॥ प्रथमः अंशः ॥ ॥ चतुर्दशोऽध्यायः ॥
"प्राचीनबर्हिचा
जन्म व प्रचेतांचे भगवदाराधन"
पराशर उवाच
पृथोः पुत्रौ महावीर्यौ
जज्ञातेऽन्तर्द्धिवादिनौ ।
शिखण्ड्इनी हविर्धानमन्तर्धानाद्व्यजायत
॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले – हे मैत्रेया !
पृथुला अन्तर्धान आणि वादी नामक दोन धर्मज्ञ पुत्र झाले, अंतर्धानापासून
त्याची पत्नी शिखंडीनीने हविर्धानाला उत्पन्न केले .
हविर्धानात् षडाग्नेयी
धिषणाजनयत्सुतान् ।
प्राचीनबर्हिषं शुक्रं गयं कृष्णं
वृजाजिनौ ॥ २ ॥
हविर्धानपासून अग्निकुलीना धिषणाने
प्राचीनबर्हि, शुक्र, गय, कृष्ण, वृज आणि अजिन
हे सहा पुत्र उत्पन्न केले
.
प्राचीनबर्हिर्भगवान्महानासीत्प्रजापतिः
।
हविर्धानिर्महाभाग येन संवर्धिताः
प्रजाः ॥ ३ ॥
हे महाभागा ! हविर्धानापासून उत्पन्न
झालेले भगवान प्राचीनबर्हि एक महान प्रजापति होते, ज्यांनी यज्ञा द्वारा आपल्या प्रजेची
खूप वृद्धि केली .
प्राचीनाग्राः कुशास्तस्य पृथिव्यां
विश्रुता मुने ।
प्राचीनबर्हिरभवत्ख्यातो
भुवि महाबलः ॥ ४ ॥
हे मुने ! त्यांच्या वेळी
[यज्ञानुष्ठानाच्या अधिकतेमुळे] प्राचिनाग्र कुश समस्त पृथ्वीवर पसरले होते, म्हणून ते
महाबली ‘प्राचीनबर्हि’ नावाने विख्यात
झाले.
समुद्रतनयायां
तु कृतदारो महीपतिः ।
महतस्तपसः
पारे सवर्णायां महीपतेः ॥ ५ ॥
हे महामते ! त्या महीपतिने महान
तपस्या करून समुद्रकन्या सवर्णा सोबत विवाह केला .
सवर्णाधत्त सामुद्री दश
प्राचीनबर्हिषः ।
सर्वे प्रचेतसो नाम धनुर्वेदस्य
पारगाः ॥ ६ ॥
त्या समुद्रकन्या सवर्णाला
प्राचीनबर्हिपासून दहा पुत्र झाले. ते प्रचेता नामक सर्व पुत्र धनुर्विद्येत निपुण
होते .
अपृथग्धर्मचरणास्तेऽतप्यन्त महत्तपः
।
दश वर्षसहस्राणि समुद्रसलिलेशयाः ॥ ७
॥
त्यांनी समुद्र जलात राहून दहा हजार
वर्षांपर्यंत समान धर्माचे आचरण करत घोर तपस्या केली .
मैत्रेय उवाच
यदर्थं ते
महात्मानस्तपस्तेपुर्महामुने ।
प्रचेतसः
समुद्राम्भस्येतदाख्यातुमर्हसि ॥ ८ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले – हे महामुने !
त्या महात्मा प्रचेतांनी ज्यासाठी समुद्रजलात तपस्या केली होती ते आपण सांगावे .
पराशर उवाच
पित्रा प्रचेतसः प्रोक्ताः
प्रजार्थममितात्मना ।
प्रजापतिनियुक्तेन बहुमानपुरःसरम् ॥
९ ॥
श्रीपराशर म्हणाले– हे मैत्रेया !
एकदा प्रजापतिच्या प्रेरणेने प्रचेतांचे महात्मा पिता प्राचीनबर्हिने त्यांना अति
सम्मानपूर्वक संतानोत्पत्तिसाठी अशाप्रकारे सांगितले .
प्राचीनबर्हिरुवाच
ब्रह्मणा देवदेवेन समादिष्टोऽस्म्यहं
सुताः ।
प्रजाः संवर्धनीयास्ते मया चोक्तं
तथेति तत् ॥ १० ॥
प्राचीनबर्हि म्हणाले– हे पुत्रांनो !
देवाधिदेव ब्रह्माने मला आज्ञा दिली आहे कि ‘तु प्रजेची वृद्धि कर’ आणि मी सुद्धा
त्यांना ‘तसेच
करेन’ असे
सांगितले .
तन्मम प्रीतये पुत्राः
प्रजावृद्धिमतन्द्रिताः ।
कुरुध्वं माननीया च सम्यगाज्ञा
प्रजापतेः ॥ ११ ॥
म्हणून हे पुत्रगणांनो ! तुम्ही
सुद्धा मला प्रसन्न करण्यासाठी सावधानतापूर्वक प्रजेची वृद्धि करा, कारण
प्रजापतिची आज्ञा तुम्हाला सुद्धा सर्वथा माननीय आहे .
पराशर उवाच
ततस्ते तत्पितुः श्रुत्वा वचनं
नृपनन्दनाः ।
तथेत्युक्त्वा च तं भूयः पप्रच्छुः
पितरं मुने ॥ १२ ॥
श्रीपराशर म्हणाले– हे मुने ! त्या
राजकुमारांनी पित्याचे बोलणे ऐकून त्यांना ‘जशी आज्ञा’ असे म्हणून परत विचारले .
प्रचेतस ऊचुः
येन तात प्रजावृद्धौ समर्थाः कर्मणा
वयम् ।
भवेम तत् समस्तं नः कर्म
व्याख्यातुमर्हसि ॥ १३ ॥
प्रचेता म्हणाले – हे तात ! ज्या
कर्मामुळे आम्ही प्रजावृद्धिसाठी समर्थ होऊ ते तुम्ही आम्हाला नीट समजावून सांगा .
पितोवाच
आराध्य वरदं
विष्णुमिष्टप्राप्तिमसंशयम् ।
समेति नान्यथा मर्त्यः
किमन्यत्कथयामि वः ॥ १४ ॥
पित्याने म्हटले – वरदायक भगवान
विष्णुची आराधना केल्यानेच मनुष्याला नि:संदेह इष्ट वस्तुची प्राप्ति होते आणखी
कोणत्याही उपायाने नाही. ह्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी काय सांगू?
तस्मात् प्रजाविवृद्ध्यर्थं
सर्वभूतप्रभुं हरिम् ।
आराधयत गोविन्दं यदि सिद्धिमभीप्सथ ॥
१५ ॥
म्हणून जर तुम्हाला सफलता हवी असेल
तर प्रजावृद्धिसाठी सर्वभूतांचे स्वामी श्रीहरि गोविन्द ह्यांची उपासना करा .
धर्ममर्थं च कामं च मोक्षं
चान्विच्छतां सदा ।
आराधनीयो भगवाननादिपुरुषोत्तमः ॥ १६
॥
धर्म, अर्थ, काम किंवा मोक्षाची इच्छा करणार्यांनी
नेहमी अनादि पुरुषोत्तम भगवान विष्णुची आराधना करायला हवी .
यस्मिन्नाराधिते
सर्गं चकारादौ प्रजापतिः ।
तमाराध्याच्युतं
वृद्धिः प्रजानां वो भविष्यति ॥ १७ ॥
कल्पाच्या आरंभी ज्यांची उपासना करून
प्रजापतिंनी संसाराची रचना केली आहे, तुम्ही त्या अच्युताचीच आराधना करा. त्यामुळे
तुमच्या संततिची वृद्धि होईल .
पराशर उवाच
इत्येवमुक्तास्ते पित्रा पुत्राः
प्रचेतसो दश ।
मग्नाः पयोधिसलिले तपस्तेपुः
समाहिताः ॥ १८ ॥
श्रीपराशर म्हणाले – पित्याची अशी
आज्ञा झाल्यावर प्रचेता नामक दहा पुत्रांनी समुद्रजलात पूर्णपणे बुडून राहून
सावधानतापूर्वक तपाला आरम्भ केला .
दश वर्षसहस्राणि न्यस्तचित्ता
जगत्पतौ ।
नारायणे मुनिश्रेष्ठ सर्वलोकपरायणे ॥
१९ ॥
तत्रैव ते स्थिता देवमेकाग्रमनसो
हरिम् ।
तुष्टुवुर्यस्स्तुतः कामान्
स्तोतुरिष्टान्प्रयच्छति ॥ २० ॥
हे मुनिश्रेष्ठा ! सर्वलोकाश्रय
जगत्पति श्रीनारायणात चित्त लावून त्यांनी दहा हजार वर्ष तिथेच (जलातच) स्थित
राहून देवाधिदेव श्रीहरिची एकाग्र-चित्ताने स्तुति केली, जो आपली स्तुति
केल्यावर स्तुति करणार्यांच्या सर्व कामना सफल करतो .
मैत्रेय उवाच
स्तवं
प्रचेतसो विष्णोः समुद्राम्भसि संस्थिताः ।
चक्रुस्तन्मे
मुनिश्रेष्ठ सुपुण्यं वक्तुमर्हसि ॥ २१ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले– हे
मुनिश्रेष्ठा ! समुद्रजलात स्थित राहून प्रचेतांनी भगवान विष्णुंची जी अति पवित्र
स्तुति केली होती ती कृपा करून मला सांगा .
पराशर उवाच
शृणु मैत्रेय गोविन्दं यथापूर्वं
प्रचेतसः ।
तुष्टुवुस्तन्मयीभूताः
समुद्रसलिलेशयाः ॥ २२ ॥
श्रीपराशर म्हणाले– हे मैत्रेया !
पूर्वकाळी समुद्रात स्थित राहून प्रचेतांनी तन्मय-भावाने श्रीगोविंदाची जी स्तुति
केली ती ऐक .
प्रचेतस ऊचुः
नताः स्म सर्ववचसां प्रतिष्ठा यत्र
शाश्वती ।
तमाद्यन्तमशेषस्य जगतः परमं प्रभुम्
॥ २३ ॥
प्रचेता म्हणाले– ज्यांच्यात
सम्पूर्ण वाक्यांची नित्य-प्रतिष्ठा आहे [अर्थात जो सम्पूर्ण वाक्यांचा एकमात्र
प्रतिपाद्य आहे] तसेच जो जगताच्या उत्पत्ति आणि प्रलयाचे कारण आहे त्या
निखिल-जगन्नायक परमप्रभुला आम्ही नमस्कार करतो .
ज्योतिराद्यमनौपम्यमण्वनन्तमपारवत् ।
योनिभूतमशेषस्य स्थावरस्य चरस्य च ॥
२४ ॥
यस्याहः प्रथमं रूपमरूपस्य तथा निशा
।
संध्या च परमेशस्य तस्मै कालात्मने
नमः ॥ २५ ॥
जो आद्य ज्योतिस्स्वरूप, अनुपम, अणु, अनंत, अपार आणि समस्त
चराचराचे कारण आहे, तसेच
ज्या रूपहीन परमेश्वराचे दिवस, रात्र आणि संध्या ही प्रथम रूपे आहेत, त्या कालस्वरूप
भगवंताला आमचा नमस्कार .
भुज्यतेऽनुदिनं देवैः पितृभिश्च
सुधात्मकः ।
जीवभूतः समस्तस्य तस्मै सोमात्मने
नमः ॥ २६ ॥
समस्त प्राण्यांचे जीवनरूप ज्यांच्या
अमृतमय स्वरूपाला देव आणि पितृगण नित्यप्रति भोगतात – त्या सोमस्वरूप प्रभुला
नमस्कार .
यस्तमांस्यत्ति तीव्रात्मा
स्वभाभिर्भासयन्नभः ।
घर्मशीताम्भसां योनिस्तस्मै
सूर्यात्मने नमः ॥ २७ ॥
जो तीक्ष्णस्वरूप आपल्या तेजाने
आकाशमंडल प्रकाशित करर अन्धकार भक्षण करतो तसेच जो घाम, शीत आणि जलाचे
उद्गमस्थान आहे त्या सूर्यस्वरूप [नारायणाला] नमस्कार .
काठिन्यवान्
यो बिभर्ति जगदेतदशेषतः ।
शब्दादिसंश्रयो
व्यापी तस्मै भूम्यात्मने नमः ॥ २८ ॥
जे कठीण होऊन ह्या सम्पूर्ण संसाराला
धारण करतात आणि शब्द आदि पाच विषयांचा आधार तसेच व्यापक आहेत, त्या भुमिरूप
भगवंताला नमस्कार .
यद्योनिभूतं जगतो बीजं
यत्सर्वदेहिनाम् ।
तत्तोयरूपमीशस्य नमामो हरिमेधसः ॥ २९
॥
जो संसाराचे योनिरूप आहे आणि समस्त
देहधारींचे बीज आहे, भगवान
हरिच्या त्या जलस्वरूपाला आम्ही नमस्कार करतो .
यो मुखं सर्वदेवानां हव्यभुक्
कव्यभुक् तथा ।
पितॄणां
च नमस्तस्मै विष्णवे पावकात्मने ॥ ३० ॥
जो समस्त देवतांचे हव्यभूक आणि
पितृगणांचे कव्यभूक मुख आहे, त्या अग्निस्वरूप विष्णुभगवंताला नमस्कार .
पञ्चधावस्थितो देहे यश्चेष्टां
कुरुतेऽनिशम् ।
आकाशयोनिर्भगवांस्तस्मै वाय्वात्मने
नमः ॥ ३१ ॥
जो प्राण, अपान आदि पाच
प्रकारच्या देहात स्थित होऊन दिवस रात्र चेष्टा करत राहतो तसेच ज्याची योनि आकाश
आहे, त्या
वायुरूप भगवंताला नमस्कार
.
अवकाशमशेषाणां भूतानां यः प्रयच्छति
।
अनन्तमूर्तिमाञ्छुद्धस्तस्मै
व्योमात्मने नमः ॥ ३२ ॥
जो समस्त भूतांना अवकाश देतो त्या
अनंतमूर्ति आणि परम शुद्ध आकाशस्वरूप प्रभुला नमस्कार .
समस्तेन्द्रियवर्गस्य यः सदा
स्थानमुत्तमम् ।
तस्मै शब्दादिरूपाय नमः कृष्णाय
वेधसे ॥ ३३ ॥
समस्त इन्द्रिय-सृष्टिचे जो उत्तम
स्थान आरे त्या शब्द-स्पर्शादिरूप विधाता श्रीकृष्णचद्राला नमस्कार .
गृह्णाति विषयान्नित्यमिन्द्रियात्मा
क्षराक्षरः ।
यस्तस्मै ज्ञानमूलाय नताः स्म
हरिमेधसे ॥ ३४ ॥
जे क्षर आणि अक्षर इन्द्रियरूपाने
नित्य विषयांचे ग्रहण करतात त्या ज्ञानमूल हरिला नमस्कार .
गृहीतानिन्द्रियैरर्थानात्मने यः
प्रयच्छति ।
अन्तःकरणभूताय
तस्मै विश्वात्मने नमः ॥ ३५ ॥
इन्द्रियां द्वारा ग्रहण केलेल्या
विषयांना जो आत्म्याच्या सम्मुख उपस्थित करतो त्या अंत:करणरूप विश्वात्म्याला
नमस्कार .
यस्मिन्ननन्ते
सकलं विश्वं यस्मात्तथोद्गतम् ।
लयस्थानं
च यस्तस्मै नमः प्रकृतिधर्मिणे ॥ ३६ ॥
ज्या अनंतात सकल विश्व स्थित आहे, ज्यापासून ते उत्पन्न झाले
आहे आणि जे त्याच्या लयाचेही स्थान आहे त्या प्रकृतिस्वरूप परमात्म्याला नमस्कार .
शुद्धः सँल्लक्ष्यते भ्रान्त्या
गुणवानिव योऽगुणः ।
तमात्मरूपिणं देवं नताः स्म
पुरुषोत्तमम् ॥ ३७ ॥
जे शुद्ध आणि निर्गुण असूनही भ्रमवश
गुणयुक्त दिसतात .
अविकारमजं शुद्धं निर्गुणं
यन्निरञ्जनम् ।
नताः स्म तत्परं ब्रह्म
विष्णोर्यत्परमं पदम् ॥ ३८ ॥
जे अविकारी, अजन्मा, शुद्ध, निर्गुण, निर्मल आणि
श्रीविष्णुचे परमपद आहेत त्या ब्रह्मस्वरूपाला आम्ही नमस्कार करतो .
अदीर्घह्रस्वमस्थूलमनण्वश्यामलोहितम्
।
अस्नेहच्छायमतनुमसक्तमसमीरणम् ॥ ३९ ॥
अनाकाशमसंस्पर्शमगन्धमरसं च यत् ।
अचक्षुःश्रोत्रमचलमवाक्पाणिममानसम्
॥ ४० ॥
अनामगोत्रमसुखमतेजस्कमहेतुकम् ।
अभयं भ्रान्तिरहितमनिद्रमजरामरम् ॥
४१ ॥
अरजोऽशब्दममृतमप्लुतं यदसंवृतम् ।
पूर्वापरे न वै यस्मिंस्तद्विष्णोः
परमं पदम् ॥ ४२ ॥
जो लांब नाही, बारीक नाही, जाडा नाही, छोटा नाही, काळा नाही कि
लालही नाही, जो
स्नेह (द्रव), कान्ति
व शरीररहित आणि अनासक्त अशरीरी (जीवापासून भिन्न) आहे. जो अवकाश
स्पर्श, गंध व
रस रहित तसेच डोळे व कान विहीन, अचल आणि जिव्हा, हात व मनरहित आहे . जो नाम, गोत्र, सुख आणि तेजाने
शून्य तथा कारणहीन आहे, ज्याच्यात
भय, भ्रान्ति, निद्रा, जरा आणि मरण –
ह्या अवस्थांचा अभाव आहे
. जो अरज (रजोगुणरहित), अशब्द, अमृत, अप्लुत (गतिशुन्य) आणि असंवृत (अनाच्छादित) आहे
तसेच ज्याच्यात पुर्वापर व्यवहाराची गति नाही तेच भगवान विष्णुंचे परमपद आहे .
परमेशत्वगुणवत्सर्वभूतमसंश्रयम् ।
नताः स्म तत् पदं
विष्णोर्जिह्वादृग्गोचरं न यत् ॥ ४३ ॥
ज्याचे ईशन (शासन) हाच परमगुण आहे, जो सर्वरूप आणि
अनाधार आहे तथा जिव्हा व दृष्टिचा अविषय आहे, भगवान विष्णुंच्या त्या परमपदाला आम्ही नमस्कार
करतो .
पराशर उवाच
एवं प्रचेतसो विष्णुं
स्तुवन्तस्तत्समाधयः ।
दश वर्षसहस्राणि तपश्चेरुर्महार्णवे
॥ ४४ ॥
श्रीपराशर म्हणाले – अशाप्रकारे
भगवान श्रीविष्णुमध्ये समाधिस्त होऊन प्रचेतांनी महासागरात राहून त्यांची स्तुति
करत दहा हजार वर्षे तपस्या केली .
ततः प्रसन्नो भगवांस्तेषामन्तर्जले
हरिः ।
ददौ दर्शनमुन्निद्रनीलोत्पलदलच्छविः
॥ ४५ ॥
तेव्हा भगवान श्रीहरि ने प्रसन्न
होऊन त्यांना पूर्ण उमललेल्या नीलकमळासारख्या आभायुक्त दिव्य छविने जलातच दर्शन
दिले .
पतत्रिराजमारूढमवलोक्य प्रचेतसः ।
प्रणिपेतुः शिरोभिस्तं
भक्तिभारावनामितैः ॥ ४६ ॥
प्रचेतांनी पक्षिराज गरुडावर
चढ़लेल्या श्रीहरिला पाहून त्यांना भक्तिभावाच्या ओझ्याने वाकलेल्या मस्तकांनी
प्रणाम केला .
ततस्तानाह भगवान् व्रियतामीप्सितो
वरः ।
प्रसादसुमुखोऽहं वो वरदः समुपस्थितः
॥ ४७ ॥
तेव्हा भगवंताने त्यांना म्हटले – “मी तुमच्यावर
प्रसन्न होऊन तुम्हाला वर देण्यासाठी आलो आहे, तुम्ही आपला अभीष्ट वर मागा” .
ततस्तमूचुर्वरदं प्रणिपत्य प्रचेतसः
।
यथा पित्रा समादिष्टं प्रजानां
वृद्धिकारणम् ॥ ४८ ॥
तेव्हा प्रचेतांनी वरदायक श्रीहरिला
प्रणाम करून, ज्याप्रकारे
त्यांच्या पित्याने त्यांना प्रजा-वृद्धिसाठी आज्ञा दिली होती ते सर्व सांगितले .
स चापि देवस्तं दत्त्वा यथाभिलषितं
वरम् ।
अन्तर्धानं
जगामाशु ते च निश्चक्रमुर्जलात् ॥ ४९ ॥
त्यानंतर, भगवंत त्यांना अभीष्ट वर दोऊन अन्तर्धान झाले आणि
ते जलातून बाहेर आले .
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे चतुर्दशोऽध्याय"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा