॥ प्रथमः अंशः ॥ ॥ सप्तदशोऽध्यायः ॥
"हिरण्यकशिपुचा दिग्विजय आणि प्रल्हाद
– चरित्र"
श्रीपराशर उवाच -
मैत्रेय क्षूयतां सम्यक् चरितं तस्य
धीमतः ।
प्रह्लादस्य सदोदार चरितस्य महात्मनः
॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले – हे मैत्रेया ! त्या सर्वदा उदारचरित
परमबुद्धिमान महात्मा प्रल्हादाचे चरित्र तु ध्यानपूर्वक श्रवण कर .
दितेः पुत्रो महावीर्यो हिरण्यकशिपुः
पुरा ।
त्रैलोक्यं वशमानिन्ये ब्रह्मणो
वरदर्पितः ॥ २ ॥
पूर्वकाळी दितिचा पुत्र महाबली हिरण्यकशिपुने, ब्रह्माच्या
वराने गर्वयुक्त (सशक्त) होऊन सम्पूर्ण त्रिलोक्य आपल्या वशीभूत केले होते .
इन्द्रत्वमकरोद्दैत्यः स चासीत्सविता
स्वयम् ।
वायुरग्निरपां नाथः
सोमश्चाभून्महासुरः ॥ ३ ॥
तो दैत्य इन्द्रपदाचा भोग घेत होता. तो महान असुर
स्वयं सूर्य, वायु, अग्नि, वरुण आणि
चन्द्रमा बनला होता .
धनानामधिपः सोऽभूत् स एवासीत्स्वयं
यमः ।
यज्ञभागानशेषांस्तु स स्वयं
बुभुजेऽसुरः ॥ ४ ॥
तो स्वयं कुबेर आणि यमराज सुद्धा होता व तो असुर
स्वयं सम्पूर्ण यज्ञ-भागांचा भोक्ता होता .
देवाः स्वर्गं परित्यज्य तत्
त्रासान् मुनिसत्तम ।
विचेरुरवनौ सर्वे बिभ्राणा मानुषीं
तनुम् ॥ ५ ॥
हे मुनिसत्तमा ! त्याच्या भयाने देवगण स्वर्ग
सोडून मनुष्य-शरीर धारण करून भूमंडळी विचरण करत असत .
जित्वा त्रिभुवनं सर्वं
त्रैलोक्यैश्वर्यदर्पितः ।
उपगीयमानो गन्धर्वैः बुभुजे
विषयान्प्रियान् ॥ ६ ॥
अशाप्रकारे सम्पूर्ण त्रिलोक्य जिंकून
त्रिभुवनाच्या वैभवाने गर्विष्ठ झाला आणि गन्धर्वांकडून आपली स्तुति ऐकत तो आपले
अभीष्ट भोग भोगत होता .
पानासक्तं महात्मानं हिरण्यकशिपुं
तदा ।
उपासान् चक्रिरे सर्वे
सिद्धगन्धर्वपन्नगाः ॥ ७ ॥
त्याकाळी त्या मद्यपानासक्त महाकाय
हिरण्यकशिपुचीच समस्त सिद्ध, गन्धर्व आणि नाग आदि उपासना करत असत .
अवादयन् जगुश्चान्ये जयशब्दं तथापरे
।
दैत्यराजस्य पुरतश्चक्रुः सिद्धा
मुदान्विताः ॥ ८ ॥
त्या दैत्यराजा समोर कोणी सिद्धगण बाजे वाजवून
त्याचे यशोगान करत आणि कोणी अति प्रसन्न होऊन जयजयकार करत .
तत्र प्रनृत्तप्सरसि स्फाटिकाभ्रमयेऽसुरः ।
पपौ पानं मुदा युक्तः प्रासादे
सुमनोहरे ॥ ९ ॥
तसेच तो असुरराज तिथे स्फटिक व अभ्र शिलेने
बनलेल्या मनोहर महालात, जिथे
अप्सरांचे उत्तम नृत्य होत असे, प्रसन्नतेने मद्यपान करत असे .
तस्य पुत्रो महाभागः प्रह्लादो नाम
नामतः ।
पपाठ बालपाठ्यानि गुरुगेहङ्गतोऽर्भकः
॥ १० ॥
त्याचा प्रल्हाद नामक महाभाग्यवान पुत्र होता. तो
बालक गुरुकडे जाऊन बालोचित पाठ शिकू लागला .
एकदा तु स धर्मात्मा जगाम गुरुणा सह
।
पानासक्तस्य पुरतः
पुतुर्दैत्यपतेस्तदा ॥ ११ ॥
एके दिवशी तो धर्मात्मा बालक गुरूसोबत आपला पिता
दैत्यराजाजवळ गेला जो त्यावेळी मद्यपानात दंग होता .
पादप्रणामावनतं तमुत्थाप्य पिता
सुतम् ।
हिरण्यकशिपुः प्राह
प्रह्लादममितौजसम् ॥ १२ ॥
तेव्हा, आपल्या चरणांवर वाकलेल्या आपल्या परम तेजस्वी
पुत्र प्रल्हादला ऊठवून पिता हिरण्यकशिपुने म्हटले .
हिरण्यकशिपुः उवाच -
पठ्यतां भवता वत्स सारभूतं सुभाषितम्
।
कालेनैतावता यत्ते सदोद्योक्तेन
शिक्षितम् ॥ १३ ॥
हिरण्यकशिपु बोला – वत्स ! आजवर अध्ययनात निरंतर तत्पर
राहून तु जे काही शिकलास त्याचे सारभूत शुभ भाषण मला ऐकव .
प्रह्लाद उवाच -
श्रूयतां तात वक्ष्यामि सारभूतं
तवाज्ञया ।
समाहितमना भूत्वा यन्मे
चेतस्यवस्थितम् ॥ १४ ॥
प्रल्हाद म्हणाला – बाबा ! माझ्या मनात जे काही
सारांशरूपाने स्थित आले ते मी आपल्या आज्ञेनुसार सांगतो, लक्ष देऊन ऐका .
अनादिमध्यान्तमजमवृद्धिक्षयमच्युतम् ।
प्रणतोऽस्म्यन्तमन्तानं
सर्वकारणकारणम् ॥ १५ ॥
जो आदि, मध्य आणि अंत रहित, अजन्मा, वृद्धि, क्षय, शून्य आणि
अच्युत आहे, समस्त
कारणांचे कारण तथा जगताची स्थिति आणि अंतकर्ता आहे त्या श्रीहरिला मी प्रणाम करतो .
श्रीपराशर उवाच -
एतन्निशम्य दैत्येन्द्रः सकोपो
रक्तलोचनः ।
विलोक्य तद्गुरुं प्राह
स्फुरिताधरपल्लवः ॥ १६ ॥
श्रीपराशर म्हणाले – हे ऐकून दैत्यराज हिरण्यकशिपुने
क्रोधाने लाल झालेल्या डोळ्यांनी प्रल्हादच्या गुरुला पाहून थरथरणार्या ओठांनी
म्हटले .
हिरण्यकशिपुरुवाच -
ब्रह्मबन्धो किमेतत्ते
विपक्षस्तुतिसंहितम् ।
असारं ग्राहितो बालो मामवज्ञाय
दुर्मते ॥ १७ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला ;– रे दुर्बुद्धि
ब्राह्मणाधमा ! हे काय ? तु
माझी अवज्ञा करून ह्या बालकाला माझ्या विपक्षीच्या स्तुतिने युक्त असे शिक्षण
दिलेस .
गुरुरुवाच -
दैत्येश्वर न कोपस्य वशमागन्तुमर्हसि
।
ममोपदेशजनितं नायं वदति ते सुतः ॥ १८
॥
गुरूजी म्हणाले – दैत्यराज ! आपण क्रोधित होऊ नये. आपला
हा पुत्र मी शिकवलेले नाही सांगत आहे .
हिरण्यकशिपुरुवाच -
अनुशिष्टोसि केनेदृग् वत्स प्रह्लाद
कथ्यताम् ।
मयोपदिष्टं नेत्येष प्रब्रवीति
गुरुस्तव ॥ १९ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – बेटा प्रल्हाद
! सांग तुला हे कोणी शिकवलं ? तुझे गुरूजी तर म्हणतात कि त्यांनी तुला असा
ऊपदेश दिला नाही .
प्रह्लाद उवाच -
शास्ता विष्णुरशेषस्य जगतो यो हृदि
स्थितः ।
तमृते परमात्मानं तात कः केन शास्यते
॥ २० ॥
प्रल्हाद म्हणाला – बाबा ! ह्रदयात स्थित भगवान विष्णुच
सम्पूर्ण जगताचा उपदेशक आहे. त्या परमात्म्याला सोडून आणखी कोण कोणाला काय
शिकवू शकतो ?
हिरण्यकशिपुः उवाच -
कोयं विष्णुः सुदुर्बुद्धे यं
ब्रवीषि पुनः पुनः ।
जगतामीश्वरस्येह पुरतः प्रसभं मम ॥
२१ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे मुर्खा !
ज्या विष्णुचे तू माझ्यासारख्या जगदीश्वरासमोर धृष्टतापूर्वक निश्शंक होऊन वारंवार
वर्णन करत आहेस तो कोण आहे
?
प्रह्लाद उवाच -
न शब्दगोचरं यस्य योगिध्येयं परं
पदम् ।
यतो यश्च स्वयं विश्वं स विष्णुः
परमेश्वरः ॥ २२ ॥
प्रल्हाद म्हणाला – योगिंनी ध्यान करण्यायोग्य ज्याचे
परमपद वाणीचा विषय नाही होऊ शकत तसेच ज्याच्यापासून विश्व प्रकट झाले आहे आणि जो
स्वयं विश्वरूप आहे तो परमेश्वरच विष्णु आहे .
हिरण्यकशिपुः उवाच -
परमेश्वरसंज्ञोऽज्ञ किमन्यो
मय्यवस्थिते ।
तथापि मर्तुकामस्त्वं प्रब्रवीषि
पुनः पुनः ॥ २३ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे मूढा ! मी
असताना आणि कोण परमेश्वर म्हणवला जाऊ शकेल ? तरीही तू मृत्युच्या इच्छेने वारंवार हिच बडबड
करत आहेस .
प्रह्लाद उवाच -
न केवलं तात मम प्रजानां स
ब्रह्मभूतो भवतश्च विष्णुः ।
धाता विधाता परमेश्वरश्च प्रसीद कोपं
कुरुषे किमर्थम् ॥ २४ ॥
प्रल्हाद म्हणाला – हे तात ! तो ब्रह्मभूत विष्णु केवळ
माझाच नाही , तर
सम्पूर्ण प्रजा आणि आपलाही कर्त्ता, नियंता आणि परमेश्वर आहे. आपण प्रसन्न व्हावे, व्यर्थ क्रोध
का करता .
हिरण्यकशिपुः उवाच -
प्रविष्टः कोऽस्य हृदये
दुर्बुद्धेरतिपापकृत् ।
येनेदृशान्यसाधूनि वदत्याविष्टमानसः
॥ २५ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे कोण पापी
ह्या दुर्बुद्धि बालकाच्या ह्रदयात घुसून बसला आहे ज्यामुळे आविष्टचित्त होऊन हा
असे अमंगल वचन बोलत आहे ?
प्रह्लाद उवाच -
न केवलं मद्धृदयं स विष्णुः आक्रम्य
ललोकानखिलानवस्थितः ।
स मां त्वदान्दीश्च पितःसमस्तान् समस्तचेष्टासु
युनक्ति सर्वगः ॥ २६ ॥
प्रल्हाद म्हणाला – तात ! तो विष्णु माझ्याच ह्रदयात
नाही, तर
सम्पूर्ण लोकांमध्ये स्थित आहे. तो सर्वगामी तर मला, तुम्हा सर्वांना आणि समस्त
प्राण्यांना आपल्या आपल्या प्रयत्नात प्रवृत्त करतो .
हिरण्यकिशिपुः उवाच -
निष्कास्यतामयं पापः शास्यतां च
गुरोर्गृहे ।
योजितो दुर्मतिः केन
विपक्षविषयस्तुतौ ॥ २७ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – ह्या पाप्याला
इथून बाहेर काढा आणि गुरुकडे नेऊन त्याला योग्य शासन करा. ह्या दुर्मतिला
कोणी माझ्या विपक्षीच्या प्रशंसेत नियुक्त केले आहे कळत नाही .
श्रीपारशर उवाच -
इत्युक्तोऽसौ
तदा दैत्यैः नीतो गुरुगृहं पुनः ।
जग्राह
विद्यामनिशं गुरुशुश्रूषणोद्यतः ॥ २८ ॥
श्रीपराशर म्हणाले – त्याच्या असे सांगण्यावर दैत्यगण
त्या बालकाला परत गुरूजीकडे घेऊन गेले आणि तो गुरूजींची रात्रंदिवस योग्य प्रकारे
सेवा-शुश्रूषा करत विद्याध्ययन करू लागला.
कालोतीतेति महति प्रह्लादमसुरेश्वरः
।
समाहूयाब्रवीद्गाथा काचित्पुत्रक
गीयताम् ॥ २९ ॥
खूप काळ गेल्यावर दैत्यराजाले प्रल्हादला परत
बोलावले व म्हटले – ‘बाळा !
आज कोणतीतरी गाथा (कथा) ऐकव' .
प्रह्लाद उवाच -
यतः प्रधानपुरुषौ यतश्चैतच्चराचरम् ।
कारणं सकलस्यास्य स नो विष्णुः
प्रसीदतु ॥ ३० ॥
प्रल्हाद म्हणाला – ज्याच्यापासून प्रधान, पुरुष आणि हे
चराचर जगत उत्पन्न झाले आहे तो सकल प्रपंचाचे कारण असलेला श्रीविष्णु आमच्यावर
प्रसन्न होवो .
हिरण्यकशिपुः उवाच -
दुरात्मा वध्यतामेष नानेनार्थोस्ति
जीवता ।
स्वपक्षहानिकर्तृत्वात् यः कुलाङ्गारतां
गतः ॥ ३१ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे ! हा मोठा
दुरात्मा आहे ! ह्याला मारून टाका ! आता हा जगून काहीच फायदा नाही, कारण
स्वपक्षाची हानि करणारा असल्याने तो आपल्या कुळासाठी अंगाररूप झाला आहे .
श्रीपराशर
उवाच -
इत्याज्ञप्तास्ततस्तेन
प्रगृहीतमहायुधाः ।
उद्यतास्तस्य
नाशाय दैत्याः शतसहस्रशः ॥ ३२ ॥
श्रीपराशर म्हणाले – त्यांची अशी आज्ञा झाल्यावर
शेकड़ो-हजारो दैत्यगण मोठमोठे अस्त्र –शस्त्र घेऊन त्याला मारायला तयार झाले .
प्रह्लाद उवाच -
विष्णुः शस्त्रेषु युष्मासु मयि चासौ
व्यवस्थितः ।
दैतेयास्तेन सत्येन
माक्रमन्त्वायुधानि मे ॥ ३३ ॥
प्रल्हाद म्हणाला – अरे दैत्यांनो ! भगवान विष्णु तर
तुमच्या शस्त्रात, तुम्हा
लोकांत आणि माझ्यात सर्वत्रच स्थित आहे. ह्या सत्याच्या प्रभावामुळे ह्या
अस्त्र-शस्त्रांचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही .
श्रीपराशर उवाच
ततस्तैः शतशो दैत्यैः शस्त्रोघैः
आहतोऽपि सन् ।
नावाच वेदनामल्पामभूच्चैव पुनर्नवः ॥
३४ ॥
श्रीपराशर म्हणाले – तेव्हा त्या शेकड़ो दैत्यांच्या
शस्त्र-समूहाचा आघात होऊनही त्याला जराशीही वेदना झाली नाही, तो आधीपेक्षा
जास्त बल-सम्पन्न राहिला
.
हिरण्यकशिपुः उवाच -
दुर्बुद्धे विनिवर्तस्व
वैरिपक्षस्तवादतः ।
अभयं ते प्रयच्छामि मातिमूढमतिर्भव ॥
३५ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे दुर्बुद्धि
! आता तू विपक्षाची स्तुति करण सोड, जा, मी तुला अभय-दान देतो, आता आणखी
मूढपणा नको करूस .
प्रह्लाद उवाच -
भयं भयानामपहारिणि स्थिते मनस्यनन्ते
मम कुत्र तिष्ठति ।
यस्मिन्स्मृते जन्मजरान्तकादि भयानि
सर्वाम्यपयान्ति तात ॥ ३६ ॥
प्रल्हाद म्हणाला – हे तात ! ज्याच्या स्मरणमात्रामु
जन्म, जरा
आणि मृत्यु आदि समस्त भय दूर होतात, त्या सकल-भयहारी अनंताच्या ह्रदयात स्थित
राहिल्याने मला कसले भय असु शकते .
हिरण्यकशिपुः उवाच -
भोभोः सर्पाः दुराचारं
एनमत्यन्तदुर्मतिम् ।
विषज्वालाकुलैः वक्रैः सद्यो नयतः
संक्षयम् ॥ ३७ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे सर्पांनो !
ह्या अत्यंत दुर्बुद्धि आणि दुराचार्याला तुमच्या विषाग्नि-संतप्त मुखांनी दंश
करून शीघ्र नष्ट करा .
श्रीपराशर उवाच -
त्युक्तास्ते ततः सर्पाः
कुहकास्तक्षकादयः ।
अदशन्त समस्तेषु
गात्रेष्वतिविषोल्बणाः ॥ ३८ ॥
श्रीपराशर म्हणाले – अशी आज्ञा झाल्यावर अतिक्रूर आणि
विषधर तक्षक आदि सर्पांनी त्याच्या समस्त शरीरावर दंश केले .
स त्वासक्तमतिः कृष्णे दश्यमानो महोरगैः ।
न विवेदात्मनो गात्रं
तत्स्मृत्याह्लादसुस्थितः ॥ ३९ ॥
पण तो श्रीकृष्णचद्रात आसक्त-चित्त असल्याने व
भगवत्स्मरणाच्या परमानंदात मग्न राहिल्याने त्या महासर्पांनी दंश केल्यावरही
त्याच्या शरीरावर कोणत्याही खूणा झाल्या नाहीत .
सर्पा ऊचुः -
दंष्ट्रा विशीर्णा मणयः स्फुटन्ति फणेषु
तापो हृदयेषु कम्पः ।
नास्य त्वचः स्वल्पमपीह भिन्नं प्रशाधि
दैत्येश्वर कार्यमन्यत् ॥ ४० ॥
सर्प म्हणाले – हे दैत्यराजा ! पाहा, आमचे दात तुटले, मणि फुटू लागले, फणांमध्ये
वेदना होऊ लागली आणि ह्रदय कापू लागले, पण ह्याच्या त्वचेवर जराही चावल्याचे चिन्ह नाही.
म्हणून तुम्ही आता आम्हाला दुसरे कार्य सांगा .
हिरण्यकशिपुः उवाच -
हे दिग्गजाः संकटदन्तमिश्रा घ्नतैनमस्मद्
रिपुपक्षभिन्नम् ।
तज्जा विनाशाय भवन्ति तस्य यथारणेः
प्रज्वलितो हुताशः ॥ ४१ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – हे दिग्गजांनो
! तुम्ही सर्व मिळून आपल्या संकीर्ण दातांनी माझ्या शत्रुपक्षाने माझ्या विरुद्ध
केलेल्या ह्या बालकाला मारून टाका. जसा अरणीपासून उत्पन्न झालेला अग्नि अरणीलाच
जाळतो त्याचप्रकारे काहीजण ज्यापासून उत्पन्न होतात त्याचाच नाश करतात .
श्रीपराशर उवाच -
ततः स दिग्गजैः बालो
भूभृच्छिखरसन्निभैः ।
पातितो धरणीपृष्ठे विषाणैः वावपीडितः
॥ ४२ ॥
श्रीपराशरजी म्हणाले– तेव्हा
पर्वत-शिखरासमान विशालकाय दिग्गजांनी त्या बालकाला पृथ्वीवर आपटून आपल्या दातांनी
खूप तुडवलं .
स्मरतस्तस्य
गोविन्दमभिदन्ताः सहस्रशः ।
शीर्णा वक्षस्थलं प्राप्य स प्राह
पितरं ततः ॥ ४३ ॥
पण श्रीगोविंदाचे स्मरण करत राहिल्याने हत्तींचे
हजारो दात त्याच्या वक्ष:स्थळावर आदळताच तुटून गेले, तेव्हा त्याने पिता हिरण्यकशिपुला
म्हटले .
दन्ता गजानां कुलिशाग्रनिष्ठुराः शीर्णा
यदेतेन बलं ममैतत् ।
महाविपत्तापविनाशनोऽयं जनार्दनानुस्मरणानुभावः
॥ ४४ ॥
हे जे
हत्तींचे वज्रा समान कठोर दात तूटले त्यात माझे काहीच बळ नाही, हा तर
श्रीजनार्दनभगवंताच्या महाविपत्ति आणि क्लेशांना नष्ट करणार्या स्मरणाचाच प्रभाव
आहे .
हिरण्यकशिपुः उवाच -
ज्वाल्यतामसुरा बह्निः अपसर्पत
दिग्गजाः ।
वायो समेधयाग्निं त्वं दह्यतामेष
पापकृत् ॥ ४५ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे दिग्गजांनो
! तुम्ही बाजूला व्हा. दैत्यगणांनो ! तुम्ही आग लावा, आणि हे वायु !
तु अग्निला प्रज्वलित कर ज्यामुळे ह्या पाप्याला जाळून टाकता येईल .
श्रीपराशर उवाच -
महाकाष्ठचयस्थं तमसुरेन्द्रसुतं ततः
।
प्रज्वाल्य दानवा वह्निं ददहुः
स्वामिनोदिताः ॥ ४६ ॥
श्रीपराशरजी म्हणाले – तेव्हा अपल्या
स्वामीच्या आज्ञेने दानवगण लाकडांच्या मोठा ढीगामध्ये उभे करून त्या असुर
राजकुमाराला अग्नि प्रज्वलित करून जाळू लागले .
प्रह्लाद उवाच -
तातैष वह्निः पवनेरितोऽपि न मां
दहत्यत्र समन्ततोऽहम् ।
पश्यामि पद्मास्तरणास्तृतानि शीतानि
सर्वाणि दिशां मुखानि ॥ ४७ ॥
प्रल्हाद म्हणाला – हे तात ! पवनाने प्रेरित करूनही हा
अग्नि मला जाळत नाही. मला तर सर्वच दिशा इतक्या शीतल वाटत आहेत जणू चहुबांजूला
कमळं पसरवली आहेत .
श्रीपराशर उवाच -
अथ दैत्येश्वरं
प्रोचुर्भार्गवस्यात्मजा द्विजाः ।
पुरोहिता महात्मानः साम्ना संस्तूय
वाग्मिनः ॥ ४८ ॥
श्रीपराशर म्हणाले – त्यानन्तर शुक्राचार्यांचे ज्येष्ठ
पुत्र वाग्मी
महात्मा पुरोहितगण सामनीतिने दैत्यराजाची बढाई करत म्हणाले .
पुरोहिता ऊचुः -
राजन्नियम्यतां कोपो बालेपि तनये
निजे ।
कोपो देवनिकायेषु तेषु ते शपलो यतः ॥
४९ ॥
पुरोहित म्हणाले – हे राजन ! तुम्ही ह्या बालक
पुत्रावरचा आपला क्रोध शांत करा, तुम्हाला तर देवतांवर क्रोध करायला हवा, कारण ह्यात
त्यांची सफलता आहे
.
तथातथैनं बालं ते शासितारो वयं नृपः ।
यथा विपभनाशाय विनीतस्ते भविष्यति ॥
५० ॥
हे राजन ! आम्ही आपल्या ह्या बालकाला असे शिक्षण
देऊ ज्यामुळे तो विपक्षाच्या नाशाचे कारण होऊन आपल्या प्रति अति विनीत होईल .
बालत्वं सर्वदोषाणां दैत्यराजास्पदं यतः ।
ततोत्र कोपमत्यर्थं योक्तुमर्हसि
नार्भके ॥ ५१ ॥
हे दैत्यराजा ! बाल्यावस्था तर सर्व प्रकारच्या
दोषांचा आश्रय असते, म्हणून
आपण ह्या बालकावर क्रोध प्रयोग करू नये .
न
त्यक्ष्यति हरेः पक्षमस्माकं वचनाद्यदि ।
ततः कृत्यां वधायास्य
करिष्यामोऽनिवर्तिनीम् ॥ ५२ ॥
जर आमच्या सांगण्यावरूनही ह्याने विष्णुचा पक्ष
सोडला नाही तर आम्ही त्याला नष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारे न टाळता येणारी
कृत्या उत्पन्न करू .
श्रीपराशर उवाच -
एवमभ्यर्थितस्तैस्तु दैत्यराजः
पुरोहितैः ।
दैत्यैः निष्कासयामास पुत्रं
पावकसञ्चयात् ॥ ५३ ॥
श्रीपराशर म्हणाले – पुरोहितांनी अशाप्रकारे प्रार्थना
केल्यावर दैत्यराजाने दैत्यांद्वारा प्रल्हादला अग्निसमूहातून बाहेर काढले .
ततो गुरुगृहे वालः स वसन्बालदानवान् ।
अध्यापयामास मुहुः उपदेशान्तरे गुरोः
॥ ५४ ॥
मग प्रल्हाद, गुरूंकडे राहून त्यांनी शिकवून झाल्यावर अन्य
दानवकुमारांना वारंवार उपदेश देऊ लागला .
प्रह्लाद उवाच -
श्रूयतां
परमार्थो मे दैतेया दितिजात्मजाः ।
न
चान्यथैतन्मन्तव्यं नात्र लोभादिकारणम् ॥ ५५ ॥
प्रल्हाद म्हणाला – हे दैत्यकुलोत्पन्न असुर-बालकांनो !
ऐका, मी
तुम्हाला परमार्थाचा उपदेश करतो, गैरसमज करून घेऊ नका, कारण माझे असे
सांगण्यामागे कोणत्याही प्रकारचे लोभादि कारण नाही .
जन्म बाल्यं ततः सर्वो जन्तुः
प्राप्नोति यौवनम् ।
अव्याहतैव भवति ततोऽनुदिवसं जराः ॥
५६ ॥
सर्व जीव जन्म, बाल्यावस्था आणि मग यौवन प्राप्त
करतात, तत्पश्चात
दिवसेंदिवस वृद्धावस्थेची प्राप्ति देखिल अनिवार्यच आहे .
ततश्च सृत्युमभ्येति जन्तुर्दैत्येश्वरात्मजाः ।
प्रत्यक्षं दृस्यते चैतद् अस्माकं
भवतां तथा ॥ ५७ ॥
आणि हे दैत्यराजकुमारांनो ! मग तो जीव मृत्युमुखी जातो, हे आम्ही आणि
तुम्ही सर्वच प्रत्यक्ष पाहतो .
मृतस्य
च पुनर्जन्म भवत्येतच्च नान्यथा ।
आगमोऽयं तथा यच्च नोपादानं विनोद्भवः
॥ ५८ ॥
मृत्युनंतर पुनर्जन्म होतो, हा नियम सुद्धा
कधीच टाळता येत नाही. [श्रुति-स्मृतिरूप] आगम सुद्धा ह्या विषयाचे प्रमाण आहे कि
उपादाना शिवाय कोणतीच वस्तु उत्पन्न होत नाही .
गर्भवासादि
यावत्तु पुनर्जन्मोपपादनम् ।
सह
स्तावस्थकं तावद् दुःखमेवावगम्यताम् ॥ ५९ ॥
पुनर्जन्म प्राप्त करण्यासाठि गर्भवास आदि
जितक्या अवस्था आहेत त्या सर्वाना दुःखरूपच समजा .
क्षुत्तृष्णोपशमं तद्वद् शीताद्युपशमं मुखम् ।
मन्यते बालबुद्धित्वाद् दुःखमेव हि
तत्पुनः ॥ ६० ॥
मनुष्य मुर्खतावश क्षुधा, तृष्णा व
शीतादि शान्तिलाच सुख मानतो, पण वास्तवात ते सर्व दुःखमात्रच आहेत .
अत्यन्तस्तिमिताङ्गानां व्यायामेन सुखैषिणाम् ।
भ्रान्तिज्ञानावृताक्षाणां दुःखमेव
सुखायते ॥ ६१ ॥
ज्यांचे शरीर [वातादि दोषाने] अत्यंत शिथिल होते
त्यांना ज्याप्रकारे व्यायाम सुखप्रद वाटतो त्याचप्रकारे ज्यांची दृष्टि
भ्रान्तिज्ञानाने झाकलेली असते त्यांना दुःखच सुख वाटते .
क्व शरीरमशेषाणां श्लेष्मादीनां
महाचयः ।
क्व कान्तिशोभासौन्दर्य रमणीयादयो
गुणाः ॥ ६२ ॥
अहो ! कुठे कफ आदि महाघृणास्पद पदार्थांचे
समूहरूप शरीर आणि कुठे कान्ति, शोभा, सौन्दर्य एवं रमणीयता आदि दिव्य गुण ?
मांसासृक् पूयविण्मूत्र
स्नायुमज्जास्थिसंहतौ ।
देहे चेत्प्रीतिमान् मूढो भविता
नरकेऽप्यसौ ॥ ६३ ॥
जर कोणा मूढ़ पुरुषाचे मांस, रुधिर, पीब, विष्ठा, मूत्र, स्नायु, मज्जा आणि
अस्थिंचे समूहरूप असलेल्या ह्या शरीरावर प्रीति जडू शकते तर त्याला नरक सुद्धा
प्रिय वाटू शकतो .
अग्नेः शीतेन तोयस्य तृषा भक्तस्य च
क्षुधा ।
क्रियते सुखकर्तृत्वं तद्विलोमस्य
चेतरैः ॥ ६४ ॥
अग्नि, जलाच्या शीतलतेने, व भक्त तृषा व क्षुधेमुळेच सुखकारी
होतो आणि त्यांचे प्रतियोगी जल आदि सुद्धा आपल्याहून भिन्न अग्नि मुळेच सुखकारी
होतात .
करोति हे दैत्यसुता यावन्मात्रं
परिग्रहम् ।
तावन्मात्रं स एवास्य दुःखं चेतसि
यच्छति ॥ ६५ ॥
हे दैत्यकुमारांनो ! विषयांचा जितका जास्त संग्रह
केला जातो तितकं जास्त ते मनुष्याच्या मनातील दुःख वाढवतात .
यावतः कुरुते जन्तुः सम्बन्धान्मनसः
प्रियान् ।
तावन्तोस्य निखन्यन्ते हृदये शोकशङ्कवः
॥ ६६ ॥
जीव आपल्या मनाला प्रिय असणारे सम्बन्ध जितके
वाढवत जातो तितके त्याच्या ह्रदयात शोकरुपी शल्य स्थिर होत जातात .
यद्यद्गृहे तन्मनसि यत्र तत्रावतिष्ठतः ।
नाशदाहोपकरणं तस्य तत्रैव तिष्ठति ॥
६७ ॥
घरात जे काही धन-धान्यादि असते मनुष्य कुठेही
राहिला तरी ते पदार्थ त्याच्या चित्तात घर करून राहतात आणि त्याच्या नाशाची व दाह
आदिची सामग्री सुद्धधा त्यातच स्थित असते .
जन्मन्यत्र महद्दुखं म्रियमाणस्य चापि तत् ।
यातनासु
यमस्योग्रं गर्भसंक्रमणेषु च ॥ ६८ ॥
अशा प्रकारे जिवंतपणी तर इथे महान दुःख असतच, पण
मृत्युनंतरही यम-यातनांचे व गर्भ-प्रवेशाचे उग्र कष्ट भोगावे लागतात .
गर्भेषु सुखलेशोऽपि भवद्भिः
अनुमीयते ।
यदि तत्कथ्यतामेवं सर्वं दुःखमयं
जगत् ॥ ६९ ॥
जर तुम्हाला गर्भवासात लेशमात्र सुखाचा अनुभव होत
असेल तर सांगा. पूर्ण संसार असाच अत्यंत दुःखमय आहे .
तदेवमतिदुखानां आस्पदेऽत्र भवार्णेवे
।
भवतां कथ्यते सत्यं विष्णुरेकः
परायणः ॥ ७० ॥
म्हणून दु:खाचा परम आश्रय असलेल्या ह्या संसार
समुद्रात एकमात्र श्रीविष्णुच तुम्हा सर्व लोकांची परमगति आहे – हे मी सर्वथा सत्य
सांगत आहे.
मा जानीत वयं बाला देही देहेषु
शाश्वतः ।
जरायौवनजन्माद्य धर्मा देहस्य
नात्मनः ॥ ७१ ॥
असे समजू नका की मी अजून लहान बालक आहे, कारण जरा, यौवन आणि जन्म
आदि अवस्था देहाचेच धर्म आहेत, शरीराचा अधिष्ठाता आत्मा नित्य आहे, त्याच्यात हे
कोणतेच धर्म नाहीत .
बालोऽहं तावदिच्छातो यतिष्ये श्रेयसे
युवा ।
युवाहं वार्धके प्राप्ते
करिष्याम्यात्मनो हितम् ॥ ७२ ॥
वृद्धोऽहं मम कार्याणि समस्तानि न गोचरे ।
किं करिष्यामि मन्दात्मा समर्थेन न
यत्कृतम् ॥ ७३ ॥
एवं दुराशया क्षिप्तमानसः पुरुषः सदा ।
श्रेयसोऽभिमुखं याति न
कादाचित्पिपासितः ॥ ७४ ॥
जो मनुष्य अशा दुराशांपासून विक्षिप्तचित्त राहतो
कि ‘अजून
मी बालक आले म्हणून इच्छेनुसार खेळून घेतो, युवावस्था प्राप्त झाल्यावर कल्याण-साधनेचा
प्रयत्न करेन ’ ‘अजून
मी तरूण आहे, म्हातारपणी
आत्मकल्याण करेन ’ आणि 'आता मी
म्हातारा झालो, आता
माझी इन्द्रिये आपल्या कर्मात प्रवृत्तच नाही होत, शरीर शिथिल झाल्यावर आता मी काय करू
शकतो ? सामर्थ्य
असताना मी काहीच केले नाही.’ तो अपने कल्याण-मार्गावर कधीच पुढे जात नाही, फक्त
भोग-तृष्णेतच व्याकुळ राहतो .
बाल्ये क्रिडनकासक्ता यौवने
विषयोन्मुखाः ।
अज्ञा नयन्त्यशक्त्या च वार्धकं
समुपस्थितम् ॥ ७५ ॥
मुर्खलोक आपल्या बाल्यावस्थेत खेळत राहतात, युवावस्थेत
विषयांमध्ये फसलेले असतात आणि म्हातारपण आल्यावर असमर्थतेमुळे व्यर्थ व्यतित करतात .
तस्माद्बाल्ये विवेकात्मा यतेत
श्रेयसे सदा ।
बाल्ययौवनवृद्वाद्यैः देहभावैः
असंयुतः ॥ ७६ ॥
म्हणून विवेकी पुरुषाने देहाच्या बाल्य, यौवन व वृद्ध
आदि अवस्थांची अपेक्षा न करता बाल्यावस्थेतच आपल्या कल्यणाचा प्रयत्न करावा .
तदेतद्वो मयाख्यातं यदि जानीत
नानृतम् ।
तदस्मत्प्रीतये विष्णुः स्मर्यतां
बन्धमुक्तिदः ॥ ७७ ॥
मी तुम्हाला जे काही सांगितले ते जर तुम्ही
मिथ्या मानत नसाल तर माझ्या प्रसन्नते साठी तरी बंधनमुक्त करणार्या श्रीविष्णुचे
स्मरण करा .
प्रयासः स्मरणे कोऽस्य स्मृतो यच्छति
शोभनम् ।
पापक्षयश्च भवति स्मरतां तमहर्निशम्
॥ ७८ ॥
त्यांचे स्मरण करण्यात परिश्रम कसले ? व केवळ
स्मरणानेच ते अति शुभ फल देतात तसेच रात्रंदिवस त्यांचेच स्मरण करणार्यांचे पापही
नष्ट होते .
सर्वभूतस्थिते तस्मिन् मतिर्मैत्री दिवानिशम् ।
भवतां जायतामेवं
सर्वक्लेशान्प्रहास्यथ ॥ ७९ ॥
त्या सर्वभूतस्थ प्रभुत तुमची बुद्धि अहर्निश
राहो आणि त्यांच्यात निरंतर तमचे प्रेम वाढो; अशाप्रकाहे तुमचे समस्त क्लेश दूर होतील .
तापत्रयेणाभिहतं यदेतदखिलं जगत् ।
तदा शोच्येषु भूतेषु द्वेषं प्राज्ञः
करोति कः ॥ ८० ॥
जेव्हा संपूर्ण संसार तापत्रयाने दग्ध होत आहे
तेव्हा ह्या शोचनीय जीवांचा कोण बुद्धिमान द्वेष करेल ?
अथ भद्राणि भूतानि हीनशक्तिरहं परम्
।
मुदं तदापि कुर्वीत हानिर्द्वेषफलं
यतः ॥ ८१ ॥
आणि ‘जीव तर आनंदातच आहे , मीच परम
शक्तिहीन आहे' असा
विचार करत असेल तरीही प्रसन्न राहावे कारण द्वेषाचे दुःखदायीच असते .
बद्धवैराणि भूतानि द्वेषं कुर्वन्ति चेत्ततः ।
सुशोच्यान्यतिमोहेन
व्याप्तानीति मनीषिणाम् ॥ ८२ ॥
जर कोणी प्राणी वैरभावाने द्वेष करत असेल तर विचारवंतांसाठी
तो ‘अहो !
हा महामोहाने व्याप्त आहे
’ असा अत्यंत शोचनीय आहे .
एते भिन्नदृसां दैत्या विकल्पाः
कथिता मया ।
कृत्वाभ्युपगमं तत्र संक्षेपः
श्रूयतां मम ॥ ८३ ॥
हे दैत्यगणांनो ! हे मी भिन्नभिन्न दृष्टिकोन
असलेल्यांचे विकल्प सांगितले. आता त्यांचा समन्वयपूर्वक संक्षिप्त विचार ऐका .
विस्तारः सर्वभूतस्य विष्णोः सर्वमिदं जगत् ।
द्रष्टव्यमात्मवत् तस्मात् अभेदेन
विचक्षणैः ॥ ८४ ॥
हे सम्पूर्ण जगत सर्वभूतमय भगवान विष्णुचा
विस्तार आहे, म्हणून
विचक्षण पुरुषांनी ह्याला आत्मा समान अभेदरूपाने पाहिले पाहिजे.
समुत्सृज्यासुरं भावं तस्माद् यूयं
यथा वयम् ।
तथा यत्नं करिष्यामो यथा
प्राप्स्याम निर्वृतिम् ॥ ८५ ॥
म्हणून दैत्यभाव सोडून आपण सर्व असा प्रयत्न
करूया ज्याने शान्तिचा लाभ मिळवू शकू .
या नाग्निना न चार्केण नेन्दुना न च
वायुना ।
पर्जन्यवरुणाभ्यां वा न सिद्धेर्न च
राक्षसैः ॥ ८६ ॥
न यक्षैः न च दैत्येन्द्रैः नोरगैः न
च किन्नरैः ।
न मनुष्यैः न पशुभिः दोषैः
नैवात्मसम्भवैः ॥ ८७ ॥
ज्वाराक्षिरोगातीसार
प्लीहगुल्मादिकैस्तथा ।
द्वेषेर्ष्यामत्सराद्यैर्वा
रागलोभादिभिः क्षयम् ॥ ८८ ॥
न चान्यैः नीयते कैश्चित् नित्या
यात्यन्तनिर्मला ।
तामाप्नोत्यमलेन्यस्य केशवे हृदयं
नरः ॥ ८९ ॥
जो अग्नि, सूर्य, चन्द्रमा, वायु, मेघ, वरुण, सिद्ध, राक्षस, यक्ष, दैत्यराज, सर्प, किन्नर,मनुष्य, पशु व आपल्या दोषांनी तसेच ज्वर, नेत्ररोग, अतिसार, प्लीहा आणि
गुल्म आदि रोगांनी व द्वेष,
ईर्ष्या, मत्सर, राग, लोभ आणि
कोणत्याही अन्य भावाने कधीच क्षीण होत नाही, आणि जो सर्वदा अत्यंत निर्मल आहे तो मनुष्य
अमलस्वरूप श्रीकेशवात मनोंनिवेश करण्याने प्राप्त करतो .
असारसंसारविवर्तनेषु मा यात तोषं
प्रसभं ब्रवीमि ।
सर्वत्र दैत्याःसमतामुपेत समत्वमाराधनमच्युतस्य
॥ ९० ॥
हे दैत्यांनो ! मी आग्रहपूर्वक सांगतो, तुम्ही ह्या
असार संसाराच्या विषयांमध्ये कधीच संतुष्ट होऊ नका. तुम्ही सर्वत्र समदृष्टि ठेवा, कारण समता
म्हणजेच श्रीअच्युताची आराधना आहे .
तस्मिन्प्रसन्ने किमिहास्त्यलभ्यं धर्मार्थकामैः
अलमल्पकास्ते ।
समाश्रिताद्ब्रह्मतरोरनन्ता निःसंशयं
प्राप्स्यथ वै महत्फलम् ॥ ९१ ॥
त्या अच्युताच्या प्रसन्न झाल्यावर संसारात काय
दुर्लभ आहे ? तुम्ही
धर्म, अर्थ
आणि कामाची कधीच इच्छा करू नका, ते तर अत्यंत तुच्छ आहेत. त्या ब्रह्मरूप
महावक्षाचा आश्रय घेतल्याने नि:संदेह [मोक्षरूप] महाफल प्राप्त कराल.
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे सप्तदशोऽध्याय"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा