापासून भिती नसते || ३१ ||

 


 कृत्वाग्निहोत्रंस्वशरीरसंस्थंशारीरमग्निं स्वमुखे जुहोति ।
 विप्रस्तु भैक्ष्योपहितैर्हविर्भिश्चिताग्निकानां व्रहति स्म लोकान् ॥ ३२ ॥

जो ब्राह्मण चतुर्थाश्रमात आपल्या शरीरात स्थित प्राणादिसहित जठराग्निच्या उद्देश्याने आपल्या मुखात भिक्षान्नरूप हविने हवन करतो, त्याला असे अग्निहोत्र करून अग्निहोत्रिंचा लोक प्राप्त होतो || ३२ ||

 


 मोक्षोश्रमं यश्चरते यथोक्तंशुचिःसुखं कल्पितबुद्धियुक्तः ।
 अनिन्धनं ज्योतिरिव प्रशान्तः स ब्रह्मलोकं श्रयते द्विजातिः ॥ ३३ ॥

जो ब्राह्मण बुद्धियोगाने युक्त होऊन, यथाविधि आचरण करत ह्या मोक्षाश्रमाचे पवित्रता व सुखपूर्वक आचरण करतो, तो निरीबंधन अग्नि समान शांत होतो आणि शेवटी ब्रह्मलोक प्राप्त करतो || ३३ ||




           "इति श्रीविष्णुपुराणे तृतीये अंशे नवमोऽध्यायः"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...