शनिवार, २३ मे, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, अष्टादश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 18

  विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः ॥ अष्टादशोऽध्यायः ॥


 

 "मायामोह आणि असुरांचा संवाद तसेच राजा शतधनुची कथा"

श्रीपराशर उवाच
 तपस्यभिरतान्सोऽथ मायामोहो महासुरान् ।
 मैत्रेय ददृशे गत्वा नर्मदातीरसंश्रितान् ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– हे मैत्रेया ! त्यानन्तर मायामोहाने जाऊन पाहिले की असुरगण नर्मदेच्या तटावर तपस्या करत होते || ||

 


 ततो दिगम्बरो मुण्डो बर्हिपिच्छधरो द्विज ।
 मायामोहोऽसुरान् श्लक्ष्णमिदं वचनमब्रवीत् ॥ २ ॥

तेव्हा त्या मयूरपंखधारी दिगम्बर आणि मुण्डितकेश मायामोहाने असुरांना अति मधुर वाणीत असे म्हटले || ||


 मायामोह उवाच
 हे दैत्यपतयो ब्रूत यदर्थ तप्यते तपः ।
 ऐहिकं वार्थ पारत्र्यं तपसः फलमिच्छथ ॥ ३ ॥

मायामोह म्हणाला;– हे दैत्यपतिगण ! मला सांगा, तुम्ही कोणत्या उद्देशाने तपस्या करत आहाता, तुम्हाला लौकिक फळाची इच्छा आहे की पारलौकिक ? || ||

 


 असुरा ऊचुः
 पारत्र्यफललाभाय तपश्चर्या महामते ।
 अस्माभिरियमारब्धा किं वा तेऽत्र विवक्षितम् ॥ ४ ॥
असुरगण म्हणाले ;– हे महामते ! आम्ही पारलौकिक फळाच्या कामनेने तपस्या आरम्भ केली आहे . ह्या विषयी तुला आमच्याशी काय बोलायचे आहे ? || ||



 मायामोह उवाच
 कुरुध्वं मम वाक्यानि यदि मुक्तिमभीप्सथ ।
 अर्हध्वमेतं धर्मं च मुक्तिद्वारमसंवृतम् ॥ ५ ॥

मायामोह म्हणाला ;– जर तुम्हाला मुक्तिची इच्छा आहे तर जसं मी सांगतो तसं करा . तुम्ही मुक्तिच्या उघड्या दरवाजावर ह्या धर्माचा आदर करा || ||

 

 


 धर्मो विमुक्तेरर्होयं नैतस्मादपरो वरः ।
 अत्रैव संस्थिताः स्वर्गं विमुक्तिं वा गमिष्यथ ॥ ६ ॥
 अर्हध्वं धर्ममेतं च सर्वे यूयं महाबलाः ॥ ७ ॥

हा धर्म मुक्तिसाठी परमोपयोगी आहे . ह्याहून श्रेष्ठ अन्य कोणताच धर्म नाही . ह्याचे अनुष्ठान केल्याने तुम्ही स्वर्ग अथवा मुक्ति ज्याची कामना कराल ते प्राप्त होईल . तुम्ही सगळे महाबलवान आहात, म्हणून ह्या धर्माचा आदर करा || ६ – ७ ||



 श्रीपराशर उवाच
 एवम्प्रकारैर्बहुभिर्युक्तिदर्शनचर्चितैः ।
 मायामोहेन ते दैत्या वेदमार्गादपाकृताः ॥ ८ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– अशाप्रकारे नाना प्रकारच्या युक्तिंनी आणि अतिरंजित वाक्यांनी मायामोहाने दैत्यगणांना वैदिक मार्गापासून भ्रष्ट केले || ||

 


 धर्मायैतदधर्माय सदेतन्न सदित्यपि ।
 विमुक्तये त्विदं नैतद्विमुक्तिं सम्प्रयच्छति ॥ ९ ॥
 परमार्थोऽयमत्यर्थं परमार्थो न चाप्ययम् ।
 कार्यमेतदकार्यं च नैतदेवं स्फुटं त्विदम् ॥ १० ॥
 दिग्वाससामयं धर्मो धर्मोऽयं बहुवाससाम् ॥ ११ ॥
 इत्यनेकान्तवादं च मायामोहेन नैकधा ।
 तेन दर्शयता दैत्याःस्वधर्मं त्याजिता द्विज ॥ १२ ॥

हे धर्मयुक्त आहे व हे धर्मविरुद्ध, हे सत आहे आणि हे असत, हे मुक्तिकारक आहे आणि ह्यामुळे मुक्ति मिळत नाही, हा आत्यन्तिक परमार्थ आहे व हा परमार्थ नाही आणि हे स्पष्टपणे असेच आहे, हा दिगम्बरांचा धर्म आहे आणि हा साम्बरांचा धर्म आहे – हे द्विजा ! असे अनेक प्रकारचे असंख्य वाद दाखवून मायामोहाने दैत्यांना स्वधर्मापासून च्युत केले || ९ – १२ ||

 

 

अर्हतैतं महाधर्मं मायामोहेन ते यतः ।
प्रोक्तास्तमाश्रिता धर्ममर्हतास्तेन तेऽभवन् ॥ १३ ॥

मायामोहाने दैत्यांना सांगितले होते की तुम्ही ह्या महाधर्माचा ‘अर्हत’ अर्थात आदर करा . म्हणून त्या धर्माचे अवलम्बन केल्याने ते ‘आर्हत’ म्हणून विख्यात झाले || १३ ||



 त्रयीधर्मसमुत्सर्गं मायामोहेन तेऽसुराः ।
 कारीतास्तन्मया ह्यासंस्ततोन्ये तत्प्रचोदिताः ॥ १४ ॥

मायामोहाने असुरगणांना त्रयीधर्मापासून विमुक्त केले व ते मोहग्रस्त झाले; त्यानंतर त्यांनी अन्य दैत्यांनाही ह्याच धर्मात प्रवृत्त केले || १४ ||

 


 तैरप्यन्ये परे तैश्च तैरप्यन्ये परे च तैः ।
 अल्पैरहोभिः सन्त्यक्ता तैर्दैत्यैः प्रायशस्त्रयी ॥ १५ ॥

त्यांनी दुसर्‍या दैत्यांना, दुसर्‍यांनी तिसर्‍याला, तिसर्‍यांनी चौथ्यांना व त्यांनी इतरांना ह्याच धर्मात प्रवृत्त केले . अशाप्रकारे थोड्याच दिवसात दैत्यगणांनी वेदत्रयीचा त्याग केला || १५ ||



 पुनश्च रक्ताम्बरधृङ्‍ मायामोहो जितेन्द्रियः ।
 अन्यानाहासुरान् गत्वा मृद्‍वल्पमधुराक्षरम् ॥ १६ ॥

त्यानन्तर जितेन्द्रिय मायामोहाने रक्तवस्त्र धारण करून अन्यान्य असुरांजवळ जाऊन त्यांच्याशी मृदु, अल्प व मधुर शब्दात म्हटले || १६ ||

 


 स्वर्गार्थं यदि वो वाञ्छा निर्वाणार्थमथासुराः ।
 तदलं पशुघातादिदुष्टधर्मैर्निबोधत ॥ १७ ॥

हे असुरगणांनो ! जर तुम्हाला स्वर्ग अथवा मोक्षाची इच्छा आहे तर पशुहिंसा आदि दुष्टकर्मांचा त्याग करून बोध प्राप्त करा || १७ ||




 विज्ञानमयमेवैतदशेषमवगच्छत ।
 बुध्यध्वं मे वचः सम्यग्बुधैरेवमिहोदितम् ॥ १८ ॥
 जगदेतदनाधारं भ्रान्तिज्ञानार्थतत्परम् ।
 रागादिदुष्टमत्यर्थं भ्राम्यते भवसंकटे ॥ १९ ॥

हे सम्पूर्ण जगत विज्ञानमाय आहे – असे जाणा . माझ्या बोलण्यावर पूर्ण लक्ष द्या . ह्या संसार संकटात जीव अत्यंत भटकता राहतो || १८-१९ ||

 

 

एवं बुध्यत बुध्यध्वं बुध्यतैवमितीरयन् ।
 मायामोहः स दैतेयान्धर्ममत्याञ्जयन्निजम् ॥ २० ॥

अशाप्रकारे ‘बुध्यत (जाणा), बुध्यर्ध्व (समजा), आदि शब्दांनी बुद्धधर्माचा निर्देश करून मायामोहाने दैत्यांना त्यांचा निजधर्म सोडायला लावला || २० ||

 

 

नानाप्रकारवचनं स तेषां युक्तियोजितम् ।
तथा तथा त्रयीधर्मं तत्यजुस्ते यथा यथा ॥ २१ ॥

मायामोहाने अशी अनेक प्रकारची युक्तियुक्त वाक्य सांगितली ज्यामुळे दैत्यगणांनी त्रयीधर्माचा त्याग केला || २१ ||

 

 

 तेऽप्यन्येषां तथैवोचुरन्यैरन्ये तथोदिता ।
 मैत्रेय तत्यजुर्धर्मं वेदेस्मृत्युदितं परम् ॥ २२ ॥

त्या दैत्यगणांनी अन्य दैत्यांना व त्यांनी इतरांना अशीच वाक्य सांगितली . हे मैत्रेया ! अशाप्रकारे त्यांनी श्रुतिस्मृतिविहित आपल्या परम धर्माचा त्याग केला || २२ ||

 


 अन्यानप्यन्यपाषण्डप्रकारैर्बहुहिर्द्विज ।
 दैतेयान्मोहयामास मायामोहोदिमोहकृत् ॥ २३ ॥

हे द्विजा ! मोह्कारी मायामोहाने इतरही अनेकानेक दैत्यांना अशाच प्रकारे  मोहित केले || २३ ||

 

 

 स्वल्पेनैव हि कालेन मायामोहेन तेऽसुराः ।
 मोहितास्तत्यजुःसर्वां त्रयीमार्गाश्रितां कथाम् ॥ २४ ॥

थोड्याच काळाने मायामोह द्वारा मोहित होऊन असुरगणाने वैदिक धर्माविषयी बोलणे सुद्धा सोडून दिले || २४ ||

 


केचिद्विनिन्दां वेदानां देवानामपरे द्विज ।
यज्ञकर्मकलापस्य तथान्ते च द्विजन्मनाम् ॥ २५ ॥

हे द्विजा ! त्यांच्यापैकी कोणी वेदांची की, कोणी देवतांची, कोणी याज्ञिक कर्म – कलापांची तसेच कोणी ब्राह्मणांची निंदा करू लागले || २५ ||

 

 

 नैनद्युक्तिसहं वाक्यं हिंसा धर्माय चेष्यते ।
 हवींष्यनलदग्धानि फलायेत्यर्भकोदितम् ॥ २६ ॥

हिंसेतही धर्म असतो – ही गोष्ट अजिबात युक्तिसंगत नाही . अग्नित हवि जाळल्याने फळ मिळेल - हे तर अबोध बालकाने सांगितल्यासारखं वाटतं || २६ ||

 


 यज्ञैरनेकैर्देवत्वमवाप्येन्द्रेण भुज्यते ।
 शम्यादि यदि चेत्काष्ठं तद्वरं पत्रभुक्पशु ॥ २७ ॥

अनेक यज्ञां द्वारा देवत्वाचा लाभ मिळाल्यावरही इंद्राला जर शमी आदि काष्ठाचे भोजन करावे लागत असेल तर त्यापेक्षा पालापाचोळा खाणारा पशुच जास्त चांगला || २७ ||

 

 

निहतस्य पशोर्जज्ञे स्वर्गप्राप्तिर्यदीष्यते ।
 स्वपिता यजमानेन किन्नु तस्मान्न हन्यते ॥ २८ ॥

जर यज्ञात बळी दिलेल्या पशुला स्वर्गप्राप्ति होते तर मग यजमान आपल्या पित्यालाच का नाही मारून टाकत ? || २८ ||

 

 

तृप्तये जायते पुंसो भुक्तमन्येन चेत्ततः ।
कुर्याच्छ्राद्धं श्रमायान्नं न वहेयुः प्रवासिनः ॥ २९ ॥

जर कोणा अन्य पुरुषाने भोजन केल्यामुळे दुसरा कोणी पुरुष तृप्त होतो तर विदेशी यात्रेत खाद्यपदार्थ घेऊन जायचे परिश्रम घेण्याची काय आवश्यकता आहे; पुत्रगण घरातच श्राद्ध करू देत || २९ ||

 

 

 जनश्रद्धेयमित्येतदवगम्य ततोऽत्र वः ।
 उपेक्षा श्रेयसे वाक्यं रोचतां यन्मयेरितम् ॥ ३० ॥

म्हणून हे समजून की ‘हे (श्राद्धादि कर्मकांड) लोकांची अंध-श्रद्धाच आहे’ त्याच्या प्रति उपेक्षा करायला हवी आणि आपल्या श्रेय साधनासाठी जे काही मी सांगितले ते आवडीने करावे || ३० ||

 


 न ह्यप्तवादा नभसो निपतन्ति महासुराः ।
 युक्तिमद्वचनं ग्राह्यं मयान्यैश्च भवद्विधैः ॥ ३१ ॥

हे असुरगणांनो ! श्रुति आदि आप्तवाक्य आकाशातून पडत नाहीत . आम्ही, तुम्ही आणि अन्य सर्वांनीच युक्तियुक्त वाक्यांचे ग्रहण करायला हवे || ३१ ||




 श्रीपराशर उवाच
 मयामोहेन ते दैत्याः प्रकारैर्बहुभिस्तथा ।
 वृथापिता यथा नैषां त्रयी कश्चिदरोचयत् ॥ ३२ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– अशाप्रकारे अनेक युक्त्या वापरून मायामोहाने दैत्यांना विचलित केले ज्यामुळे त्याच्यातील कोणालाही वेदत्रयीत रूचि उरली नाही || ३२ ||

 


 इत्थमुन्मार्गयातेषु तेषु दैत्येषु तेऽमराः ।
 उद्योगं परमं कृत्वा युद्धाय समुपस्थिताः ॥ ३३ ॥

अशाप्रकारे दैत्य विपरीत मार्गात प्रवृत्त झाल्यावर भरपूर तयारी करून देवगण त्यांच्याशी युद्ध करायला गेले || ३३ ||



 ततो दैवासुरं युद्धं पुनरेवाभवद् द्विज ।
 हताश्च तेऽसुरा दैवैः सन्मार्गपरिपन्थिनः ॥ ३४ ॥
 हे द्विजा ! तेव्हा देवता आणि असुरांमध्ये पुन्हा युद्ध छेडले गेले . त्यात सन्मार्गविरोधी दैत्यगण देवतांद्वारा मारले गेले || ३४ ||

 


 स्वधर्मकवचं तेषामभूद्यत्प्रथमं द्विज ।
 तेन रक्षाभवत्पूर्वं नेशुर्नष्टे च तत्र ते ॥ ३५ ॥

हे द्विजा ! आधी दैत्यांजवळ जे स्वधर्मरूपी कवच होते त्यामुळे त्यांचे त्यांची रक्षा झाली होती . ह्यावेळी ते नष्ट झाल्याने ते दैत्य सुद्धा नष्ट झाले || ३५ ||

 


 ततो मैत्रेय तन्मार्गवर्तिनो येऽभवञ्जनाः ।
 नग्नास्ते तैर्यतस्त्यक्तं त्रयीसंवरणं तथा ॥ ३६ ॥

हे मैत्रेया ! तेव्हापासून जे लोक मायामोह द्वारा प्रवर्तित मार्गाचे अवलम्बन करू लागले ते ‘नग्न’ म्हणवले गेले कारण त्यांनी वेदत्रयीरूप वस्त्राचा त्याग केला होता ||३६ ||




 ब्रह्मचारीगृहस्थश्च वानप्रस्थस्तथाश्रमी ।
 परिव्राड् वा चतुर्थोऽत्र पञ्चमो नोपपद्यते ॥ ३७ ॥

ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी – हे चारच आश्रमी आहेत . ह्यांच्या व्यतिरिक्त पाचवा आश्रमी आणखी कोणीही नाही || ३७ ||

 


 वस्तु सन्त्यज्य गार्हस्थ्यं वानप्रस्थो न जायते ।
 परिव्राट् चापि मैत्रेय स नग्नः पापकृन्नरः ॥ ३८ ॥

हे मैत्रेया ! जो पुरुष गृहस्थाश्रमाचा त्याग केल्यानंतर वानप्रस्थ किंवा संन्यासी होत नाही तो पापी सुद्धा नग्नच आहे || ३८ ||




 नित्यानां कर्मणां विप्र यस्य हानिरहर्निशम् ।
 अकुर्वन्विहितं कर्म शक्तः पतति तद्दिने ॥ ३९ ॥

हे विप्रा ! सामर्थ्य असूनही जो विहित कर्म करत नाही तो त्याच दिवशी पतित होतो आणि त्या एक दिवस-रात्रीतच त्याच्या सम्पूर्ण नित्यकर्मांचा क्षय होतो || ३९ ||

 

 

प्रायश्चित्तेन महता शुद्धिमाप्नोत्यनापदि ।
पक्षं नित्यक्रियाहानेः कर्ता मैत्रेय मानवः ॥ ४० ॥

हे मैत्रेया ! आपत्तिकाळ सोडून इतर वेळी एका पक्षापर्यंत नित्यकर्माचा त्याग करणारा पुरुष महान प्रायश्चित्तानेच शुद्ध होऊ शकतो || ४० ||

 


 संवत्सरं क्रियाहानिर्यस्य पुंसोऽभिजायते ।
 तस्यावलोकनात्सूर्यो निरीक्ष्यःसाधुभिः सदा ॥ ४१ ॥

जो पुरुष एक वर्ष नित्य-क्रिया करत नाही त्याच्यावर दृष्टि पडल्यास साधू पुरुषाला सदा सूर्याचे दर्शन करणे गरजेचे आहे || ४१ ||

 


 स्पृष्टे स्नानं सचैलस्य शुद्धेर्हेतुर्महामते ।
 पुंसो भवति तस्योक्ता न शुद्धिः पापकर्मणः ॥ ४२ ॥

हे महामते ! अशा पुरुषाचा स्पर्श झाला तर वस्रसहित स्नान केल्याने शुद्धि होऊ शकते व त्या पापात्म्याची शुद्धि मात्र कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही || ४२ ||




 देवर्षिपितृभूतानि यस्य निःश्वस्य वेश्मनि ।
 प्रयान्त्यनर्चितान्यत्र लोके तस्मान्न पापकृत् ॥ ४३ ॥

ज्या मनुष्याच्या घरून देवगण, ऋषिगण, पितृगण व भूतगण पूजित न झाल्याने नि:श्वास सोडत अन्यत्र जातात जगात त्याच्याहून मोठा पापी कोणी नाही || ४३ ||

 


 सम्भाषणानुप्रश्नादि सहास्यां चैव कुर्वतः ।
 जायते तुल्यता तस्य तेनैव द्विज वत्सरात् ॥ ४४ ॥

हे द्विजा ! अशा पुरुषासोबत एक वर्ष सम्भाषण, कुशलप्रश्न आणि उठबस केलेला मनुष्य त्याच्याच समान पापात्मा होतो || ४४ ||

 


 देवादिनिःश्वासहतं शरीरं यस्य वेश्म च ।
 न तेन संकरं कुर्याद्‍ गृहासनपरिच्छदैः ॥ ४५ ॥

ज्याचे शरीर अथवा गृह देवता आदिंच्या नि:श्वासाने निहत आहे त्याच्या सोबत आपले गृह, आसन किंवा वस्त्र आदि वापरू नये || ४५ ||

 


 अथ भुक्तं गृहे तस्य करोत्यास्यां तथासने ।
 शेते चाप्येकशयने स सद्यस्तत्समो भवेत् ॥ ४६ ॥

जो पुरुष अशा माणसाच्या घरी भोजन करतो, त्याचे आसन ग्रहण करतो किंवा त्याच्या बरोबर एकाच शय्येवर शयन करतो तो लवकरच त्याच्याच समान होतो || ४६ ||

 


 देवतापितृभूतानि तथानभ्यर्च्य योऽतिथीन् ।
 भुक्ते स पातकं भुङ्‍क्ते निष्कृतिस्तस्य नेष्यते ॥ ४७ ॥

 

जो मनुष्य देवता, पितर, भूतगण आणि अतिथिंचे पूजन केल्या शिवाय स्वयं भोजन करतो तो पापमय भोजन करतो; त्याला शुभगति मिळत नाही || ४७ ||




 ब्राह्मणाद्यास्तु ये वर्णाःस्वधर्मादन्यतोमुखाः ।
 यान्ति ते नग्नसंज्ञां तु हीनकर्मस्ववस्थिताः ॥ ४८ ॥

जे ब्राह्मणादि वर्ण स्वधर्माला सोडून परधर्मात प्रवृत्त होतात अथवा हीनवृत्तिचे अवलम्बन करतात त्यांना ‘नग्न’ म्हणतात ||४८ ||

 


 चतुर्णां यत्र वर्णानां मैत्रेयात्यन्तसंकरः ।
 तत्रास्या साधुवृत्तिनामुपघाताय जायते ॥ ४९ ॥

हे मैत्रेया ! ज्या ठिकाणी चारही वर्णांचे अत्यंत मिश्रण झालेले आहे तशा ठिकाणी राहिल्याने पुरुषाच्या साधूवृत्तिंचा क्षय होतो || ४९ ||

 


 अनभ्यर्च्य ऋषीन्देवान्पितृभूतातिथींस्तथा ।
 यो भुङ्‍क्ते तस्य सँल्लापात्पतन्तिनरके नराः ॥ ५० ॥

जो पुरुष ऋषि, देव, पितृ, भूत आणि अतिथिगणांचे पूजन केल्याशिवाय भोजन करतो त्याच्याशी सम्भाषण केल्याने सुद्धा लोक नरकात पडतात || ५० ||

 


 तस्मादेतान्नरो नग्नांस्त्रयीसन्त्यागदूषितान् ।
 सर्वदा वर्जयेत्प्राज्ञ आलापस्पर्शनादिषु ॥ ५१ ॥

अत: वेदत्रयीच्या त्यागामुळे दूषित झालेल्या ह्या नग्नांसोबत प्राज्ञपुरुष सर्वदा सम्भाषण व स्पर्श आदिचा सुद्धा त्याग करतात || ५१ ||

 


 श्रद्धावद्‌‍भिः कृतं यत्‍नाद्‍देवान्पितृपितामहान् ।
 न प्रीणयति तच्छ्राद्धं यद्येभिरवलोकितम् ॥ ५२ ॥

जर त्यांची दृष्टि पडली तर श्रद्धावान पुरुषांनी यत्नपूर्वक केलेल्या श्राद्धाने देवता अथवा पितृपितामहगणांची तृप्ति होत नाही || ५२ ||




 श्रूयते च पुरा ख्यातो राजा शतधनुर्भुवि ।
 पत्‍नी च शैव्या तस्याभूदतिधर्मपरायणा ॥ ५३ ॥

"राजा शतधनुची कथा" - असे ऐकीवात आहे की, पूर्वकाळी पृथ्वीतलावर शतधनु नावाचा एक विख्यात राजा होता . त्याची पत्नी शैव्या अत्यंत धर्मपरायणा होती || ५३ ||

 


 पतिव्रता महाभागा सत्यशौचदयान्विता ।
 सर्वलक्षणसम्पन्ना विनयेन यनेन च ॥ ५४ ॥

ती महाभाग पतिव्रता, सत्य, शौच व दयेने युक्त तसेच विनय आणि निति आदि सम्पूर्ण सुलक्षणांनी सम्पन्न होती || ५४ ||

 

 

स तु राजा तया सार्धं देवदेवं जनार्दनम् ।
आराधयामास विभुं परमेण समाधिना ॥ ५५ ॥

त्या महाराणी सोबत राजा शतधनुने परम-समाधिद्वारा सर्वव्यापक, देवदेव श्रीजनार्दनाची आराधना केली ||५५ ||

 


 होमैर् जपैस्तथा दानैरुपवासैश्च भक्तितः ।
 पुजाभिश्चानुदिवसं तन्मना नान्यमानसः ॥ ५६ ॥

ते प्रतिदिन तन्मय होऊन अनन्यभावाने होम, जप, दान, उपवास आणि पूजन आदिद्वारा भगवंताची भक्तिपूर्वक आराधना करू लागले ||५६ ||

 


 एकदा तु समं स्नातौ तौ तु भार्यापती जले ।
 भागीरथ्याःसमुत्तीर्णौ कार्त्तिक्यां समुपोषितौ ।
 पाषण्डिनमपश्येतामायान्तं संमुखं द्विज ॥ ५७ ॥

हे द्विजा ! एके दिवशी कार्तिकी पौर्णिमेला उपवास करून त्या दोघा पति-पत्निने गंगा नदीत एकत्र स्नान केल्यानंतर बाहेर आले तेव्हा एका पाखंडीला आपल्या समोर पाहीलं || ५७ ||

 


 चापाचार्यस्य तस्यासौ सखा राज्ञो महात्मनः ।
 अतस्तद्‍गौरवात्तेन सखाभावमथाकरोत् ॥ ५८ ॥

हा ब्राह्मण त्या महात्मा राजाच्या धनुर्वेदाचार्याचा मित्र होता; म्हणून आचार्याचा गौरव करण्याच्या कारणाने राजाने सुद्धा त्याच्याशी मित्रासारखा व्यवहार केला || ५८ ||

 


 न तु सा वाग्यता देवी तस्य पत्‍नी पतिव्रता ।
 उपोषितास्मीति रविं तस्मिन्दृष्टे ददर्श च ॥ ५९ ॥

पण त्याच्या पतिव्रता पत्नीने त्याचा जराही आदर केला नाही; माझा उपवास आहे असा विचार करून मौन पाळून तिने सूर्याचे दर्शन केले || ५९ ||

 


 समागम्य यथान्यायं दम्पती तौ यथाविधि ।
 विष्णोः पूजादिकं सर्वं कृतंवतौ द्विजोत्तम ॥ ६० ॥

हे द्विजोत्तना ! नंतर त्या दोघ् स्त्री-पुरुषांनी यथारीति येऊन भगवान विष्णुची पूजा आदि सर्व कर्म विधिपूर्वक केले || ६० ||

 



 कालेन गच्छता राजा ममारासौ सपत्‍नजित् ।
 अन्वारुरोह तं देवी चितास्थं भूपतिं पतिम् ॥ ६१ ॥
कालान्तराने तो शत्रुजित राजा मृत्यु पावला . तेव्हा, देवी शैव्याने सुद्धा चितारुढ होऊन महाराजाचे अनुगमन केले || ६१ ||




 स तु तेनापचारेण श्वा जज्ञे वसुधाधिपः ।
 उपोषितेन पाषण्डसँल्लापो यत्कृतोऽभवत् ॥ ६२ ॥

राजा शतधनुने उपवास-अवस्थेत पाखण्डी सोबत वार्तालाप केला होता . त्या पापामुळे त्या राजाने कुत्र्याचा जन्म घेतला || ६२ ||

 


 सा तु जातिस्मरा जज्ञे काशीराजसुता शुभा ।
 सर्वविज्ञानसम्पूर्णा सर्वलक्षणपूजिता ॥ ६३ ॥

आणि ती शुभलक्षणा काशीनरेशाची कन्या झाली, जी सर्व प्रकारच्या विज्ञानाने युक्त, सर्वलक्षण सम्पन्ना आणि जातिस्मरा (पूर्वजन्माचे वृतांत जाणणारी)होती || ६३ ||

 


 तां पिता दातुकामोऽभूद्‌वराय विनिवारितः ।
 तयैव तन्व्या विरतो विवाहारम्भतो नृपः ॥ ६४ ॥

राजाच्या मनात तिला कोणा एका वराला द्यायचे होते, पण त्या सुन्दरीने थांबविल्याने राजा तिच्या विवाहादि पासून उपरत झाला || ६४ ||




 ततःसा दिव्यया दृष्ट्या दृष्ट्‍वा श्वानं निजं पतिम् ।
 विदिशाख्यं पुरं गत्वा तदवस्थं ददर्श तम् ॥ ६५ ॥

तेव्हा तिला दिव्य दृष्टिने आपला पति श्वान झाल्याचे कळले आणि विदिशा नामक नगरात जाऊन तिथे तिने त्याला कुत्र्याच्या अवस्थेत पाहिले || ६५ ||

 

तं दृष्ट्‌वैव महाभागं श्वभूतं तु पतिं तदा ।
ददौ तस्मै वराहारं सत्कारप्रवणं शुभा ॥ ६६ ॥

आपल्या महाभाग पतिला श्वानरूपात पाहून त्या सुन्दरीने सत्कारपूर्वक त्याला अति उत्तम भोजन करवले || ६६ ||

 


 भुञ्जन्दत्तं तया सोऽन्नमतिमृष्टमभीप्सितम् ।
 स्वजाति ललितं कुर्वन्बहु चाटु चकार वै ॥ ६७ ॥

तिने दिलेले अति मधुर आणि इच्छित अन्न खाऊन तो आपल्या जातिला अनुकूल नाना प्रकारे चाटुता प्रदर्शित करू लागला || ६७ ||

 


 अतीव व्रीडिता बला कुर्वता चाटु तेन सा ।
 प्रणामपूर्वमाहेदं दयितं तं कुयोनिजम् ॥ ६८ ॥

त्याच्या चाटुता करण्याने अत्यंत संकुचित होऊन त्या बालिकेने कुत्सित योनित उत्पन्न झालेल्या त्या आपल्या प्रियतमाला प्रणाम करून म्हणले || ६८ ||

 


 स्मर्यतां तन्महाराज दाक्षिण्यललितं त्वया ।
 येन श्वयोनिमापन्नो मम चाटुकरो भवान् ॥ ६९ ॥

महाराज ! आपण आपल्या त्या उदारतेचे स्मरण करा ज्यामुळे आज आपणाला श्वान-योनि प्राप्त होऊन माझी चाटुता करत आहात || ६९ ||

 

 

पाषण्डिनं समाभाष्य तीर्थस्नानादनन्तरम् ।
प्राप्तोसि कुत्सितां योनिं किन्न स्मरसि तत्प्रभो ॥ ७० ॥

हे प्रभो!  तीर्थस्नानानंतर त्या पाखण्डी सह वार्तालाप केल्यामुळेच आपल्याला ही कुत्सित योनि मिळाली आहे ह्याचे आपल्याला स्मरण नाही का?” || ७० ||



 श्रीपराशर उवाच
 तयैवं स्मारीति तस्मिन्पूर्वजातिकृते तदा ।
 दध्यौ चिरमथावाप निर्वेदमतिदुर्लभम् ॥ ७१ ॥
श्रीपराशरजी म्हणाले ;– काशिराज सुताद्वारा अशा प्रकारे आठवण करून दिल्यावर त्याने बराचवेळ आपल्या पूर्वजन्माचे चिन्तन केले . तेव्हा त्याला अति दुर्लभ निर्वेद प्राप्त झाला || ७१ ||

 



 निर्विण्णचित्तः स ततो निर्गम्य नगराद्‌बहिः ।
 मरुत्प्रपतनं कृत्वा सार्गाली योनिमागतः ॥ ७२ ॥

त्याने अति उदास चित्ताने नगरातून बाहेर येऊन प्राणांचा त्याग केला आणि मग शृगाल योनित जन्म घेतला || ७२ ||

 


 सापि द्वितीये सम्प्राप्ते वीक्ष्य दिव्येन चक्षुषा ।
 ज्ञात्वा शृगालं तं द्रष्टुं ययौ कोलाहलं गिरिम् ॥ ७३ ॥

तेव्हा काशिराज कन्येने दिव्य दृष्टिने त्याला दुसर्‍या जन्मात शृगाल झालेले पाहून त्याला भेटायला कोलाहल पर्वतावर गेली || ७३ ||

 

 

 तत्रापि दृष्ट्‍वा तं प्राह शार्गालीं योनिमागतम् ।
 भर्तारमपि चार्वङ्‍गी तनया पृथिवीक्षितः ॥ ७४ ॥

तिथे सुद्धा आपल्या पतिला शृगालयोनित उत्पन्न झालेले पाहून ती सुन्दरी राजकन्या त्याला म्हणाली || ७४ ||

 

 

 अपि स्मरसि राजेन्द्र श्वयोनिस्थस्य यन्मया ।
 प्रोक्तं ते पूर्वचरितं पाषण्डालापसंश्रयम् ॥ ७५ ॥

हे राजेन्द्रा ! श्वानयोनित जन्म घेतल्याने मी पाखण्डी सोबतचा वार्तालाप विषयक आपला पूर्वजन्माचा वृतांत सांगितलेला आपल्याला आठवतो का ?” || ७५ ||

 


 पुनस्तयोक्तं स ज्ञात्वा सत्यं सत्यवतां वरः ।
 कानने स निराहारस्तत्याज स्वं कलेवरम् ॥ ७६ ॥

तेव्हा सत्यनिष्ठांमध्ये श्रेष्ठ राजा शतधनुने तीने असे म्हटल्यावर सर्व सत्य वृतांत जाणून निराहार राहून वनात आपल्या शरीराचा त्याग केला || ७६ ||



 भूयस्ततो वृको जज्ञे गत्वा तं निर्जने वने ।
 स्मारयामास भर्तारं पूर्ववृत्तमनिन्दिता ॥ ७७ ॥

मग तो एक लांडगा झाला; तेव्हासुद्धा त्या अनिंदिता राजकन्येने निर्जन वनात जाऊन आपल्या पतिला त्याच्या पूर्वजन्मीच्या वृतांताचे स्मरण करवले || ७७ ||

 


 न त्वं वृको महाभाग राजा शतधनुर्भवान् ।
 श्वा भूत्वा त्वं सृगालोऽभूर्वृकत्वं साम्प्रतं गतः ॥ ७८ ॥

हे महाभागा ! तुम्ही लांडगा नाही, राजा शतधनु आहात . तुम्ही आपल्या पूर्वजन्मात क्रमश: कुकुर और शृगाल व आता लांडगा म्हणून जन्मले आहात” || ७८ ||

 

 

 स्मारितेन यथा व्यक्तस्तेनात्मा गृध्रतां गतः ।
 अपापा सा पुनश्चैनं बोधयामास भामिनी ॥ ७९ ॥

अशा प्रकारे तिने स्मरण करविल्या नंतर राजाने जेव्हा लांडग्याचे शरीर त्यागले तेव्हा गृध योनित त्याने जन्म घेतला . तेव्हाही त्याच्या निष्पाप भार्येने त्याला परत समजावले || ७९ ||

 


 नरेद्र स्मर्यतामात्मा ह्यलं ते गृध्रचेष्टया ।
 पाषण्डालापजातोऽयं दोषो यद्‍गृध्रतां गतः ॥ ८० ॥

हे नरेन्द्रा ! तुम्ही आपले स्वरूप आठवा; ह्या गृध-चेष्टा सोडा . पाखण्डी सोबत वार्तालाप केल्याच्या दोषामुळेच तुम्ही गृध झाला आहात ” || ८० ||



 ततः काकत्वमापन्नं समनन्तरजन्मनि ।
 उवाच तन्वी भर्तारमुपलभ्यात्मयोगतः ॥ ८१ ॥
नंतर दुसर्‍या जन्मात काकयोनि प्राप्त झाल्यावरही योगबलाने आपल्या पतिला भेटून ती सुन्दरी म्हणाली || ८१ ||

 


 अशेषभूभृतः पूर्वं वश्या यस्मै बलिं ददुः ।
 स त्वं काकत्वमापन्नो जातोद्य बलिभुक् प्रभो ॥ ८२ ॥

हे प्रभो ! ज्यांना वशीभूत होऊन सम्पूर्ण सामंतगण नाना प्रकारच्या वस्तु भेंट करायचे तेच आपण आज काकयोनि प्राप्त होऊन बलिभोजी झाला आहात ” || ८२ ||

 


 एवमेव बकत्वेपि स्मारितस्य पुरातनम् ।
 तत् त्याज भूपतिः प्राणान्मयूरत्वमवाप च ॥ ८३ ॥

काकयोनितही पूर्वजन्माचे स्मरण करवून दिल्याने राजाने प्राणत्याग केला व मयूरयोनित जन्म घेतला || ८३ ||



 मयूरत्वे ततः सा वै चकारानुगतिं शुभा ।
 दत्तैः प्रतिक्षणं भोज्यैर्बाला तज्जातिभोजनैः ॥ ८४ ॥

मयूरावस्थेतही काशिराजकन्या त्याला क्षणोक्षणी अति सुंदर मयुरोचित आहार देत त्याच्यासोबतच राहात असे || ८४ ||

 


ततस्तु जनको राजा वाजिमेधं महाक्रतुम् ।
चकार तस्यावभृथे स्नापयामास तं तदा ॥ ८५ ॥

त्यावेळी राजा जनकाने अश्वमेध नामक महायज्ञाचे अनुष्ठान केले; त्या यज्ञात अवभृथ स्नानाच्या वेळी त्या मयूराला स्नान करविले || ८५ ||

 


 सस्नौ स्वयं च तन्वङ्‍गी स्मारयामास चापि तम् ।
 यथासौ श्वसृगालादियोनिं जग्राह पार्थिवः ॥ ८६ ॥

तेव्हा त्या सुन्दरीने स्वतः सुद्धा स्नान करून राजाला स्मरण करविले की कशा प्रकारे त्याने श्वान, शृगाल आदि योनी ग्रहण केल्या होत्या || ८६ ||

 


 स्मृतजन्मक्रमःसोऽथ तत्त्याज स्वकलेवरम् ।
 जज्ञे स जनकस्यैव पुत्रोऽसौ सुमहात्मनः ॥ ८७ ॥

आपल्या जन्म परम्परेचे स्मरण झाल्यावर राजाने आपल्या शरीराचा त्याग केला आणि महात्मा जनकाकडेच पुत्ररूपात जन्म घेतला || ८७ ||

 


 ततः सा पितरं तन्वी विवाहार्थमचोदयत् ।
 स चापि कारयामास तस्या राजा स्वयंवरम् ॥ ८८ ॥

तेव्हा त्या सुन्दरीने आपल्या पित्याला विवाहासाठी प्रेरित केले . तिच्या प्रेरणेने  राजाने तिचे स्वयंवर आयोजित केले || ८८ ||

 


 स्वयंवरे कृते सा तं सम्प्राप्तं पतिमात्मनः ।
 वरयामास भूयोऽपि भर्तृभावेन भामिनी ॥ ८९ ॥

स्वयंवरात त्या राजकन्येने स्वयंवरात आलेल्या आपल्या त्याच पतिला परत पतिभावाने वरले || ८९ ||

 


 बुभुजे च तया सार्धं सम्भोगान्नृपनन्दनः ।
 पितर्युपरते राज्यं विदेहेषु चकार सः ॥ ९० ॥

त्या राजकुमाराने काशिराजाच्या कन्येसोबत नाना प्रकारच्या भोगांचा उपभोग घेतला व पिता परलोकवासी झाल्यावर विदेहनगरीवर राज्य केले || ९० ||

 


 इयाज जज्ञान्सुबहून्ददौ दानानि चार्थिनाम् ।
 पुत्रानुत्पादयामास युयुधे च सहारिभिः ॥ ९१ ॥

त्याने अनेक यज्ञ केले, याचकांना नाना प्रकारची दाने दिली, अनेक पुत्र उत्पन्न केले आणि शत्रुंसोबत अनेक युद्ध केली || ९१ ||

 


 राज्यं भुक्त्वा यथान्यायं पालयित्वा वसुन्धराम् ।
 तत्त्याज स प्रियान्प्राणान्सङ्‍ग्रामे धर्मतो नृपः ॥ ९२ ॥

अशाप्रकारे त्या राजाने पृथ्वीचे न्यायानुकुल पालन करत राज्यभोग घेतला व शेवटी आपले प्रिय प्राण धर्मयुद्धात त्यागले || ९२ ||

 

 

ततश्चितास्थं तं भूयो भर्तारं सा शुभेक्षणा ।
अन्वारुरोह विधिवद्यथापूर्वं मुदान्विता ॥ ९३ ॥

तेव्हा त्या सुलोचनेने आधी सारखेच परत आपल्या चितारुढ पतिचे विधिपूर्वक प्रसन्न-मनाने अनुगमन केले || ९३ ||

 


 ततोऽवाप तया सार्धं राजपुत्र्या स पार्थिवः ।
 ऐन्द्रानतीत्य वै लोकाँल्लोकान्प्राप तदाक्षयान् ॥ ९४ ॥

ह्यामुळे त्या राजाला त्या राजकन्येसह इन्द्रलोका पेक्षाही उत्कृष्ट अक्षय लोक प्राप्त झाला || ९४ ||


 स्वर्गाक्षयत्वमतुलं दाम्पत्यमतिदुर्लभम् ।
 प्राप्तं पुण्यफलं प्राप्य संशुद्धिं तां द्विजोत्तम ॥ ९५ ॥

हे द्विजश्रेष्ठा ! अशाप्रकारे शुद्ध झाल्याने त्याने अतुलनीय अक्षय स्वर्ग, अति दुर्लभ दाम्पत्य आणि आपल्या पुर्वार्चित सम्पूर्ण पुण्याचे फल प्राप्त केले || ९५ ||




 एष पाषण्डसम्भाषाद्दोषः प्रोक्तो मया द्विज ।
 तथाऽश्वमेधावभृथस्नानमाहात्म्यमेव च ॥ ९६ ॥

हे द्विजा ! अशाप्रकारे मी तुला पाखण्डी सोबत सम्भाषण करण्याचा दोष आणि अश्वमेध-यज्ञात स्नान करण्याचे माहात्म्य ह्याचे वर्णन केले || ९६ ||

 

 

तस्मात्पाषण्डिभिः पापैरालापस्पर्शनं त्यजेत् ।
विशेषतः क्रियाकाले यज्ञादौ चापि दीक्षितः ॥ ९७ ॥

म्हणूनच पाखण्डी व पापी लोकांशी कधी वार्तालाप व स्पर्श करू नये; विशेषत: नित्य-नैमित्तिक कर्मांच्या वेळी आणि ज्याने यज्ञादि क्रियांची दीक्षा घेतली आहे त्याने तर अशांचा संसर्ग त्यागणे अत्यावश्यक आहे || ९७ ||

 


 क्रियाहानिर्गृहे यस्य मासमेकं प्रजायते ।
 तस्यावलोकनात्सूर्यं पश्येत मतिमान्नरः ॥ ९८ ॥

ज्याच्या घरी एक महिन्यापर्यंत नित्यकर्मांचे अनुष्ठान झालेले नसेल त्याला पाहीले तर बुद्धिमान मनुष्याने सूर्याचे दर्शन करावे || ९८ ||

 


 किं पुनर्यैस्तु सन्त्यक्ता त्रयी सर्वात्मना द्विज ।
 पाषण्डभोजिभिः पापैर्वेदवादविरोधिभिः ॥ ९९ ॥

ज्यांनी वेदत्रयीचा सर्वथा त्याग केला आहे तसेच जे पाखण्डींचे अन्न खातात व वैदिक मताचा विरोध करतात त्या पापात्मांचे दर्शन केल्यावर काय बोलावे ? || ९९ ||

 


 सहालापस्तु संसर्गः सहास्या चातिपापिनी ।
 पाषण्डिभिर्दुराचारैस्तस्मात्तां परिवर्जयेत् ॥ १०० ॥

ह्या दुराचारी पाखण्डींसोबत वार्तालाप करणे, सम्पर्क ठेवणे व उठबस करणे महान पाप आहे; म्हणून ह्या सर्व गोष्टींचा त्याग करावा || १०० ||



 पाषण्डिनो विकर्मस्थान्वैडालव्रतिकाञ्छठान् ।
 हैतुकान्बकवृत्तींश्च वाङ्‍मात्रेणापि नार्चयेत् ॥ १०१ ॥

पाखण्डी, विकर्मी, विडाल-व्रतवाले [अर्थात लपुन छपुन पाप करणे वैडाल नामक व्रत आहे. असं करणार्‍याला ‘विडाल-व्रतवाला’ म्हणतात], दुष्ट, स्वार्थी आणि ढोंगी लोकांचा वाचेनेही आदर करू नये || १०१ ||

 

 

 द्वरतस्तैस्तु सम्पर्कस्त्याज्यश्चाप्यतिपापिभिः ।
 पाषण्डिभिर् दुराचारैस्तस्मात्तान्परिवर्जयेत् ॥ १०२ ॥

ह्या पाखण्डी, दुराचारी व अति पापींचा संसर्ग दुरूनच त्यागण्या योग्य आहे . म्हणून त्यांचा सर्वदा त्याग करावा || १०२ ||



 एते नग्नास्तवाख्याता दृष्टा श्राद्धोपघातकाः ।
 येषां सम्भाषणात्पुंसां दिनपुण्यं प्रणश्यति ॥ १०३ ॥

अशाप्रकारे मी तुला नग्नांची व्याख्या सांगितली, ज्यांच्या केवळ दर्शनानेही श्राद्ध नष्ट होते व ज्यांच्या सोबत सम्भाषण केल्याने मनुष्याचे एक दिवसाचे पुण्य क्षीण होते || १०३ ||

 


 एते पाषण्डिनः पापा न ह्येतानालपेद्‍ बुधः ।
 पुण्यं नश्यति सम्भाषादेतेषां तद्दिनोद्‍भवम् ॥ १०४ ॥

हे पाखण्डी अतिशय पापी असतात, बुद्धिमान पुरुषाने ह्यांच्याशी कधीच सम्भाषण करू नये || १०४ ||

 


 पुंसां जटाधरणमैण्ड्यवतां वृथैव मोघाशिनामखिलशौचनिराकृतानाम् ।
 तोयप्रदानपितृपिण्डबहिष्कृतानां सम्भाषणादपि नरा नरकं प्रयान्ति ॥ १०५ ॥

जो बिना कारण जटा धारण करतो अथवा मूँडन करतो, देवता, अतिथि आदिंना भोजन करविल्या शिवाय स्वयं भोजन करतो, सर्वप्रकारे शौचहीन असतो तसेच जल-दान, पितृ-पिण्ड आदि देखील ज्याने बहिष्कृत केले आहे, त्यांच्याशी वार्तालाप केल्यानेसुद्धा लोग नरकात जातात || १०५ ||



         

"इति श्रीविष्णुपुराणे तृतीये अंशे अष्टोदशोऽध्यायः" (१८)

    इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीयांऽशः समाप्तः ।



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...