मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, प्रथम अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 1

 

॥ विष्णुपुराणम् ॥

द्वितीयः अंशः॥ प्रथमोऽध्यायः ॥

 

 

मैत्रेय उवाच
भगवन्सम्यगाख्यातं ममैतदखिलं त्वाया ।
जगतः सर्गसम्बन्धि यत्पृष्टोसि गुरो मया ॥ १ ॥

मैत्रेय म्हणाले -

हे भगवन् ! हे गुरू ! मी जगाताच्या सृष्टी विषयी जे काही विचारले होते ते सर्व तुम्ही मला व्यवस्थित समजावून सांगितले .

 


 
योऽयमंशो जगत्सृष्टिसम्बन्धो गदितस्त्वया ।
 तत्राहं श्रोतुमिच्छामि भूयोपि मुनिसत्तम ॥ २ ॥

हे मुनिश्रेष्ठ ! जगाताच्या सृष्टीसंबंधी तुम्ही हा जो प्रथम अंश सांगितला,  त्याविषयी आणखी एक गोष्ट मी ऐकू इच्छितो .

 


 प्रियव्रतोत्तानपादौ सुतौ स्वायम्भुवस्य यौ ।
 तयोरुत्तानपादस्य ध्रुवः पुत्रस्त्वयोदितः ॥ ३ ॥

स्वायम्भुव मनुचे जे प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र होते, त्यांच्यातील उतानपादाचा पुत्र ध्रुव ह्याच्याविषयी आपण सांगितले .


प्रियव्रतस्य नैवोक्ता भवता द्विज सन्ततिः ।
तामहं श्रोतुमिच्छामि प्रसन्नो वक्तुमर्हसि ॥ ४ ॥

परंतु हे द्विजा ! तुम्ही प्रियव्रताच्या संतानाविषयी काहीच सांगितले नाहीत, म्हणून मी त्याच्या विषयी जाणून घेऊ इच्छितो, तुम्ही ते मला प्रसन्नतापूर्वक सांगावे .

 

 

श्रीपराशर उवाच
कर्दमस्यात्मजां कन्यामुपयेमे प्रियव्रतः ।
सम्राट् कुक्षिश्च तत्कन्ये दशपुत्रस्तथापरे ॥ ५ ॥

पराशर म्हणाले - प्रियव्रताने कर्दमांच्या कन्येसोबत विवाह केला होता. तिच्यापासून त्याला सम्राट आणि कुक्षि नावाच्या दोन कन्या आणि दहा पुत्र झाले .

 


 महाप्रज्ञा महावीर्या विनीता दयिता पितुः ।
प्रियव्रतसुताः ख्यातास्तेषां नामानि मे शृणु ॥ ६ ॥

प्रियव्रताचे पुत्र अतिशय बुद्धिमान, बलवान, विनयसम्पन्न आणि आपल्या मातापितांचे अत्यन्त प्रिय होते. त्यांची नावे ऐक .

 

 


 आग्नीध्रश्चाग्निबाहुश्च वपुष्मान्द्युतिमांस्तथा ।
 मेधा मेधातिथिर्भव्यः सवनः पुत्र एव च ॥ ७ ॥
 ज्योतिष्मान्दशमस्तेषां सत्यनामा सुतोऽभवत् ।
 प्रियव्रतस्य पुत्रास्ते प्रख्याता बलवीर्यतः ॥ ८ ॥

आग्नीध, अग्निबाहु, वपुष्मान, द्युतिमान, मेधा, मेधातिथि, भव्य, सवन असे नऊ पुत्र होते आणि दहावा यथार्थनामी ज्योतिष्मान होता . हे प्रियव्रताचे सर्व पुत्र आपल्या बल आणि पराक्रमामुळे विख्यात होते .

 


मेधाग्निबाहुपुत्रास्तु त्रयो योगपरायणाः ।
 जातिस्मारा महाभागा न राज्याय मनो दधुः ॥ ९ ॥

त्यांच्या पैकी महाभाग मेधा, अग्निबाहु आदि तीन पुत्र तीन योगपरायण असून आपल्या पूर्वजन्माचा वृत्तान्त जाणणारे होते . त्यांनी राज्य आदि भोगांमध्ये आपले चित्त गुंतवले नाही .

 

 

निर्मलाः सर्वकालन्तु समस्तार्थेषु वै मुने ।
चक्रुःक्रियां यथान्यायमफलाकाङ्‌क्षिणो हि ते ॥ १० ॥

हे मुने ! ते निर्मलचित्त असून त्यांच्यात कर्मफळाची इच्छा नव्हती, तसेच ते सर्व विषयांमध्ये नेहमी न्यायानुकूल असत .

 

 


 प्रियव्रतो ददौ तेषां सप्तानां मुनिसत्तम ।
 सप्तद्वीपानि मैत्रेय विभज्य सुमहात्मनाम् ॥ ११ ॥

ह मुनिश्रेष्ठा ! राजा प्रियव्रताने आपल्या उरलेल्या सात महात्मा पुत्रांना सात द्वीप वाटून दिले .

 

 


जम्बूद्वीपं महाभाग साग्नीध्राय ददौ पिता ।
मेधातिथेस्तथा प्रादात्प्लक्षद्वीपं तथापरम् ॥ १२ ॥

हे महाभागा ! पिता प्रियव्रताने आग्नीधला जम्बूद्वीप आणि मेधातिथिला प्लक्ष नामक दुसरा द्वीप दिला .

 

 


शाल्मले च वपुष्मन्तं नरेन्द्रमभिषिक्तवान् ।
ज्योतिष्मन्तं कुशद्वीपे राजानं कृतावान्प्रभुः ॥ १३ ॥

त्याने शाल्मलद्वीपात वपुष्मानाला अभिषिक्त केले आणि ज्योतिष्मानाला कुशद्वीपाचा राजा बनवला .

 

 

 


 द्युतिमन्तं च राजानं क्रौञ्चद्वीपे समादिशत् ।
 पुष्कराधिपतिं चक्रे सवनं चापि स प्रभुः ॥ १४ ॥

द्युतिमानची क्रौंचद्वीपच्या शासनावर नियुक्ति केली, भव्यला प्रियव्रताने शाकद्वीपाचा स्वामी बनवला आणि सवनला पुष्करद्वीपाचा अधिपति केला .

 


 जम्बूद्वीपेश्वरो यस्तु आग्नीध्रो मुनिसत्तम ॥ १५ ॥
 तस्य पुत्रा बभूवुस्ते प्रजापतिसमा नव ।
 नाभिः किम्पुरुषश्चैव हरिवर्ष इलावृतः ॥ १६ ॥
 रम्यो हिरण्वान्षष्ठश्च कुरुभद्राश्व एव च ।
 केतुमालस्तथैवान्यः साधुचेष्टोऽभवन्नृपः ॥ १७ ॥

हे मुनिसत्तमा ! त्यात जो जम्बूद्वीपाचा अधीश्वर राजा आग्नीध होता त्याला प्रजापति समान पुत्र झाले, त्यांची नावे नाभि, किम्पुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्य, हिरण्वान, कुरु, भद्राश्व आणि सत्कर्मशील राजा केतुमाल अशी होती .

 

 


 जन्बूद्वीपविभागांश्च तेषां विप्र निशामय ।
 पित्रा दत्तं हिमाह्वं तु वर्षं नाभेस्तु दक्षिणम् ॥ १८ ॥

हे विप्रा ! आता त्याच्या जम्बूद्वीपाच्या विभागांविषयी ऐक. पिता आग्नीध्रने दक्षिणेकडचे हिमवर्ष (आताचे भारतवर्ष) नाभिला दिले .

 

 


 हेमकूटं तथा वर्षं ददौ किम्पुरुषाय सः ।
 तृतीयं नैषधं वर्षं हरिवर्षाय दत्तवान् ॥ १९ ॥

तसेच किम्पूरुषाला हेमकूटवर्ष आणि हरिवर्षला तिसरे नैषधवर्ष दिले .

 

 


 इलावृताय प्रददौ मेरुर्यत्र तु मध्यमः ।
 नीलाचलाश्रितं वर्ष रम्याय प्रददौ पिता ॥ २० ॥

ज्याच्या मध्यावर मेरुपर्वत आहे ते इलावृतवर्ष त्याने इलावृत्ताला दिले आणि नीलाचलाला लागून असलेले वर्ष रम्याला दिले .

 


 श्वेतं यदुत्तरं वर्षं पित्रा दत्तं हिरण्वते ॥ २१ ॥
 यदुत्तरं शृङ्‍गवतो वर्ष तत्कुरवे ददौ ।
 मेरोः पुर्वेण यद्वर्षं भद्राश्वाय प्रदत्तवान् ॥ २२ ॥
 गन्धमाधनवर्षं तु केतुमालाय दत्तवान् ।
 इत्येतानि ददौ तेभ्यः पुत्रेभ्यः स नरेश्वरः ॥ २३ ॥

पिता आग्नीध्राने आपले उत्तरवर्ती श्वेतवर्ष हिरण्वानाला दिले, श्रृंगवान पर्वताच्या उत्तरेला स्थित असलेले वर्ष करुला, मेरुच्या पूर्वेला स्थित असलेले वर्ष भद्राश्वाला  आणि केतुमालाला गन्धमादनवर्ष दिले . अशाप्रकारे राजा आग्नीध्रने आपल्या पुत्रांना ही वर्षे दिली .

 

 


 वर्षेष्वेतेषु तान्पुत्रानभिषिच्य स भूमिपः ।
 शालग्रामं महापुण्यं मैत्रेय तपसे ययौ ॥ २४ ॥

हे मैत्रेया ! अपल्या पुत्रांना ह्या वर्षांमध्ये अभिषिक्त करून तो तपस्येसाठी शालग्राम नामक महापवित्र क्षेत्री निघून गेला .

 

 


 यनि किम्पुरुषादीनि वर्षाण्यष्टौ महामुने ।
 तेषां स्वाभाविकिसिद्धिः सुखप्रायाह्ययत्‍नतः ॥ २५ ॥

हे महामुने ! किम्पुरुष आदि जी आठ वर्ष आहेत तिथे सुखाचे बाहुल्य असून कोणत्याही प्रयत्नाशिवाय सहजगत्या सर्व भोग-सिद्धि प्राप्त होतात .

 

 

विपर्ययो न तेष्वस्ति जरामृत्युभयं न च ।
 धर्मधर्मौ न तेष्वास्तां नोत्तमाधममध्यमाः ॥ २६ ॥

तिथे कोणत्याही प्रकारच्या विपर्यय (असुख किंवा अकाल मृत्यु आदि) तसेच जरा-मृत्यु आदिचे कोणतेही भय नाही आणि धर्म, अधर्म किंवा उत्तम, अधम आणि मध्यम आदिचा भेदभावही नाही . ह्या आठ वर्षांमध्ये कधीही कोणतेही युगपरिवर्तन सुद्धा होत नाही .

 

 

न तेष्वस्ति युगावस्था क्षेत्रेष्वष्टसु सर्वदा ।
हिमाह्वयं तु वै वर्षं नाभेरासीन्महात्मनः ।
तस्यर्षभोऽभवत्पुत्रो मेरुदेव्यां महाद्युतिः ॥ २७ ॥

महात्मा नाभिचे हिम नामक वर्ष होते; त्याला मेरुदेवीपासून अतिशय कान्तिमान असा ऋषभ नामक पुत्र झाला .

 

 


 ऋषभाद्‍भरतो जज्ञे ज्येष्ठः पुत्रशतस्य सः ।
 कृत्वा राज्यं स्वधर्मेण तथैष्ट्‌वा विविधान्मखान् ॥ २८ ॥

अभिषिच्य सुतं वीरं भरतं पृथिवीपतिः ।
तपसे स महाभागः पुलहस्याश्रमं ययौ ॥ २९ ॥

ऋषभाला भरत नावाचा पुत्र झाला जो त्याच्या शंभर पुत्रांपैकी सर्वात मोठा होता . महाभाग पृथ्वीपति ऋषभदेवाने धर्मपुर्वक राज्य शासन तसेच विविध यज्ञांचे अनुष्ठान केले. नंतर त्याने आपल्या वीर पुत्र भरताला राज्यधिकार सोपविला आणि तपस्येसाठी पुलहाश्रमाला निघून गेला . 

 

 

वानप्रस्थविधानेन तत्रापि कृतनिश्चयः ।
तपस्तेपे यथान्यायमियाज स महीपतिः ॥ ३० ॥

महाराज ऋषभाने तिथे वानप्रस्थाश्रमात राहून निश्चयपूर्वक तपस्या केली आणि नियमानुकूल यज्ञानुष्ठान केले .

 

 


 तपसा कर्षितोऽत्यर्थं कृशो धमनिसन्ततः ।
 नग्नो वीटां मुखे कृत्वा वीराध्वानं ततो गतः ॥ ३१ ॥

तपस्येमुळे सूकून तो इतका कृश झाला कि त्याच्या शरीरातील रक्तवाहक शिरा दिसू लागल्या . अंतसमयी आपल्या तोंडात दगडाचा एक तुकडा ठेऊन त्याने नग्नावस्थेत महाप्रस्थान केले .

 

 


ततश्च भारतं वर्षमेतल्लोकेषु गीयते ।
भरताय यतः पित्रा दत्तं प्रातिष्ठता वनम् ॥ ३२ ॥

पिता ऋषभदेवाने वनात जाते वेळी आपले राज्य भरतला दिले होते; म्हणून तेव्हापासून हे (हिमवर्ष) ह्या लोकी भारतवर्ष ह्या नावाने प्रसिद्ध झाले .

 

 


 सुमतीर्भरतस्याभूत्पुत्रः परमधार्मिकः ।
 कृत्वा सम्यग्ददौ तस्मै राज्यमिष्टमखं पिता ॥ ३३ ॥

भरताला सुमति नामक परम धार्मिक पुत्र झाला . पिता भरताने यज्ञानुष्ठानपूर्वक यथेच्छ राज्य सुख भोगून राज्या सुमतिला सोपविले .

 

 


 पुत्रसंक्रामितश्रीस्तु भरतः स महीपतिः ।
 योगाभ्यासरतः प्राणान् शालग्रामेऽत्यजन्मुने ॥ ३४ ॥

हे मुने ! महाराज भरताने पुत्राला राज्यलक्ष्मी सोपवून योगाभ्यासात तत्पर होऊन शेवटी शालाग्रामक्षेत्री आपले त्यागले .

 

 


 अजायत च विप्रोऽसौ योगीनां प्रवरे कुले ।
 मैत्रेय तस्य चरितं कथयिष्यामि ते पुनः ॥ ३५ ॥

मग त्यांनी योग्यांच्या पवित्रकुळात परत ब्राह्मणरूपात जन्म घेतला . हे मैत्रेया ! त्याचे ते चरित्र मी तुला नंतर सांगतो .

 

 

 

सुमतेस्तेजसस्तस्मादिन्द्रद्युम्नो व्यजायत ।
परमेष्ठी ततस्तस्मात्प्रतिहारस्तदन्वयः ॥ ३६ ॥

त्यानंतर सुमतिच्या वीर्यापासून इन्द्रद्युम्नाचा जन्म झाला, त्याच्यापासून परमेष्ठी आणि परमेष्ठीचा पुत्र प्रतिहार झाला .


 प्रतिहर्तेति विख्यात उत्पन्नस्तस्य चात्मजः ।
 भवस्तस्मादथोद्‍गीथः प्रस्ताविस्तत्सुतो विभुः ॥ ३७ ॥

प्रतिहाराला प्रतिहर्ता नावाचा विख्यात पुत्र झाला, तसेच प्रतिहर्ताचा पुत्र भव, भवाचा उद्गीथ आणि उद्गीथाचा पुत्र अति समर्थ प्रस्ताव झाला .

 

 


 पृथुस्ततस्ततो नक्तो नक्तस्यापि गयः सुतः ।
 नरो गयस्य नतयस्तत्पुत्रोऽभूद्‌विराट् ततः ॥ ३८ ॥

प्रस्तावला पृथु, पृथुला नक्त आणि नक्तला गय नावाचा पुत्र झाला . गयला नर आणि नरला विराट नावाचा पुत्र झाला .

 

 


 तस्य पुत्रो महावीर्यो धीमांस्तस्मादजायत ।
 महान्तस्तत्सुतश्चाभून्मनस्युस्तस्य चात्मजः ॥ ३९ ॥

त्याचा पुत्र महावीर्य होता, ह्याच्यापासून धीमानचा जन्म झाला, तसेच धीमानचा पुत्र महान्त आणि त्याचा पुत्र मनस्यु होता .

 

 


 त्वष्टा त्वष्टुश्च विरजो रजस्तस्याप्यभूत्सुतः ।
 शतजिद्रजसस्तस्य जज्ञे पुत्रशतं मुने ॥ ४० ॥

मनस्युचा पुत्र त्वष्टा, त्वष्टाचा विरज आणि विरजचा पुत्र रज झाला . हे मुने ! रजचा पुत्र शतजित याला शंभर पुत्र झाले .

 

विष्वग्ज्योतिप्रधानास्ते यैरिमा वर्धिताः प्रजाः ।
तैरिदं भारतं वर्षं नवभेदमलङ्‍कृतम् ॥ ४१ ॥

त्यांच्यात विष्वग्ज्योति प्रधान होता . ह्या शंभर पुत्रांमुळे इथल्या प्रजेत खूप वाढ झाली . तेव्हा त्यांनी ह्या भारतवर्षाचे नऊ विभाग केले व त्याचा उपभोग घेऊ लागले.

 

 


 तेषां वंशप्रसूतैश्च भुक्तेयं भारती पुरा ।
 कृतत्रेतादिसर्गेण युगाख्यामेकसप्ततिम् ॥ ४२ ॥

ह्यांच्याच वारसांनी पुर्वकाळी कृतत्रेतादि युगक्रमाने एकाहत्तर युगांपर्यन्त ह्या भरतभूमिचा उपभोग घेतला होता .

 

 

 

एष स्वायम्भुवः सर्गौ येनेदं पूरितं जगत् ।
 वाराहे तु मुने कल्पे पूर्वमन्वन्तराधिपः ॥ ४३ ॥

हे मुने ! हाच ह्या वाराहकल्पातील सर्वात पहिला मन्वन्तराधिप स्वायम्भुवमनु ह्याचा वंश आहे, ज्याने त्याकाळी हा सम्पूर्ण संसार व्याप्त केला होता .

 

 

 

 

 

इति श्रीविष्णुपुराणे द्वितीये ‍अंशे प्रथमोऽध्यायः ॥१॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...