बुधवार, ४ मार्च, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, षष्ठ अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 6

 ॥ विष्णुपुराणम् ॥

॥ द्वितीयः अंशः॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥

 

"भिन्न – भिन्न नरक तसेच भगवन्नामाच्या माहात्म्याचे वर्णन"


पराशर उवाच
ततश्च नरका विप्र भुवोऽधः सलिलस्य च ।
पापिनो येषु पात्यन्ते ताञ्छृणुष्व महामुने ॥ १ ॥
रौरवः सूकरो रोधस्तालो विशसनस्तथा ।
महाज्वालस्तप्तकुम्भो लवणोऽथ विलोहितः ॥ २ ॥
रूधिराम्भो वैतरणिः कृमिशः कृमिभोजनः ।
असिपत्रवनं कृष्णो लालाभक्षश्च दारुणः ॥ ३ ॥
तथा पूयवहः पापो वह्निज्वालो ह्यधः शिराः

सन्दंशः कालसूत्रश्च तमश्चावीचिरेव च ॥ ४ ॥
श्वभोजनोऽथाप्रतिष्ठश्चाप्रचिश्च तथा परः ।
इत्येवमादयश्चान्ये नरका भृशदारूणाः ॥ ५ ॥
यमस्य विषये घोराः शस्त्राग्निभयदायिनः ।
पतन्ति येषु पुरुषाः पापकर्मरतास्तु ये ॥ ६ ॥

पराशर म्हणाले ;– हे विप्रा ! त्यानन्तर पृथ्वी आणि जलाच्या खाली नरक आहे ज्यात पापी लोकांना टाकले जाते. हे महामुने ! त्यांचे वर्णन ऐकरौरव, सूकर, रोध, ताल, विशसन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवण, विलोहित, रुधिराम्भ, वैतरणि, कृमांश, कृमिभोजन, असिपत्रवन, कृष्ण, लालाभक्ष, दारुण, पुयवह, पाप, वह्रिज्वाल, अध्:शिरा, सदंश, कालसूत्र, तमस, आवीचि, श्वभोजन, अप्रतिष्ठ आणि अप्रचि – हे सर्व तसेच ह्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक महाभयंकर नरक आहेत, जे यमराजाच्या शासनाधीन आहेत आणि अति दारुण शस्त्र-भय तथा अग्नि-भय देणारे आहेत आणि त्यांच्यात जे पुरुष पापरत होतात तेच पडतात .

 

 

 
कूटसाक्षी तथासम्यक्पक्षपातेन यो वदेत् ।
यश्चान्यदनृतं वक्ति स नरो याति रौरवम् ॥ ७ ॥

जो पुरुष कूटसाक्षी (खरे माहित असूनही खोटी ग्वाही देणारा) असतो किंवा जो पक्षपाती होतो व खरे बोलत नाही आणि जो मिथ्या भाषण करतो तो रौरव नावाच्या नरकात जातो .

 

 


भ्रूणहा पुरहन्ता च गौघ्नश्च मुनिसत्तम ।
यान्ति ते नरकं रोधं यश्चोच्छ्वासनिरोधकः ॥ ८ ॥

हे मुनिसत्तमा ! भ्रूण (गर्भ) नष्ट करणारे ग्रामनाशक आणि गो-हत्यारे लोक रोध नामक नरकात जातात जो श्वासोच्छवास रोखणारा आहे .

 



सुरापो ब्रह्महा हर्ता सुवर्णस्य च सूकरे ।
प्रयान्ति नरके यश्च तैः संसर्गमुपैति वै ॥ ९ ॥

मद्य-पान करणारे, ब्रह्मघाती, सुवर्ण चोरणारे तसेच जो पुरुष अशांची संगत करतो ते सर्व सूकरनरकात जातात .

 


राजन्यवैश्यहा ताले तथैव गुरुतल्पगः ।
तप्तकुण्डे स्वसृगामी हन्ति राजभटांश्च यः ॥ १० ॥

क्षत्रिय किंवा वैश्याचा वध करणारा तालनरकात तसेच गुरुस्त्री सोबत गमन करणारा, भगिनीगामी आणि राजदूतांना मारणारा पुरुष तप्तकुंडनरकात पड़तो .



 साध्वीविक्रयकृद्‍बन्धपालः केसरिविक्रयी ।
 तप्तलोहे पतन्त्येते यश्च च भक्तं परित्यजेत् ॥ ११ ॥

सती स्त्रीचा विक्रय करणारा, कारागृहरक्षक, अश्वविक्रेता आणि भक्तपुरुषाचा त्याग करणारा हे सगळे लोक तप्तलोहनरकात जातात .



 स्नुषां सुतां चापि गत्वा महाज्वाले निपात्यते ।
 अवमन्ता गुरूणां यो यश्चाक्रोष्टा नराधमः ॥ १२ ॥
 वेददूषयितायश्च वेदविक्रयिकश्च यः ।
 अगम्यगामी यश्च स्यात्ते यान्ति लवणं द्विज ॥ १३ ॥

पुत्रवधु आणि पुत्री सोबत विषयसंबंध करणार्‍या पुरुषाला महाज्वाल नरकात टाकतात, तसेच जो नराधम गुरुजनांचा अपमान करणारा आणि त्यांना दुर्वचने बोलणारा असतो तसेच जो वेदांची निंदा किंवा विक्रय करतो, किंवा जो अगम्या स्त्रीसोबत सम्भोग करतो, हे द्विजा ! ते सर्व लवणनरकात जातात .



 चोरो विलोहे पतति मर्यादादूषकस्तथा ॥ १४ ॥

चोर तसेच मर्यादेचे उल्लंघन करणारा पुरुष विलोहित नरकात पडतो .




देवद्विजपितृद्वेष्टा रत्‍नद्वषयिता च यः ।
स याति कृमिभक्षे वै कृमिशे च दुरिष्टकृत् ॥ १५ ॥

देव, द्विज आणि पितृगणांचा द्वेष करणारा तसेच रत्न दूषित करणारा कृमिभक्ष नरकात आणि अनिष्ट यज्ञ करणारा कृमिश नरकात जातो .

 


पितृदेवातिथींस्त्यक्त्वा पर्यश्नाति नराधमः ।
लालाभक्षे स यात्ययुग्रे शरकर्ता च वेधके ॥ १६ ॥

जो नराधम पितृगण, देवगण आणि अतिथिंना सोडून त्यांच्या आधी भोजन करतो तो अति उग्र लालाभक्ष नरकात पडतो, आणि बाण बनवणारा वेधकनरकात जातो .

 

 

करोति कर्णनो यश्च यश्च खङ्‍गादिकृन्नरः ।
प्रयान्त्येते विशसने नरके भृशदारुणे ॥ १७ ॥
जो मनुष्य कर्णी नामक बाण बनवतो आणि जो खड्गादी शस्त्र बनवतो तो अति दारुण विशसन नरकात जातो .


 असत्प्रतिगृहीता तु नरके यात्यधोमुखे ।
 अयाज्ययाजकश्चैव तथा नक्षत्रसूचकः ॥ १८ ॥

असत् – प्रतिग्रह (चुकिच्या मार्गे धन-संग्रह) करणारा, अयाज्य-याजक आणि नक्षत्रोपजीवी (नक्षत्र-विद्या येत असल्याचे ढोंग करणारा) पुरुष अधोमुख नरकात जातो.




 वेगी पूयवहे चैको याति मिष्टान्नभुङ्‍गरः ॥ १९ ॥
 लाक्षामांसरसानां च तिलानां लवणस्य च ।
 विक्रेता ब्रह्मणो याति तमेव नरकं द्विज ॥ २० ॥

निष्ठुर कर्म करणारा पुयवह नरकात जातो, तसेच पुत्र मित्रांशिवाय एकट्यानेच स्वादु भोजन करणारा आणि लाख, मांस, रस, तिळ तसेच लवण आदि विकणारा ब्राह्मणही त्याच पुयवह नरकात जातो .




मार्जारकुक्कुटच्छागश्ववराहविहङ्‍गमान् ।
पोषयन्नरकं याति तमेव द्विजसत्तम ॥ २१ ॥

हे द्विजश्रेष्ठा ! बिलाव, कुक्कुट, छाग, अश्व, शूकर तसेच पक्ष्यांचे पालन करणारा पुरुषही त्याच नरकात जातो .

 


रङ्‍गोपजीवी कैवर्तः कुण्डाशी गरदस्तथा ।
 सूची माहिषकश्चैव पर्वकारी च यो द्विजः ॥ २२ ॥
 अगारदाही मित्रघ्नः शाकुनिर्ग्रामयाजकः ।
 रुधिरान्धे पतन्त्येते सोमं विक्रीणते च ये ॥ २३ ॥

नट किंवा मल्लवृत्तिने राहणारा, धीवराचे कर्म करणारा, कुंढाचे (उपपति पासून उत्पन्न सन्तान) अन्न खाणारा, विष देणारा, चुगलीखोर, स्त्रीच्या किंवा असत्वृत्तिच्या आश्रयाने राहणारा, धन आदिच्या लोभाने पर्व नसताना अमावास्या आदि पर्वदिनांचे कार्य करणारा द्विज, घरात आग लावणारा, मित्राची हत्या करणारा, शकुन आदि सांगणारा, ग्रामपुरोहित तसेच सोम (मदिरा) विक्रय करणारा – हे सगळे रुधिरान्ध नरकात जातात .


 मखहा ग्रामहन्ता च याति वैतरणीं नरः ॥ २४ ॥
 रेतः पातादिकर्तारो मर्यादाभेदिनो हि ये ।
 ते कृष्णे यान्त्यशौचाश्च कुहकाजीविनश्च ये ॥ २५ ॥

यज्ञ अथवा ग्राम नष्ट करणारा पुरुष वैतरणी नरकात जातो, तसेच जे लोक वीर्यपातादि करणारे, शेताचा बांध तोडणारे, अपवित्र आणि छलवृत्तिचा आश्रय घेऊन राहणारे कृष्ण नरकात जातात .


असिपत्रवनं याति वनच्छेदी वृथैव यः ।
औरभ्रिको मृगव्याधो वह्निज्वाले पतन्ति वै ॥ २६ ॥
यान्त्येते द्विज तत्रैव ये चापाकेषु वह्निदाः ॥ २७ ॥

जो कारणाशिवाय वने नष्ट करतो तो असिपत्रवन नरकात जातो . मेषोपजीवी आणि व्याधगण वह्रीज्वाल नरकात जातात, तसेच हे द्विजा ! जो कच्चा घडा किंवा वीट भाजण्यासाठी त्यात अग्नि घालतात, ते सुद्धा वह्रीज्वाल नरकातच जातात .


 व्रतानां लोपको यश्च स्वाश्रमाद्विच्युतश्च यः ।
 सन्दंशयातनामध्ये पततस्तावुभावपि ॥ २८ ॥

व्रतांचा लोप करणारे तसेच आपल्या आश्रमाचा त्याग करणारे, दोन्ही प्रकारचे पुरुष संदेश नामक नरकात जातात .

 


दिवा स्वप्ने च स्कन्दन्ते ये नरा ब्रह्मचारिणः ।
 पुत्रैरध्यापिता ये च ते पतन्ति श्वभोजने ॥ २९ ॥

ज्या ब्रह्मचार्‍यांचा दिवसा किंवा रात्री झोपेत [विषयी विचारांमुळे] वीर्यपात होतो, किंवा जे आपल्याच पुत्रांकडून शिकतात ते श्वभोजन नरकात जातात .



 एते चान्ये च नरकाः शतशोथ सहस्रशः ।
 येषु दुष्कृतकर्माणः पच्यन्ते यातनागताः ॥ ३० ॥

अशा प्रकारे, हे असे व अन्य शेकड़ो हजारों नरक आहेत, जिथे दुष्कर्मी लोक नाना प्रकारच्या यातना भोगतात .

 


यथैव पापान्येतानि तथान्यानि सहस्रशः ।
 भुज्यन्ते तानि पुरुषैर्नरकान्तरगोचरैः ॥ ३१ ॥

वर उल्लेख केलेल्या पापांसारखीच आणखी सहस्र पाप-कर्म आहेत, ज्यांचे फळ मनुष्य भिन्न-भिन्न नरकात भोगतात .

 


 वर्णाश्रमविरुद्धं च कर्म कुर्वन्ति ये नराः ।
 कर्मणा मनसा वाचा निरयेषु पतन्ति ते ॥ ३२ ॥

जे लोक आपल्या वर्णाश्रम धर्मा विरुद्ध मन, वचन अथवा कर्माने आचरण करतात ते नरकात जातात .

 


 अधः शिरोभिदृश्यन्ते नारकैर्दिवि देवताः ।
 देवाश्चाधोमुखान्सर्वानधः पश्यन्ति नारकान् ॥ ३३ ॥

अधोमुख नरक निवासींना स्वर्गलोकात असलेले देवगण दिसतात आणि देवता गणांना खालील लोकात नारकी जीव दिसतात .

 


 स्थावराः क्रिमयोऽब्जाश्च पक्षिणः पशवो नराः ।
 धार्मिकास्त्रिदशास्तद्वन्मोक्षिणश्च यथाक्रमम् ॥ ३४ ॥

पापी लोग नरक भोगल्यावर क्रमाने स्थावर, कृमि, जलचर, पक्षी, पशु, मनुष्य, धार्मिक पुरुष, देवगण तथा मुमुक्षु होऊन जन्म ग्रहण करतात .

 


 सहस्रभागप्रथमा द्वितीयानुक्रमास्तथा ।
 सर्वे ह्येते महाभागा यावन्मुक्तिसमाश्रयाः ॥ ३५ ॥

हे महाभागा ! मुमुक्षुपर्यन्त ह्या सर्वांमध्ये दुसर्‍या पेक्षा पहिले प्राणी सहस्त्रगुण अधिक आहेत .

 


यावन्तो जन्तवः स्वर्गे तावन्तो नरकौकसः ।
 पापकृद्याति नरकं प्रायाश्चित्तपराङ्‍मुखः ॥ ३६ ॥

जितके जीव स्वर्गात आहेत तितकेच नरकात आहेत, जे पापी पुरुष प्रायश्चित करत नाहीत तेच नरकात जातात .



पापानामनुरूपाणि प्रायश्चित्तानि यद्यथा ।
 तथा तथैव संस्मृत्य प्रोक्तानि परमर्षिभिः ॥ ३७ ॥

भिन्न-भिन्न पापांना अनुरूप जी जी प्रायश्चिते आहेत त्यांनाच महर्षिंनी वेदार्थांचे स्मरण करून सांगितले आहे .

 


 पापे गुरूणि गुरुणि स्वल्पान्यल्पे च तद्विदः ।
 प्रायश्चित्तानि मैत्रेय जगुः स्वायम्भुवादयः ॥ ३८ ॥

हे मैत्रेया ! स्वायम्भुव मनु आदि स्मृतिकारांनी महान पापांसाठी महान आणि लहान पापांसाठी अल्प प्रायश्चित्तांची व्यवस्था केली आहे .

 

 

प्रायश्चित्तान्यशेषाणि तपःकर्मत्मकानि वै ।
 यानि तेषामशेषाणां कृष्णानुस्मरणं परम् ॥ ३९ ॥

पण जी काही तपस्यात्मक आणि कर्मात्मक प्रायश्चित्त आहेत त्या सर्वात श्रीकृष्ण स्मरण सर्वश्रेष्ठ आहे .



कृते पापेऽनुतापो वै यस्य पुंसः प्रजायते ।
 प्रायश्चित्तं तु तस्यैकं हरिसंस्मरणं परम् ॥ ४० ॥

ज्या पुरुषाच्या मनात पापकर्मा नंतर पश्चाताप होतो त्याच्यासाठीच प्रायश्चित्त सांगितले आहे पण केवळ हरिस्मरणच एकमात्र परम प्रायश्चित आहे .

 


 प्रातर्निशि तथा सन्ध्यामध्याह्नादिषु संस्मरन् ।
 नारायणमवाप्नोति सद्यः पापक्षयन्नरः || ४१ ||

प्रात:काल, सायंकाळ, रात्री किंवा मध्यान्ह कोणत्याही वेळी श्रीनारायणाचे स्मरण केल्याने पुरुषांची समस्त पापे तात्काळ क्षीण होतात .

 


 विष्णुसंस्मरणात्क्षीणसमस्तक्लेशसञ्चयः ।
 मुक्तिं प्रयाति स्वर्गाप्तिस्तस्य विघ्नोऽनुमीयते ॥ ४२ ॥

श्रीविष्णुच्या स्मरणाने समस्त पापराशी भस्म झाल्याने पुरुष मोक्षपद प्राप्त करतो, स्वर्ग-लाभ त्याच्यासाठी विश्वरूप मानला जातो .

 


 वासुदेवे मनो यस्य जपहोमार्चनादिषु ।
 तस्यान्तरायो मैत्रेय देवेन्द्रत्वादिकं फलम् ॥ ४३ ॥

हे मैत्रेया ! ज्याचे चित्त जप, होम आणि अर्चनादि करताना निरंतर भगवान वासुदेवात गुंतलेले असते त्याच्यासाठी तर इंद्रपद आदि फळ म्हणजे विघ्नच आहे .

 


 क्व नाकपृष्ठगमनं पुनरावृत्तिलक्षणम् ।
 क्व जपो वासुदेवेति मुक्तिबीजमनुत्तमम् ॥ ४४ ॥

कुठे ती पुनर्जन्माच्या चक्रात टाकणारी स्वर्ग-प्राप्ति आणि कुठे मोक्षाचे सर्वोत्तम बीज असलेलावासुदेवनामक जप .



 तस्मादहर्निशं विष्णु संस्मरन्पुरुषो मुने ।
 न याति नरकं मर्त्यः संक्षीणाखिलपातकः ॥ ४५ ॥

म्हणून हे मुने ! श्रीविष्णुचे अहर्निश स्मरण केल्याने सम्पूर्ण पाप क्षीण झाल्याने मनुष्य परत नरकात जात नाही .

 


 मनः प्रीतिकरः स्वर्गो नरकस्तद्विपर्ययः ।
 नरकस्वर्गसंज्ञे वै पापपुण्ये द्विजोत्तम ॥ ४६ ॥

मनाला प्रिय वाटणारा स्वर्ग आहे आणि त्याच्या उलट अप्रिय वाटणारा नरक आहे .  हे द्विजोत्तमा ! पाप आणि पुण्याचे दूसरे नाव नरक आणि स्वर्ग आहे .

 


 वस्त्वेकमेव दुःखाय सुखायेर्ष्यागमाय च ।
 कोपाय च यतस्तस्माद्वस्तु वस्त्वात्मकं कुतः ॥ ४७ ॥

जेव्हा एकच वस्तु सुख आणि दुःख तसेच ईर्ष्या आणि कोपाचे कारण बनते तेव्हा त्यात वस्तुता (नियतस्वभावत्व) कुठे राहते ?

 


 तदेव प्रीतये भूत्वा पुनर्दुःखाय जायते ।
 तदेव कोपाय यतः प्रसादाय च जायते ॥ ४८ ॥

कारण एकच वस्तू कधी प्रीतिचे कारण असते तर तीच दुसर्‍या वेळी दुःखदायिनी बनते आणि तीच कधी क्रोध निर्माण करणारी तर कधी प्रसन्न करणारी होते .

 


 तस्माद्दुःखात्मकं नास्ति न च किञ्चित्सुखात्मकम् ।
 मनसः परिमामोयं सुखदुःखादिलक्षणः ॥ ४९ ॥

म्हणून कोणताही पदार्थ दुःखमय किंवा सुखमय नसतो . हे सुख-दुःख म्हणजे मनाचेच विकार आहेत .

 


 ज्ञानमेव परं ब्रह्म ज्ञानं बन्धाय चेष्यते ।
 ज्ञानत्मकमिदं विश्वं न ज्ञानाद्विद्यते परम् ॥ ५० ॥
 विद्याविद्येति मैत्रेय ज्ञानमेवोपधारय ॥ ५१ ॥

परमार्थत: ज्ञानच परब्रह्म आहे आणि त्यावर अविद्येची उपाधि असेल तर तेच बंधनाचे कारणही आहे. हे सम्पूर्ण विश्व ज्ञानमयच आहे. ज्ञानापासून भिन्न अशी दुसरी कोणतीच वस्तु नाही. हे मैत्रेया ! विद्या आणि अविद्येला सुद्धा तु ज्ञानच समझ .



 एवमेतन्मयाख्यातं भवतो मण्डलं भुवः ।
 पातालानि च सर्वाणि तथैव नरका द्विज ॥ ५२ ॥

हे द्विजा ! अशाप्रकारे मी तुला समस्त भूमंडल, सम्पूर्ण पाताळलोक आणि नरकांचे वर्णन सांगितले .



 समुद्राः पर्वताश्चैव द्वीपा वर्षाणि निम्नगाः ।
 संक्षेपात्सर्वमाख्यातं किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ ५३ ॥

समुद्र, पर्वत, द्वीप, वर्ष आणि नद्या – ह्या सर्वांची संक्षेपात व्याख्या केली .




"इति श्रीविष्णुपुराणे द्वितिये अंशे षष्ठोऽध्याय"

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, पंचम अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 5

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ द्वितीयः अंशः॥ ॥ पञ्चमोऽध्यायः ॥

 

"सात पाताळ लोकांचे वर्णन"

श्रीपराशर उवाच
विस्तार एष कथितः पृथिव्या भवतो मया ।
सप्ततिस्तु सहस्राणि द्विजोच्छ्रायोपि कथ्यते ॥ १ ॥

पराशर म्हणाले हे द्विजा ! मी तुला जो पृथ्वीचा विस्तार सांगितला त्याची ऊंची सुद्धा सत्तर सहस्त्र योजने सांगितलेली आहे.

 


 
दशसाहस्रमेकैकं पातालं मुनिसत्तम ।
 अतलं वितलं चैव नितलं च गभस्तिमत् ।
 महाख्यं सुतलं चाग्र्यं पातालं चापि सप्तमम् ॥ २ ॥

हे मुनिसत्तमा ! अतल, वितल, नितल, गभस्तिमान, महातल, सुतल आणि पाताल हे सातही लोक प्रत्येकी दहा दहा सहस्त्र योजनांच्या अंतरावर आहेत .

 


 
शुक्लाकृष्णारुणाः पीताः शर्कराः शैलकाञ्चनाः ।
 भूमयो यत्र मैत्रेय परप्रासादमण्डिताः ॥ ३ ॥

हे मैत्रेया ! सुंदर महालांनी सुशोभित असलेली तेथील भूमी शुक्ल, कृष्ण, अरुण आणि पीत वर्णाची तसेच शर्करामयी (बारीक दगडी कण असलेली), शैली (दगडाळ) सुवर्णमयी आहे .

 


 
तेषु दानवदैतेया यक्षाश्च शतशस्तथा ।
 निवसन्ति महानागजातयश्च महामुने ॥ ४ ॥

हे महामुने ! तिथे दानव, दैत्य, यक्ष आणि मोठमोठे नाग आदिंच्या शेकडो जाती निवास करतात .



 
स्वर्लोकादपि रम्याणि पातालानीति नारदः ।
 प्राह स्वर्गसदां मध्ये पातालाभ्यागतो दिवि ॥ ५ ॥

एकदा नारदाने पाताळ लोकातून स्वर्गात येऊन तेथील लोकांना सांगितले होते कीपाताळ स्वर्गाहूनही अधिक सुंदर आहे.

 


 
आह्लादकारिणः शुभ्रा मणयो यत्र सुप्रभाः ।
 नागाभरणभूषासु पातालं केन तत्समम् ॥ ६ ॥

जिथे नागगणांच्या आभूषणात सुंदर प्रभायुक्त आह्लादकारी शुभ्र मणि जडले आहेत त्या पाताळाला कोणाच्या समान म्हणावे ? .

 


 
दैत्यदानवकन्याभिरितश्चैतश्च शोभिते ।
 पाताले कस्य न प्रीतिर्विमुक्तस्यापि जायते ॥ ७ ॥

सगळीकडे दैत्य आणि दानवांच्या कन्यांनी सुशोभित पाताळ लोकात कोणत्या मुक्त पुरुषाचे प्रेम बसणार नाही .

 


 
दिवार्करश्मयो यत्र प्रभां तन्वन्ति नातपम् ।
 शशिरश्मिर्न शीताय निशि द्योताय केवलम् ॥ ८ ॥

तिथे दिवसा सूर्याची किरणे केवळ प्रकाशितच करतात, घामाघूम करत नाहीत; तसेच रात्री चन्द्रकिरणे थंडावा देत नाहीत तर, फक्त चांदणेच पसरवतात .

 

 

भक्ष्यभोज्यमहापानमुदितैरपि भोगिभिः ।
 यत्र न ज्ञायते कालो गतोपि दनुजादिभिः ॥ ९ ॥

तिथे भक्ष्य, भोज्य आणि महापानादिंच्या भोगांमुळे आनन्दित सर्प तथा दानवादिंना सरणार्‍या काळाचेही भान राहत नाही .

 


 
वनानि नद्यो रम्याणि सरांसि कमलाकराः ।
 पुंस्कोकिलाभिलापाश्च मनोज्ञान्यम्बराणि च ॥ १० ॥

तिथे सुंदर वन, नद्या, रमणीय सरोवर आणि कमळांची वने आहेत, तिथे नरकोकीळांच्या सुमधुर कूकगुंजनाने आकाश मनोहारी आहे .

 


 
भूषणान्यतिशुभ्राणि गन्धाढ्यं चानुलेपनम् ।
 वीणावेणुमृदङ्‍गानां स्वनास्तूर्याणि च द्विज ॥ ११ ॥
 एतान्यन्यानि चोदारभाग्यभोग्यानि दानवैः ।
 दैत्योरगैश्च भुज्यन्ते पातालान्तरगोचरैः ॥ १२ ॥

आणि हे द्विजा ! तिथे पाताळ निवासी दैत्य, दानव, आणि नागगणद्वारा अति स्वच्छ आभूषण, सुगंधमय अनुलेपन, वीणा, वेणु आणि मृंदगादिंचे स्वर तसेच तूर्य – हे सर्व आणि भाग्यशालिंनी भोगण्यायोग्य इतर अनेक भोग भोगले जातात .

 


 
पातालानामधश्चास्ते विष्णोर्या तामसी तनुः ।
 शेषख्या यद्‌गुणान्वक्तुं न शक्ता दैत्यदानवाः ॥ १३ ॥

पाताळांच्या खाली भगवान विष्णुचा शेष नामक जो तमोमय विग्रह आहे त्याच्या गुणांचे दैत्य अथवा दानवगण सुद्धा वर्णन करू शकत नाहीत .

 


 
योनन्तः पाठ्यते सिद्धैर्दैवो देवर्षिपूजितः ।
 स सहस्रशिरा व्यक्तस्वस्तिकामलभूषणः ॥ १४ ॥

ज्या देवर्षिपूजित देवाचा सिद्धगणअनंतम्हणून उल्लेख करतात तो अति निर्मल, स्पष्ट स्वस्तिक चिन्हांनी विभूषित तथा सहस्त्रशिर आहे .

 


 
फणामणिसहस्रेण यः स विद्योतयन्दिशः ।
 सर्वान्करोति निर्वीर्यान् हिताय जगतोऽसुरान् ॥ १५ ॥

जो अपल्या फणांच्या सहस्त्र मण्यांनी  सम्पूर्ण दिशांना देदीप्यमान करत संसाराच्या कल्याणासाठी समस्त असुरांना वीर्यहीन करत राहतो .

 


 
मदाघूर्णितनेत्रोऽसौ यः सदैवैककुण्डलः ।
 किरिटी स्रग्धरो भाति साग्निः श्वेत इवाचलः ॥ १६ ॥

मदामुळे अरुणनयन असलेला, सदैव एकच कुंडल ल्यायलेला तसेच मुकुट व माला आदि धारण केलेला जो अग्नियुक्त श्वेत पर्वता समान सुशोभित आहे .

 

 
 
नीलवासा मदोत्सिक्तः श्वेतहारोपशोभितः ।
 साभ्रगङ्‍गाप्रवाहोऽसौ कैलासाद्रिरिवापरः ॥ १७ ॥

मदाने उन्मत्त झाल्याने जो नीलाम्बर तसेच श्वेत हारांनी सुशोभित होऊन मेघमाला आणि गंगाप्रवाहाने युक्त दुसर्‍या कैलासपर्वता समान विराजमान आहे .

 

 
लाङ्‍गलासक्तहस्ताग्रो बिभ्रन्मुसलमुत्तमम् ।
 उपास्यते स्वयं कान्त्या यो वारुण्या च मूर्तया ॥ १८ ॥

ज्याने आपल्या हातात हल आणि उत्तम मूसल धारण केले आहे, तसेच ज्याची उपासना शोभा आणि वारुणी देवी स्वयं मूर्तिमती होऊन करतात .

 


 
कल्पान्ते यस्य वक्त्रेभ्यो विषानलशिखोज्ज्वलः ।
 संकर्षणात्मको रूद्रो निष्क्रम्यात्ति जगत्त्रयम् ॥ १९ ॥

कल्पांताच्या वेळी ज्याच्या मुखातून विशाग्निशिखे समान देदीप्यमान संकर्षण नामक रूद्र बाहेर येतो आणि तिनही लोकांचे भक्षण करतो .

 

 
स बिभ्रच्छेखरीभूतमशेषं क्षितिमण्डलम् ।
 आस्ते पातालमूलस्थः शेषोऽशेषसुरार्चितः ॥ २० ॥

तो समस्त देवगणांनी वन्दित असा शेषभगवान अशेष भूमंडळाला मुकुटा सारखा धारण करून पाताळ तळात विराजमान आहे .

 


 
तस्य वीर्यं प्रभावश्च स्वरूपं रूपमेव च ।
 न हि वर्णयितुं शक्यं ज्ञातुं च त्रिदशैरपि ॥ २१ ॥

त्याचे बल-वीर्य, प्रभाव, स्वरूप (तत्त्व) आणि रूप (आकार) देवतांनाही कधी कळू शकले नाही व सांगितले जाऊ शकत नाही .

 


यस्यैषा सकला पृथ्वी फणामणिशिखारूणा ।
 आस्ते कुसुममालेव कस्तद्वीर्यं वदिष्यति ॥ २२ ॥

ज्याच्या फणांमधील मण्यांच्या प्रकाशामुळे अरुण वर्ण झालेली ही समस्त पृथ्वी फुलांच्या माळेसारखी ठेवली गेलेली आहे त्याच्या बल-वीर्याचे वर्णन कोण करू शकेल ?


 
यदा विजृम्भतेऽनन्तो मदाघूर्णितलोचनः ।
 तदा चलति भूरेषा साब्धितोया सकानना ॥ २३ ॥

ज्यावेळी मदमत्तनयन शेष जांभई घेतो तेव्हा समुद्र आणि वन आदिं सहित ही सम्पूर्ण पृथ्वी चलायमान होते .

 


 
गन्धर्वाप्सरसः सिद्धाः किन्नरोरगचारणाः ।
 नान्तं गुणानां गच्छन्ति तेनानन्तोऽयमव्ययः ॥ २४ ॥

ह्याच्या गुणांचा अंत गन्धर्व, अप्सरा, सिद्ध, किन्नर, नाग आणि चारण आदि कोणालाही सापडलेला नाही, म्हणूनच ह्या अविनाशी देवालाअनंतम्हटले गेले आहे .

 


 
यस्य नागवधूहस्तैर्लेपितं हरि चन्दनम् ।
 मुहुः श्वासानिलापास्तं याति दिक्षूदवासताम् ॥ २५ ॥

ज्याचे नाग-वधुंद्वारा लेपित हरिचन्दन पुन्हा पुन्हा श्वास-वायुतून सुटून दिशांना सुगन्धित करत राहते .

 


 
यमाराध्य पूराणर्षिर्गर्गो ज्योतींषि तत्त्वतः ।
 ज्ञातवान्सकलं चैव निमित्तपठितं फलम् ॥ २६ ॥

ज्याची आराधना करून पूर्वकालीन महर्षि गर्ग ह्यांनी समस्त ज्योतिर्मंडल (ग्रहनक्षत्रादि) आणि शकुन-अपशकुन आदि नैमित्तिक फळांना तत्त्वत: जाणले होते .


 
तेनेयं नागवर्येण शिरसा विधृता मही ।
 बिभर्ति मालां लोकानां सदेवासुरमानुषाम् ॥ २७ ॥

त्या नागश्रेष्ठ शेषाने पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण केले आहे, त्याने स्वयं देखील देव, असुर आणि मनुष्यां सहित सम्पूर्ण लोकमाला धारण केलेली आहे .

 

 


 
इति श्रीविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे पञ्चमोऽध्याय (५)

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, चतुर्थ अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 4

 

॥ विष्णुपुराणम् ॥

द्वितीयः अंशः  ॥ चतुर्थोऽध्यायः ॥



प्लक्ष आणि शाल्मल आदि द्वीपांचे विशेष वर्णन

 

श्रीपराशर उवाच
क्षारोदेन यथा द्वीपो जम्बूसंज्ञोऽभिवेष्टितः ।
संवेष्ट्य क्षारमुदधिं प्लक्षद्वीपस्तथा स्थितः ॥ १ ॥

पराशर म्हणाले -

ज्या प्रकारे जम्बूद्वीप क्षारसमुद्राने घेरलेला आहे त्याच प्रकारे क्षारसमुद्राला घेरून प्लक्षद्वीप स्थित आहे .

 

 


जम्बूद्वीपस्य विस्तारः शतसाहस्रसंमितः ।
 स एवं द्विगुणो ब्रह्मन् प्लक्षद्वीप उदाहृतः ॥ २ ॥

जम्बूद्वीपाचा विस्तार एक लक्ष योजने आहे; आणि हे ब्रह्मन ! प्लक्षद्वीपाचा त्याहून दुप्पट आहे असे म्हटले जाते .

 

 


 सप्त मेधातिथेः पुत्राः प्लक्षद्वीपेश्वरस्य वै ।
 ज्येष्ठ शान्तहयो नाम शिशिरस्तदनन्तरः ॥ ३ ॥

प्लक्शद्वीपाचा स्वामी मेधातिथिला याला सात पुत्र झाले. त्यांतील सर्वात मोठा शान्तहय होता आणि त्यानंतरचा शिशिर .

 


 
सुखोदयस्तथानन्दः शिवः क्षेमक एव च ।
 ध्रुवश्च सप्तमस्तेषां प्लक्षद्वीपेश्वरा हि ते ॥ ४ ॥

त्यानन्तर क्रमशः सुखोदय, आनन्द, शिव आणि क्षेमक होते सातवा ध्रुव होता .

हे सर्व प्लक्षद्वीपाचे अधीश्वर झाले .

 


 पूर्वं शान्तहयं वर्षं शिशिरं च सुखं तथा ।
 आनन्दं च शिवं चैव क्षेमकं ध्रुवमेव च ॥ ५ ॥

(त्यांच्या आपआपल्या अधिकृत वर्षांमध्ये) प्रथम शान्तहयवर्ष आहे तसेच अन्य शिशिरवर्ष, सुखोदयवर्ष, आनन्दवर्ष, शिववर्ष, क्षेमकवर्ष आणि ध्रुववर्ष आहेत.

 


 मर्यादाकारकास्तेषां तथान्ये वर्षपर्वताः ।
 सप्तैव तेषां नामानि शृणुष्व मुनिसत्तम ॥ ६ ॥

तसेच त्या वर्षांची मर्यादा निश्चित करणारे अन्य सात पर्वत आहेत . हे मुनिश्रेष्ठा ! त्यांची नावे ऐक .

 

 


गोमदेश्चैव चन्द्रश्च नारदो दुन्दुभिस्तथा ।
सोमकः सुमनाश्चैव वैभ्राजश्चैव सप्तमः ॥ ७ ॥

गोमेद, चन्द्र, नारद, दुन्दुभि, सोमक, सुमना आणि सातवा वैभ्राज .

 

 


वर्षाचलेषु रम्येषु वर्षेष्वेतेषु चानघाः ।
वसन्ति देवगन्धर्वसहिताः सततं प्रजाः ॥ ८ ॥

ह्या अति सुरम्य वर्ष-पर्वतांवर आणि वर्षांमध्ये देवता आणि गन्धर्व सहित सदा निष्पाप प्रजा निवास करते .

 

 

 

तेषु पुण्या जनपदाश्चिराच्च म्रियते जनः ।
नाधयो व्याधयो वापि सर्वकालसुखं हि तत् ॥ ९ ॥

तेथील निवासीगण पुण्यवान असतात आणि ते चिरकाळापर्यंत जीवित राहून मृत्यु पावतात; त्यांना कोणत्याही प्रकरची अधिव्याधि होत नाही, तिथे निरन्तर सुखाचा वास असतो .

 

 


 तेषां नद्यस्तु सप्तैव वर्षाणां च समुद्रगाः ।
 नामतस्ताः प्रवक्ष्यामि श्रुताः पापं हरन्ति याः ॥ १० ॥

त्या वर्षांच्या सातच समुद्रगामिनी नद्या आहेत. त्यांची नावे मी तुला सांगतो ज्यांच्या केवळ श्रवणाने पाप दूर होतात.

 

 


 अनुतप्ता शिखी चैव विपाशा त्रिदिवाक्लमा ।
 अमृता सुकृता चैव सप्तैतास्तत्र निम्नगाः ॥ ११ ॥

तिथे अनुतत्पा, शिखी, विपाशी , त्रिदिवा, अक्लमा, अम्रुता आणि सुकृता ह्याच सात नद्या आहेत .

 

 


 एते शैलास्तथा नद्यः प्रधानाः कथितास्तव ।
 क्षुद्रशैलास्तथा नद्यस्तत्र सन्ति सहस्रशः ।
 ताः पिबन्ति सदा हृष्टा नदीर्जनपदास्तुते ॥ १२ ॥

 हे मी तुला प्रधान पर्वत आणि नद्यांचे वर्णन केले आहे; तिथे आणखीनही हजारो छोटे-छोटे पर्वत आणि नद्या आहेत . त्या देशातील हृष्ट-पृष्ट लोक सदैव त्या नद्यांचे जलपान करतात .

 

 

अपसर्पिणी न तेषां वै न चैवोत्सर्पिणी द्विज ।
न त्वेवास्ति युगावस्था तेषु स्थानेषु सप्तसु ॥ १३ ॥

हे द्विजा ! त्या लोकांमध्ये ह्रास अथवा वॄद्धि होत नाही आणि त्या सात वर्षांमध्ये युगांची कोणतीही अवस्था नाही .

 

 

 

त्रेतायुगसमः कालः सर्वदैव महामते ।
 प्लक्षद्वीपादिषु ब्रह्मञ्छाकद्वीपान्तिकेषु वै ॥ १४ ॥

हे महामते ! हे ब्रह्मन् ! प्लक्षद्वीपा पासून शाकद्वीपा पर्यन्त सहाही द्वीपांमध्ये सदैव त्रेतायुगासारखाच काळ असतो .

 


 पञ्च वर्षसहस्राणि जना जीवन्त्यनामयाः ।
 धर्मः पञ्च तथैतेषु वर्णाश्रमविभागशः ॥ १५ ॥

ह्या द्वीपातील माणसं सदा नीरोगी राहून पाच हजार वर्षांपर्यंत जगतात आणि त्यांच्यात वर्णाश्रम-विभागानुसार पाचही धर्म (अहिंसा , सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि  अपरिग्रह) वर्तमान आहेत .

 


वर्णाश्च तत्र चत्वारस्तान्निबोध वदामि ते ॥ १६ ॥

तिथे जे चार वर्ण आहेत त्याबद्दल मी तुला आता सांगतो .

 

 


आर्यकाः कुरराश्चैव विदिश्या भाविनश्च ते ।
 विप्रक्षत्रिवैश्यास्ते शूद्राश्च मुनिसत्तम ॥ १७ ॥

हे मुनिसत्तमा ! त्या द्वीपात ज्या आर्यक, कुरर, विदिश्य आणि भावी नामक जाती आहेत; तेच क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र आहेत .

 

 


जम्बूवृक्षप्रमाणस्तु तन्मध्ये सुमहांस्तरुः ।
प्लक्षस्तन्नामसंज्ञोऽयं प्लक्षद्वीपो द्विजोत्तम ॥ १८ ॥

हे द्विजोत्तमा ! त्यातच जम्बूवृक्षा इतकेच परिमाण असलेला एक प्लक्षवृक्ष आहे, ज्याच्या नावामुळेच त्या द्वीपाला प्लक्षद्वीप नाव पडले .

 


इज्यते तत्र भगवांस्तैर्वर्णैरार्यकादिभिः ।
सीमरूपि जगत्स्त्रष्टा सर्वः सर्वेश्वरो हरिः ॥ १९ ॥

तिथे आर्यक आदि वर्णांच्या द्वारे जगत्स्त्रष्टा, सर्वरूप, सर्वेश्वर भगवंत हरिचे सोमरूपाने यजन केले जाते .

 

 


प्लक्षद्वीपप्रमाणेन प्लक्षद्वीपः समावृतः ।
तथैवेक्षुरमोदेन परिवेषानुकारिणा ॥ २० ॥

प्लक्षद्वीप आपल्याच परिमाणाइतक्या वृत्ताकार इक्षुरसाच्या समुद्राने घेरलेला आहे .

 

 


इत्येवं तव मैत्रेय प्लक्षद्वीप उदाहृतः ।
संक्षेपेण मया भूयः शाल्मलं मे निशामय ॥ २१ ॥

हे मैत्रेया ! ह्या प्रकारे मी तुला संक्षेपात प्लक्षद्वीपाचे वर्णन केले, आता तू शाल्मलद्वीपाचे वर्णन ऐक .

 

 


 शाल्मलस्येश्वरो वीरो वपुष्मांस्तत्सुताञ्छृणु ।
 तेषां तु नामसंज्ञानि सप्तवर्षाणि तानि वै ॥ २२ ॥

श्वेतोऽथ हरितश्चैव जीमूतो रोहितस्तथा ।
वैद्युतो मानसश्चैव सुप्रभश्च महामुने ॥ २३ ॥

शाल्मलद्वीपाचा स्वामी वीरवर वपुष्मान होता. हे महामुने त्याच्या पुत्रांची नावे - श्वेत, हरित, जीमूत, रोहित, वैद्युत, मानस आणि सुप्रभ अशी होती. त्यांची  सात वर्ष त्यांच्याच नावानुसार होती .

 

 


शाल्मलेन समुद्रोऽसौ द्वीपेनेक्षुरसोदकः ।
विस्तारद्विगुणेनाथ सर्वतः संवृतः स्थितः ॥ २४ ॥

हा (प्लक्षद्वीपाला घेरणारा) इक्षुरसाचा समुद्र आपल्याहून दुप्पट विस्ताराच्या ह्या शाल्मलद्विपाने चारही बाजूंनी घेरलेला आहे .

 

 


तत्रापि पर्वताः सप्त विज्ञेया रत्‍नयोनयः ।
वर्षाभिव्यञ्जका ये तु तथा सप्त च निम्नगाः ॥ २५ ॥

तिथेही रत्नांचे उद्भवस्थान असे सात पर्वत आहेत जे त्या सातही वर्षांचा विभाग करतात तसेच सात नद्या आहेत .

 

 


कुमुदश्चचोन्नतश्चैव तृतीयश्च बलाहकः ।
द्रोणो यत्र महौषध्यः स चतुर्थो महीधरः ॥ २६ ॥

पर्वतांपैकी पहिला कुमुद, दुसरा उन्नत, तीसरा बलाहक तसेच चौथा द्रोणाचल आहे, ज्यावर नाना प्रकारच्या महाऔषधी आहेत .

 

 


 कङ्‍कस्तु पञ्चमः षष्ठो महिषः सप्तमस्तथा ।
 ककुद्मान्पर्वतवरः सरिन्नामानि मे शृणु ॥ २७ ॥

पाचवा कंक, सहावा महिष आणि सातवा पर्वत कुकुद्यान आहे . आता नद्यांची नावे ऐक .

 

 


 योनिस्तोया वितृष्णा च चन्द्रा मुक्ता विमोचनी ।
 निवृत्तिः सप्तमी तासां स्मृतास्ताः पापशान्तिदाः ॥ २८ ॥

त्यांची नावे योनि, तोया, वितृष्णा, चन्द्रा, मुक्ता, विमोचनी आणि निवृत्ति आहेत आणि त्यांचे केवळ स्मरण केल्याने सर्व पाप शांत करणार्‍या आहेत .

 

 


 श्वेतञ्च हरितं चैव वैद्युतं मानसं तथा ।
 जीमूतं रोहितं चैव सुप्रभं चापि शोभनम् ।
 सप्तैतानि तु वर्षाणि चातुर्वर्ण्ययुतानि वै ॥ २९ ॥

श्वेत, हरित,वैद्युत, मानस जीमूत रोहित आणि अति शोभायमान सुप्रभ ही त्याची चारही वर्णांनी युक्त सात वर्ष आहेत.

 

 


शाल्मले ये तु वर्णाश्च वसन्त्येते महामुने ।
कपिलाश्चारुणाः पीताः कृष्णाश्चैव पृथक् पृथक् ॥ ३० ॥

ब्रह्मणाः क्षत्रया वैश्याः शुद्राश्चैव यजन्ति तम् ।
भगवन्तं समस्तस्य विष्णुमात्मानमव्ययम् ।
 वायुभूतं मखश्रेष्ठैर्यज्वानो यज्ञसंस्थितिम् ॥ ३१ ॥

हे महामुने ! शाल्मलद्वीपात कपिल, अरुण, पति आणि कृष्ण हे चार वर्ण निवास करतात जे क्रमशः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत. हे यजनशील लोक सर्वांचाच आत्मा, अव्यय आणि यज्ञाचा आश्रय असलेल्या वायुरूप विष्णुभगवानाचे श्रेष्ठ यज्ञाद्वारा यजन करतात .

 

 


 देवानामत्र सान्निध्यमतीव सुमनोहरे ।
शाल्मलिः सुमहान्वृक्षो नाम्ना निर्वृतिकारकः ॥ ३२ ॥

ह्या अत्यन्त मनोहर द्वीपात देवगण सदैव विराजमान असतात . इथे शाल्मलचा एक महान वृक्ष आहे जो आपल्या नावानेच अत्यन्त शान्तिदायक आहे .

 

 

 

एष द्वीपः समुद्रेण सुरोदेन समावृतः ।
विस्ताराच्छाल्मलस्यैव समेन तु समन्ततः ॥ ३३ ॥

हा द्वीप आपल्या सारखाच विस्तार असलेल्या एका मदिरेच्या समुद्राने सर्व बाजूंनी पूर्णपणे घेरलेला आहे .

 

 

 

सुरोदकः परिवृतः कुशद्वीपेन सर्वतः ।
शाल्मलस्य तु विस्तराद् द्विगुणेन समन्ततः ॥ ३४ ॥

आणि हा सुरासमुद्र शाल्मलद्वीपा पेक्षा दुप्पट विस्तार असलेल्या कुशद्वीप द्वारा सर्व बाजूंनी घेरलेला आहे .

 

 


 ज्योतिष्मतः कुशद्वीपे सप्त पुत्राञ्छृणुष्व तान् ॥ ३५ ॥
 उद्‌भिदो वेणुमांश्चैव वेरथो लम्बनो धृतिः ।
 प्रभाकरोऽथ कपिलस्तन्नामा वर्षपद्धतिः ॥ ३६ ॥

कुशद्वीपाच्या (तेथील अधिपति) ज्योतिष्मानाला सात पुत्र होते, त्यांची नावे उद्भिद, वेणुमान, व्रैरथ, लम्बन, धृति, प्रभाकर आणि कपिल. त्यांच्याच नावानुसार तेथील वर्षांची नावे आहेत .

 

 


 तस्मिन्वसन्ति मनुजाः सह दैतेयदानवैः ।
 तथैव देवगन्धर्वयक्षकिम्पुरुषादयः ॥ ३७ ॥

तिथे दैत्य आणि दानवां सहित मनुष्य तथा देव, गन्धर्व, यक्ष, आणि किन्नर आदि निवास करतात .

 

 


 वर्णास्तत्रापि चत्वारो निजानुष्ठानतत्पराः ।
 दमिनः शुष्मिणः स्नेहा मन्देहाश्च महामुने ॥ ३८ ॥
 ब्रह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्राश्चानुक्रमोदिताः ॥ ३९ ॥

हे महामुने ! तिथे देखील आपआपल्या कर्मात तत्पर दमी, शुष्मी, स्त्रेह आणि मन्देह नामक चार वर्ण आहेत, जे क्रमशः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रच आहेत .

 

 

 

यथोक्तकर्मकर्तृत्वात्स्वाधिकारोक्षयाय ते

तत्रैव तं कुशद्वीपे ब्रह्मरूपं जनार्दनम्
 
यजन्तः क्षपयन्त्युग्रमधिकारफलप्रदम् ४०

आपल्या प्रारब्ध क्षया निमित्त शास्रानुकूल कर्म करत तिथे कुशद्वीपातच ते ब्रह्मरूप जनार्दनाच्या उपासनेद्वारा आपल्या प्रारब्ध फळ देणार्‍या अति उग्र अहंकाराचा क्षय करतात .

 

 


 विद्रुमो हेमशैलश्च द्युतिमान् पुष्पवांस्तथा ।
 कुशशयो हरिश्चैव सप्तमो मन्दराचलः ॥ ४१ ॥
 वर्षाचलास्तु सप्तैते तत्र द्वीपे महामुने ।
 नद्यश्च सप्त तासां तु शृणु नामान्यनुक्रमात् ॥ ४२ ॥

हे महामुने ! त्या द्वीपात विद्रुम, हेमशैल, द्युतिमान, पुष्पवान, कुशेशय, हरि आणि सातवा मन्दराचल, हे सात वर्ष पर्वत आहेत . तसेच तिथे सात नद्या, आहेत त्यांची क्रमशः नावे ऐक .

 

 


 धूतपापा शिवा चैव पवित्रा संमतिस्तथा ।
 विद्युदम्भा मही चान्या सर्वपापहरास्त्विमाः ॥ ४३ ॥

ती नावे धूतपापा, शिवा, पवित्रा, सम्मति, विद्युत अम्भा आणि मही अशी आहेत .

ह्या नद्या सम्पूर्ण पापांचा नाश करणार्‍या आहेत .

 

 


 अन्याः सहस्रशस्तत्र क्षुद्रनद्यस्तथाचलाः ।
 कुशद्वीपे कुशस्तम्बः संज्ञया तस्य तत्स्मृतम् ॥ ४४ ॥

तिथे आणखी हजारो छोट्या नद्या व पर्वत आहेत . कुशद्वीपात एक कुशाचे झाड़ आहे . ह्यामुळेच ह्या द्वीपाचे असे नाव पडले आहे .

 

 

 

तत्प्रमाणेन स द्वीपो घृतोदेन समावृतः ।
 घृतोदश्च समुद्रो वै क्रौञ्चद्वीपेन संवृतः ॥ ४५ ॥

हा द्वीप इपल्या एवढाच विस्तार असलेल्या तुपाच्या समुद्राने घेरलेला आहे आणि हा घृत समुद्र क्रौञ्चद्वीपाने घेरलेला आहे .

 

 


 क्रौञ्चद्वीपो महाभाग श्रुयताञ्चापरो महान् ।
 कुशद्वीपस्य विस्ताराद् द्विगुणो यस्य विस्तरः ॥ ४६ ॥

हे महाभागा ! आता ह्या क्रौञ्चनावाच्या महाद्वीपा विषयी ऐक, ज्याचा विस्तार कुशद्वीपाहून दुप्पट आहे .

 

 


 क्रौञ्चद्वीपे द्युतिमतः पुत्रास्तस्य महात्मनः ।
 तन्नामानि च वर्षाणि तेषां चक्रे महीपतिः ॥ ४७ ॥

क्रौञ्चद्वीपाच्या महात्मा द्युतिमानाचे जे पुत्र थे; त्यांच्या नावानुसार महाराज द्युतिमानाने त्यांच्या वर्षांची नावे ठेवली .

 

 

 

 कुशलो मन्दगश्चोष्णः पीवरोथान्धकारकः ।
 मुनिश्च दुन्दुभिश्चैव सप्तैते तत्सुता मुने ॥ ४८ ॥

हे मुने ! त्यांना कुशल, मन्दग, उष्ण, पीवर, अन्धकारक, मुनि आणि दुन्दुभि असे सात पुत्र होते .

 


 तत्रापि देवगन्धर्वसेविताः सुमनोहराः ।
 वर्षाचला महाबुद्धे तेषां नामानि मे शृणु ॥ ४९ ॥

तिथे देखील देवता आणि गन्धर्वांनी सेवित अति मनोहर सात वर्षपर्वत आहेत .

हे महाबुद्धे ! त्यांची नावे ऐक .

 


 क्रौञ्चश्च वामनश्चैव तृतीयश्चान्धकारकः ।
 चतुर्थो रत्‍नशैलश्च स्वाहिनी हयसन्निभः ॥ ५० ॥
 दिवावृत्पञ्चमश्चात्र तथान्यः पुण्डरीकवान् ।
 दुन्दुभिश्च महाशैलो द्विगुणास्ते परस्परम् ।
 द्वीपा द्वीपेषु ये शैला यथा द्वीपानि ते तथा ॥ ५१ ॥

त्यांच्यात पहिला क्रौञ्च, दुसरा वामन, तिसरा अन्धकारक, चौथा अश्वमुखा समान रत्नमय स्वाहिनी पर्वत, पाचवा दिवावृत्, सहावा पुण्डरेकवान् आणि सातवा महापर्वत दुन्दुभि आहे . ते द्वीप परस्पर एक दुसर्‍याच्या दुप्पट आहेत आणि त्यांच्याच सारखे त्यांचे पर्वत सुद्धा उत्तरोत्तर द्विगुण आहेत .

 

 


 वर्षेष्वेतेषु रम्येषु तथा शैलवरेषु च ।
 निवसन्ति निरातङ्‍काः सह देवगणैः प्रजाः ॥ ५२ ॥

ह्या रम्य वर्षांमध्ये आणि पर्वतश्रेष्ठांमध्ये देवगणां सहित सम्पूर्ण प्रजा निर्भय होऊन राहते .

 

 


 पुष्कराः पुष्कला धन्यास्तिष्याख्याश्च महामुने ।
 ब्रह्मणाः क्षत्रिया वैश्याः शुद्राश्चानुक्रमोदिताः ॥ ५३ ॥

हे महामुने ! तेथील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र क्रमाने पुष्कर, पुष्कल, धन्य आणि तिष्य म्हणून ओळखले जातात .

 

 


 नदीर्मैत्रेय ते तत्र याः पिबन्ति शृणुष्व ताः ।
 सप्तप्रधानाः शतशस्तत्रान्याः क्षुद्रनिम्नगाः ॥ ५४ ॥

हे मैत्रेया ! तिथे ज्यांचे जल पान केले जाते त्या नद्यांचे वर्णन ऐक . त्या द्वीपात सात प्रधान तथा अन्य शेकडो क्षुद्र नद्या आहेत .

 

 

 

गौरी कुमुद्वती चैव सन्ध्या रात्रिर्मनोजवा ।
क्षान्तिश्च पुण्डरीका च सप्तैता वर्षनिम्नगाः ॥ ५५ ॥

त्या सात वर्षनद्या गौरी, कुमुद्वती, सन्ध्या, रात्री, मनोजवा, क्षान्ति आणि पुण्डरीका आहेत .

 

 


 तत्रापि विष्णुर्भगवान्पुष्काराद्यैर्जानार्दनः ।
 यागै रुद्रस्वरूपश्च इज्यते यज्ञसन्निधौ ॥ ५६ ॥

तिथे सुद्धा रुद्ररूपी जनार्दन भगवान विष्णुची पुष्करादि वर्णां द्वारा यज्ञादि द्वारा पूजा केली जाते .

 


 क्रौञ्चद्वीपः समुद्रेण दधिमण्डोदकेन च ।
 आवृतः सर्वतः क्रौञ्चद्वीपतुल्येन मानतः ॥ ५७ ॥

हा क्रौञ्चद्वीप चारही बाजूंनी आपल्या सारखे परिमाण असलेल्या दह्याच्या समुद्राने घेरलेला आहे .

 


 दधिमण्डोदकश्चापि शाकद्वीपेन संवृतः ।
 क्रौञ्चद्वीपस्य विस्ताराद् द्विगुणेन महामुने ॥ ५८ ॥

आणि हे महामुने ! हा दधि समुद्र देखील शाकद्वीपाने घेरलेला आहे, ज्याचा विस्तार क्रौञ्चद्वीपाच्या दुप्पट आहे .

 

 

 शाकद्वीपेश्वरस्यापि भव्यस्य सुमहात्मनः ।
 सप्तैव तनयास्तेषां ददौ वर्षाणि सप्त सः ॥ ५९ ॥

शाकद्वीपाचा राजा महात्मा भव्य ह्याला सुद्धा सातच पुत्र होते . त्यांना देखील त्याने वेगवेगळी सात वर्षे दिली .

 

 

जलदश्च कुमारश्च सुकुमारो मरीचकः ।
कुसुमोदश्च मौदाकिः सप्तमश्च महाद्रुमः ॥ ६० ॥
तत्संज्ञान्येव तत्रापि सप्त वर्षाण्यनुक्रमात् ।
तत्रापि पर्वताः सप्त वर्षविच्छेदकारिणः ॥ ६१ ॥

ते सात पुत्र जलद, कुमार, सुकुमार, मरीचक्र, कुसुमोद, मौदाकि आणि महाद्रुम थे .

त्यांच्याच नामानुसार तिथे क्रमशः सात वर्ष आहेत आणि तिथेही वर्षांना विभागणारे सातच पर्वत आहेत .

 


पूर्वस्तत्रोदयगिरिर्जलाधारस्तथापरः ।
तथा रैवतकः श्यामस्तथैवास्तगिरिर्द्विज ।
आम्बिकेयस्तथा रम्यः केसरी पर्वतोत्तमः ॥ ६२ ॥

हे द्विजा ! तिथे पहिला पर्वत उदयाचल व दुसरा जलाधार आहे; तसेच रैवतक, श्याम, अस्ताचल, आम्बिकेय आणि अति सुरम्य गिरिश्रेष्ठ केसरी हे अन्य पर्वत आहेत .

 


 शाकस्तत्र महावृक्षः सिद्धगन्धर्वसेवितः ।
 यत्रत्यवातसंस्पार्शादाह्लादो जायते परः ॥ ६३ ॥

तिथे सिद्ध आणि गन्धर्वांद्वारा सेवित एक अति महान शाकवृक्ष आहे, ज्याच्या वायुला स्पर्श करण्याने हृदयात परम आह्लाद उप्तन्न होतो .

 


 तत्र पुण्या जनपदाश्चातुर्वर्ण्यसमन्विताः ।
 नद्यश्चात्र महापुण्याः सर्वपापभयापहाः ॥ ६४ ॥
 सुकुमारी कुमारी च नलिनी धेनुका च या ।
 इक्षुश्च वेणुका चैव गभस्ती सप्तमी तथा ॥ ६५ ॥

तिथे चातुर्वर्णाने युक्त अति पवित्र देश आणि समस्त पाप तथा भय दूर करणार्‍या सुकुमारी, कुमारी, नलिनी, धेनुका, इक्षु, वेणुका आणि गभस्ती ह्या सात महापवित्र नद्या आहेत .

  

अन्याश्च शतशस्तत्र क्षुद्रनद्यो महामुने ।
महीधरास्तथा सन्ति शतशोऽथ सहस्रशः ॥ ६६ ॥

हे महामुने ! ह्या शिवाय ह्या द्वीपात आणखी शेकडो छोट्या नद्या व हजारो पर्वत आहेत .

 

 

ताः पिबन्ति मुदा युक्ता जलदादिषु ये स्थिताः ।
 वर्षषु ते जनपदाः स्वर्गादभ्येत्य मेदिनीम् ॥ ६७ ॥

 स्वर्गसुख उपभोगून नन्तर ज्यांनी पृथ्वी तळावर येऊन जलद आदि वर्षां मध्ये जन्म ग्रहण केला आहे ते लोक प्रसन्न होऊन त्यांचे जलपान करतात .


 
 

धर्महानिर्न तेष्वस्ति न सङ्‍घर्षः परस्परम् ।
मर्यादाव्युत्क्रमो नापि तेषु देशेषु सप्तसु ॥ ६८ ॥

ह्या सातों वर्षांमध्ये धर्माचा र्‍हास परस्पर संघर्ष (कलह) अथवा मर्यादेचे उल्लंघन कधीही होत नाही .

 


 मगाश्च मागधाश्चैव मानसा मन्दगास्तथा ।
 मगा ब्रह्मणभूयिष्ठा मागधाः क्षत्रियास्तथा ।
 वैश्यास्तु मानसास्तेषां शूद्रास्तेषां तु मन्दगाः ॥ ६९ ॥

तिथे मग, मागध, मानस आणि मन्दग हे चार वर्ण आहेत . त्यांच्यात मग हे सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहेत, मागध क्षत्रिय, मानस वैश्य तसेच मन्दग शुद्र आहेत .

 

 

शाकद्वीपे तु तैर्विष्णुः सूर्यरूपधरो मुने ।
 यथोक्तौरिज्यते सम्यक्‌कर्मभिर्नियतात्मभिः ॥ ७० ॥

हे मुने ! शाकद्वीपात शास्त्रानुकुल कर्म करणार्‍या पूर्वोक्त चारही वर्णांद्वारा संयत चित्ताने विधिपूर्वक सूर्यरूपधारी भगवान विष्णुची उपासना केली जाते .

  

 

शाकद्वीपस्तु मैत्रेय क्षिरोदेन समावृतः ।
शाकद्वीपप्रमाणेन वलयेनेव वेष्टितः ॥ ७१ ॥

हे मैत्रेया ! हा शाकद्वीप आपल्या इतकाच विस्तार असलेल्या मण्डलाकार दुग्ध समुद्राने घेरलेला आहे .

 


 क्षिराब्धिः सर्वतो ब्रह्मन्पुष्कराख्येन वेष्टितः ।
 द्वीपेन शाकद्वीपात्तु द्वीगुणेन समन्ततः ॥ ७२ ॥

आणि हे ब्रह्मन ! हा क्षीरसमुद्र शाकद्वीपाच्या दुप्पट परिमाण असलेल्या पुष्करद्वीपाने परिवेष्टित आहे .

  


पुष्करे सवनस्यापि महावीरोऽभवत्सुतः ।
धातुकिश्च तयोस्तत्र द्वे वर्षे नामचिह्निते ।
महावीरं तथैवान्यद्धातुकीखण्डसंज्ञितम् ॥ ७३ ॥

पुष्करद्वीपात तेथील अधिपति महाराज सवन ह्याला महावीर आणि धातकि नामक दोन पुत्र झाले . म्हणून त्या दोघांच्या नावानुसार तिथे महावीर-खण्ड आणि धातकी - खण्ड नामक दोन वर्ष आहेत .

 


एकश्चात्र महाभाग प्रख्यातो वर्षपर्वतः ।

मानासोत्तरसंज्ञो वै मध्यतो वलयाकृतिः ॥ ७४ ॥

योजनानां सहस्राणि ऊर्ध्वं पञ्चाशदुच्छ्रितः ।
तावदेव च विस्तीर्णः सर्वतः परिमण्डलः ॥ ७५ ॥

हे महाभागा ! तिथे मानसोत्तरनामक एकच वर्ष पर्वत असल्याचे सांगितले जाते जो त्या द्वीपाच्या मध्यावर वलयाकार स्थित आहे आणि पन्नास सहस्त्र योजने ऊंच आणि तितकाच सर्वबाजूंनी गोलाकार पसरलेला आहे .

 

 

पुष्करद्वीपवलयं मध्येन विभजन्निव ।
स्थितोसौ तेन विछिन्नं जातं तद्वर्षकद्वयम् ॥ ७६ ॥

वलयाकारमेकैकं तयोर्वर्षं तथा गिरिः ॥ ७७ ॥

हा पर्वत पुष्करद्वीपरुप गोळ्याला जणू मधोमध विभक्त करत आहे आणि अशा प्रकारे विभक्त झाल्याने तिथे दोन वर्षे झाली आहेत ; त्यातील प्रत्येक वर्ष आणि तो पर्वतही वलयाकारच आहे .

 


 दशवर्षसहस्राणि तत्र जीवन्ति मानवाः ।
 विरामया विशोकाश्च रागद्वेषादिवर्जिताः ॥ ७८ ॥

तिथली माणसं रोग, शोक आणि राग द्वेषादिंनी रहित दहा सहस्त्र वर्षांपर्यंत जीवित राहतात .

 


अधमोत्तमौ न तेष्वास्तां न वध्यवधकौ द्विज ।
नेर्ष्यासूया भयं द्वेषो दोषो लोभादिको न च ॥ ७९ ॥

हे द्विजा ! त्यांच्यात उत्तम अधम अथवा वध्यवधक आदि विरोधी भाव नाहीत, तसेच त्यांच्यात ईर्ष्या, असूया, भय द्वेष आणि लोभादि दोष देखील नाहीत .

 


 महावीरं बहिर्वर्षं धातकीखण्डमन्ततः ।
 मानसोत्तरशौलस्य देवदैत्यादिसेवितम् ॥ ८० ॥

महावीरवर्ष मानसोत्तर पर्वताच्या बाहेरील बाजूला आणि धातकीखण्ड आतील बाजूला आहे. इथे देव आणि दैत्य आदि निवास करतात.

 


 सत्यानृतेन तत्रास्तां द्वीपे पुष्करसंज्ञिते ।
 न तत्र नद्यः शैला वा द्वीपे वर्षद्वयान्विते ॥ ८१ ॥

दोन खण्डांनी युक्त असलेल्या त्या पुष्करद्वीपात सत्य आणि मिथ्या असे कोणतेच व्यवहार नाहीत आणि तिथे दुसरे पर्वत व नद्या सुद्धा नाहीत .

  


तुल्यवेषास्तु मनुजा देवास्तत्रैकरूपिणः ।
वर्णाश्रमाचारहीनं धर्माचरणवर्जितम् ॥ ८२ ॥
त्रयीवार्तादण्डनीतिशुश्रूषारहितञ्च यत् ।
वर्षद्वयं तु मैत्रेय भौमः स्वर्गोऽयमुत्तमः ॥ ८३ ॥

तिथली माणसं आणि देवगण समान वेष आणि समान रूप असलेले असतात . हे मैत्रेया ! वर्णाश्रम आचाराने हीन, काम्य कर्मांनी रहित तसेच वेदत्रयी, कृषि, दण्डनीति आणि शुश्रुषा आदिंनी रहीत अशी ती दोन्ही वर्ष म्हणजे जणू पृथ्वी वरील अत्युत्तम भौम स्वर्ग आहेत.

 

 

सर्वर्तुसुखदः कालो जरारोगादिवर्जितः ।
 धातकीखण्डसंज्ञेऽथ महावीरे च वै मुने ॥ ८४ ॥

हे मुने ! त्या महावीर आणि धातकी खण्ड नामक वर्षांमध्ये काळ समस्त ऋतुत सुखदायक आणि जरा तसेच रोगादिंनी रहित राहतो .

 

 

न्यग्रोधः पुष्करद्वीपे ब्रह्मणः स्थानमुत्तमम् ।
 तस्मिन्नवसति ब्रह्मा पूज्यमानः सुरासुरैः ॥ ८५ ॥

 

पुष्करद्वीपात ब्रह्माचे उत्तम निवासस्थान एक न्यग्रोध (वटवृक्ष) आहे, जिथे देवता आणि दानवादिंनी पूजित श्रीब्रह्मा विराजित आहे .

 

 

स्वादूदकेनोदधिना पुष्करः परिवेष्टितः ।
 समेन पुष्करस्यैव विस्तारान्मण्डलं तथा ॥ ८६ ॥

पुष्करद्वीप चारही बाजूंनी आपल्याच समान विस्ताराच्या गोड पाण्याच्या समुद्राने मण्डळा समान घेरलेला आहे .

 


 एवं द्वीपाः समुद्रैश्च सप्त सप्तभिरावृताः ।
 द्वीपश्चैव समुद्रश्च समानो द्विगुणौ परौ ॥ ८७ ॥

अशा प्रकारे सातही द्वीप सात समुद्रांनी घेरलेले आहेत आणि ते द्वीप व त्यांना घेरणारे समुद्र परस्पर समान असून उत्तरोत्तर दुप्पट होत गेले आहेत .

 


 पयांसि सर्वदा सर्वसमुद्रेषु समानि वै ।
 न्यूनातिरिक्तता तेषां कदाचिन्नैव जायते ॥ ८८ ॥

सर्व समुद्रांमध्ये सदैव समान जल राहते त्यात कधीही कोणतीही न्यूनता किंवा अधिकता निर्माण होत नाही .

 


स्थालीस्थमग्नीसंयोगादुद्रेकिसलिले यथा ।
 तथेन्दुवृद्धौ सलिलमम्भोधौ मुनिसत्तम ॥ ८९ ॥

हे मुनिश्रेष्ठा ! पात्रातील जल ज्याप्रकारे अग्निशी संयोग झाल्याने उकळू लागते त्याचप्रकारे चंद्राच्या कलांमध्ये वाढ होते तेव्हा समुद्राचे जल सुद्धा वाढू लागते .

 

 

अन्यूनानतिरिक्ताश्च वर्धन्त्यापो ह्रसन्ति च ।
 उदयास्तमनेष्विन्दोः पक्षयोः शुक्लकृष्णयोः ॥ ९० ॥

शुक्ल आणि कृष्ण पक्षात चंद्राच्या उदय आणि अस्तामुळे न्यूनाधिक न होताही जलात घट आणि वाढ होते .

 

 

दशोत्तराणि पञ्चैव ह्यङ्‍गुलानां शतानि वै ।
 अपां वृद्धिक्षयौ दृष्टौ सामुद्रीणां महामुने ॥ ९१ ॥

हे महामुने ! समुद्रजलाची वृद्धि आणि क्षय पाचशेदहा बोटांपर्यंत पाहिली जाते .

 

 

भोजनं पुष्करद्वीपे तत्र स्वयमुपस्थितम् ।
 षड्रसं भुञ्जते विप्र प्रजाः सर्वाः सदैव हि ॥ ९२ ॥

हे विप्रा ! पुष्करद्वीपात सम्पूर्ण प्रजा सर्वदा सहज आपोआप प्राप्त झालेल्या षड्‌रस भोजनाचा आहार करते .

 

 

स्वादूदकस्य परितो दृश्यते लोकसंस्थितिः ।
 द्विगुणा काञ्चनी भूमिः सर्वजन्तुविवर्जिता ॥ ९३ ॥

स्वाद उदक असलेल्या समुद्राच्या चारही बाजूला लोकनिवासाने शून्य आणि समस्त जीवांनी रहित अशी त्याच्यापेक्षा दुप्पट सुवर्णमयी भूमि दिसते .

 

 

लोकालोकस्ततश्शैलो योजनायुतविस्तृतः ।
 उच्छ्रायेणापि तावन्ति सहस्राण्यचलो हि सः ॥ ९४ ॥

तिथे दहा सहस्त्र योजने विस्ताराचा लोकालोक पर्वत आहे. ह्या पर्वताची ऊंची देखील तितकीच सहस्त्र योजने आहे .

 

 

 

ततस्तमः समावृत्य तं शौलं सर्वतः स्थितम् ।
 तमश्चाण्डकटाहेन समन्तात्परिवेष्टितम् ॥ ९५ ॥

त्याच्या पुढे त्या पर्वताला सर्वबाजूंनी आवृत करणारा घोर अन्धकार पसरलेला आहे, आणि हा अन्धकार चारही बाजूंनी ब्रह्माण्ड-कटाहाने आवृत आहे.

 


पञ्चशत्कोटिविस्तारा सेयमुर्वी महामुने ।
सहैवाण्डकटाहेन सद्वीपाब्धिमहीधरा ॥ ९६ ॥

हे महामुने ! अण्डकटाहा सहित द्वीप, समुद्र आणि पर्वतादियुक्त हे समस्त भूमण्डल पन्नास करोड़ योजने विस्तार असलेले आहे .

 

 

सेयं धात्री विधात्री च सर्वभूतगुणाधिका ।
आधारभूता सर्वेषां मैत्रेय जगतामिति ॥ ९७ ॥

हे मैत्रेया ! आकाशादि समस्त भूतांपेक्षा अधिक गुणशाली ही पृथ्वी सम्पुर्ण जगताची आधारभूता असून त्याचे पालन आणि उद्भव करणारी आहे .

 

 

 

इति श्रीविष्णुपुराणे द्वितीये अंशे चतुर्थोंऽध्यायः ॥४॥

विष्णुपुराण, द्वितीय अंश, षष्ठ अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 6

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ द्वितीयः अंशः॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥   " भिन्न – भिन्न नरक तसेच भगवन्नामाच्या माहात्म्याचे वर्णन " परा...